स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 16: आभाळ चकाकले...
"काय नाव तुझं?" अंबेजोगाई या गावातील एका उच्चभ्रू वस्तीत पुस्तके विकताना एका सज्जन व्यक्तीने विचारले. मी त्यांना नाव सांगितले. त्यावर त्यांनी सांगितले, अरे! कशाला आयुष्य वाया घालत आहेस. अभ्यास कर, इतका वेळ पाहतो आहे काॅलनीत, तु सकाळ पासून फिरत आहेस. पुस्तके विकत आहेस.याने आयुष्य चालणार नाही. "कितवीला आहेस?" मी सांगितले " एम ए सेकंड इयर ची परीक्षा देणार आहे " "अरे मग काही चांगले कर ना! सेट नेट दे! एम पी एस सी कर!" गेल्या वर्षभरात मी किमान हजार घरे फिरलो असेन, पण मला पर्सनल होवून कोणी बोलले नव्हते. मी सकाळ पासून फिरत होतो. एक अस्वस्थता दाटून येत होती..मन लागत नव्हतं..आणी त्यात हे असे विचारणे..जखमांचे टाके ऊसवायला लागले..मी त्यांना सांगितले "सर ! एमपीएससी करणार आहे, पण जाहिरात येत नाहीय! मी दररोज वाचत असतो!" मी माझ्या बॅगेतून नोट्सचा गठ्ठा काढला त्यांना दाखवला. त्यांनी पाहीला. पाठ थोपटली..म्हणाले ग्रेट! पण हे सगळं करून तुला नाही जमणार! तु जास्त दिवस हे नको करू. "शर्यतीच्या घोड्यानी टांगा ओढणं बरं वाटत नाही!" काळजात कळ आली..डोळे भरून आले..मी मुका झालो...त्यांनी ओळखलं...प्यायला पाणी दिलं...आस्थेनं चौकशी केली..मार्क्स विचारले..मी त्यांना सांगितले..खुष झाले..म्हणाले " मी पण एमपीएससी साठी प्रयत्न केले. पण नाही झाले सिलेक्शन! पण त्या अभ्यासावर मी विस्तार अधिकारी झालो. एमपीएससी आयुष्य वाया जाऊ देत नाही. तु चांगला मुलगा वाटलास म्हणुन सांगितले. जास्त दिवस हे काम करू नको " मी त्यांचे आभार मानले...त्यांनी शुभेच्छा दिल्या.."तुझ्या सारख्या मुलांचा संघर्ष इतरांना प्रेरणादायी ठरावा " असे म्हटले.त्यांच्या बोलण्याने , सल्ल्याने काळजात हुरूप मावत नव्हता...गेल्या वर्षभरात मी एमए, एमपीएससीचे वाचन आणि पुस्तके विक्री या शिवाय काही केले नव्हते...त्यांच्या विचारपुस करण्याने मला हुरूप आला...बरे वाटले....एक चांगल्या सदिच्छा मिळाल्या होत्या...मी खुशीत लाॅजवर आलो ...किशोरला सांगितले " भाऊ , आता हे पब्लिकेशन सोडावे म्हणतो ! जे व्हायचे ते होवो...अभ्यास करतो" किशोर पण वैतागला होता पण त्याने मला समजावले...सध्या थांब काही दिवस करू...मग पाहू...तुला अभ्यास करायचा तर कर काही लागले तर पाहू आपण ..! मी वाटल्यास मदत करतो.....( मदतीचे हात पुढे यायला लागले....असे अनंत हात माझी वाट पाहत होते....नियती संकेत देत होती...!! फक्त ती परीक्षे अगोदर माझी सत्वपरीक्षा पाहत होती......) गमावण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते...अंधार दिसला की झोकून द्यायचे त्यात, एवढे मात्र ठाम शिकलो होतो!!!
लातुरला रूमवर परत आलो...मोठा भाऊ पण कळवळुन सांगायचा बस कर ! अभ्यासावर लक्ष दे! पण त्यालाही माहित होतं. हवेत अभ्यास करायला सांगु शकत नव्हता तो! पण त्याला माझ्या एम ए च्या अभ्यासाची कल्पना होती..एकदम थरार अभ्यास होता. वर्गात अभ्यासात एक नाव होतं माझं ..पुस्तक विकायचा आठवडा झाला की मी काॅलेजला जायचो..वर्गात शक्यतो कोणी नादी लागायचे नाही कारण चाललेला टाॅपिक अगोदरच मला ब-यापैकी माहिती असायचा..वर्गात माझा प्रतिसाद पाहून भिंगे सर खुष असायचे ...म्हणायचे...खुप चांगली समज आहे तुला विषयाची...नॅक ची टिम काॅलेजला आली...सरांनी 2 कमिटीचे काम माझ्याकडे दिले...ते संपवून मी इतरांना मदत केली...आमच्या सेक्शनचे चांगले नाव झाले...सर चांगलाच जिव लावायचे...अर्थात आजही त्यांचा तेवढाच जिव आहे.
एक अस्वस्थता मनात दाटली होती...खुप दिवस झाले MPSC ने जाहिराती टाकली नव्हती..त्या काळात वेबसाईट वगैरे काही नव्हती..तांदळे सर काॅलेज मधे असताना तेथे अभ्यास करायचे..तेथे त्यांचे सहकारी अतुल पाटील ऊर्फ बप्पा! ( अत्यंत दिलदार व दिलखुलास मित्र..सगळे जण त्यांच्यावर कोट्या करणार...तरीही अत्यंत दिलखुलासपणे पहाडी हास्य करत ते स्वीकारणारा...अगदी लहान वयापासूनच घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन लॅब टेक्निशीयन या पदावर काम करणारा...MPSC ने शेवटच्या अॅटेम्प्टलाही सिलेक्शन न दिलेला हा मित्र) अशोक मोहाळे (परभणी वरून आलेले, व त्याच शासकीय पाॅलिटेक्नीक काॅलेज मधे क्लार्क पदावर कार्यरत,ऊत्तम क्रिकेटर व अभ्यासू आणी अत्यंत सहकार्याची भावना असणारे मित्र ) हे ही तयारी करायला लागले होते. वेळ मिळेल तेंव्हा मी पाॅल्टेक्नीक काॅलेजला जायचो. तेथे अभ्यासा बदल चर्चा व्हायच्या. इतर ठिकाणी काय सुरू आहे, महाराष्ट्रात काय चर्चा सुरू आहेत या बाबत माहिती मिळायची. एक मात्र होते.असा एकही दिवस येत नव्हता ज्या दिवशी मी MPSC विसरलो असेन....हे सगळे जण चर्चा करायचे. तेथेही काही लोक त्यांना सहकार्य करायचे तर काहीजण टिकाटिप्पणी! रसायनशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आर्य मॅडम होत्या. त्या खुप प्रोत्साहन द्यायच्या. अधून मधून धुसर झालेल्या स्वप्नाला चकाकी मिळायची. मी Mpsc च्या आसपास राहण्याचा
प्रयत्न करायचो.
मी पुन्हा काॅलेज कडे वळलो होतो...सोबतचे मित्रमैत्रिणी गॅदरींग आणी इतर तत्सम कामात गुरफटले होते..काॅलेजने छोटेखानी ट्रिप काढली होती..मुड नव्हता,गेलो नाही... अशा छानछोकीच्या गोष्टी काही आकर्षीत करू शकत नव्हत्या मनाला..त्या पेक्षा मला कविता लिहिण्याचा असलेला छंद तगवत असायचा...ललित लिहायचो...वाचायचो.. त्यातील अगतिकता अनुभवायचो...पुन्हा वाटायचं..काही तरी करायला हवं आपण आयुष्यात ...भरीव...रेखीव..आखीव....!!!
इके (पाटील) भेटला ..एमपीएससी बद्दल बोलला...अतुल कुलकर्णी पण भेटला तोही बोलला..माळी सरांचे नाव ऐकून होतो..भेटलो नव्हतो..पण त्यांचे व भांबरे सर यांचे सातत्य ऐकत होतो..एके दिवशी मुक्रम भैय्या भेटले..."भाई कब आएगी रे अॅड?" म्हणून अस्वस्थ करून गेले..एक धुकं साचलं होतं..काॅलेजचे मित्रमैत्रिणी भेटायचे ..डिएड पुर्ण होवून ते
नोक-यांना लागले होते..मी चालत रस्त्याने फिरत असताना एखादी टुव्हिलर जवळ थांबायची.. त्यावरील शिक्षकमित्र हाक देवून थांबायचा...आस्थेने विचारायचा...थोडावेळ सोबत बोलायचा...फरक जाणवत असायचा दोघात....जिवाभावाचं बोलताबोलता काहीजण शिव्याही घालायचे...किती चांगली संधी घालवली मी डिएडची म्हणून झापायचे... काही जण रस्त्याच्या दुस-या बाजुने जात असतील तर हात दाखवायचे..थांबायचे...झाडाझडती घ्यायचे...चल निघतो भेटू म्हणून
निघून जायचे...मणामणाचे ओझे देवून...मी रिक्त मनाच्या पोकळीत स्वतःला काही आधार भेटेल म्हणून धुंडाळा घेत रहायचो ..चालत रहायचो...
गजा, जयपाल व इतर काही जण पुण्याला एमबीए ला गेले होते..अधून मधून ते यायचे...चर्चा व्हायची...बॅच मधले मुलं काही ना काही करत होते..गावाकडे जाण्या सारखं काही नव्हतं..कुढत फिरत होतो..पण.. .मळभ दाटून आलं की पाऊस पडतो...अंधार दाटून आला की पहाट होतेच...
मी एके सकाळी नित्यनेमाने आपापले काम उरकून बाहेर निघत होतो..डिसेंबरचा महीना होता..रूमवरील कामे संपली होती...मोठा भाऊ होता...तेवढ्यात रूमवर बातमी धडकली...एमपीएससी च्या राज्यसेवेची जाहिरात मुंबईत लागली होती काल...श्वास एकदम अडकला...अफवा असेल वाटले...गडबडीत धडपडत पेपर आणण्यासाठी निघालो..पाय-या उतरून खाली उतरलो..आणी एकदम लक्षात आले..बाजुला राहणा-या होके सरांकडे पेपर येतो...ते शाळेत गेले होते...गडबडीत त्यांचा पेपर उचलला...उघडला...पाहीले...आणी हर्षवायु झाल्यासारखे मी आरोळी ठोकली...आणी रूम मधे येवून जोरजोरात नाचू लागलो...भैय्याला कळत नव्हते काय झालं..."पागल झालास का? काय झालं ?" म्हणून त्यानं विचारलं...(कदाचीत अतिशयोक्ती वाटेल पण आजही जसंच्या तसं डोळ्यासमोर येतो तो क्षण!) मी ओरडंतंच त्याला सांगितलं "एमपीएससीची ॲड आली अॅड!!, हे घे पेपर बघ!" मी त्याच्याकडे पेपर फेकला...त्याने नीट पाहीले..तो ही खुष झाला..पण माझा उत्साह आवरता आवरत नाही पाहून त्याने एक वाक्य म्हटलं..." अरे फक्त जाहिरात आली आहे, सिलेक्शन नाही झाले..एवढे नाचतोस कशाला...पण कैफ चढला होता मला जणू....त्यातच माझा आत्मविश्वास होता की उत्साह, की नियती माझ्या तोंडून वदवून घेत होती...मी उत्तरलो..." होईल रे ,सिलेक्शन तर होईलच..ते झाल्याशिवाय मी मला सोडणार नाही तु बघ! ह्या अॅटेम्पटला मी सिलेक्ट होवून दाखवणारच!"
इतके दिवस एका काल्पनिक परिस्थितीत संघर्ष सुरू होता..आता प्रत्यक्ष युध्दभुमीवर येण्याची वेळ झाली होती. मी निघालो होतो...सुकर परिणामांची कल्पना करत....जिंकण्यासाठी !! (क्रमशः)
भाग 16: आभाळ चकाकले...
"काय नाव तुझं?" अंबेजोगाई या गावातील एका उच्चभ्रू वस्तीत पुस्तके विकताना एका सज्जन व्यक्तीने विचारले. मी त्यांना नाव सांगितले. त्यावर त्यांनी सांगितले, अरे! कशाला आयुष्य वाया घालत आहेस. अभ्यास कर, इतका वेळ पाहतो आहे काॅलनीत, तु सकाळ पासून फिरत आहेस. पुस्तके विकत आहेस.याने आयुष्य चालणार नाही. "कितवीला आहेस?" मी सांगितले " एम ए सेकंड इयर ची परीक्षा देणार आहे " "अरे मग काही चांगले कर ना! सेट नेट दे! एम पी एस सी कर!" गेल्या वर्षभरात मी किमान हजार घरे फिरलो असेन, पण मला पर्सनल होवून कोणी बोलले नव्हते. मी सकाळ पासून फिरत होतो. एक अस्वस्थता दाटून येत होती..मन लागत नव्हतं..आणी त्यात हे असे विचारणे..जखमांचे टाके ऊसवायला लागले..मी त्यांना सांगितले "सर ! एमपीएससी करणार आहे, पण जाहिरात येत नाहीय! मी दररोज वाचत असतो!" मी माझ्या बॅगेतून नोट्सचा गठ्ठा काढला त्यांना दाखवला. त्यांनी पाहीला. पाठ थोपटली..म्हणाले ग्रेट! पण हे सगळं करून तुला नाही जमणार! तु जास्त दिवस हे नको करू. "शर्यतीच्या घोड्यानी टांगा ओढणं बरं वाटत नाही!" काळजात कळ आली..डोळे भरून आले..मी मुका झालो...त्यांनी ओळखलं...प्यायला पाणी दिलं...आस्थेनं चौकशी केली..मार्क्स विचारले..मी त्यांना सांगितले..खुष झाले..म्हणाले " मी पण एमपीएससी साठी प्रयत्न केले. पण नाही झाले सिलेक्शन! पण त्या अभ्यासावर मी विस्तार अधिकारी झालो. एमपीएससी आयुष्य वाया जाऊ देत नाही. तु चांगला मुलगा वाटलास म्हणुन सांगितले. जास्त दिवस हे काम करू नको " मी त्यांचे आभार मानले...त्यांनी शुभेच्छा दिल्या.."तुझ्या सारख्या मुलांचा संघर्ष इतरांना प्रेरणादायी ठरावा " असे म्हटले.त्यांच्या बोलण्याने , सल्ल्याने काळजात हुरूप मावत नव्हता...गेल्या वर्षभरात मी एमए, एमपीएससीचे वाचन आणि पुस्तके विक्री या शिवाय काही केले नव्हते...त्यांच्या विचारपुस करण्याने मला हुरूप आला...बरे वाटले....एक चांगल्या सदिच्छा मिळाल्या होत्या...मी खुशीत लाॅजवर आलो ...किशोरला सांगितले " भाऊ , आता हे पब्लिकेशन सोडावे म्हणतो ! जे व्हायचे ते होवो...अभ्यास करतो" किशोर पण वैतागला होता पण त्याने मला समजावले...सध्या थांब काही दिवस करू...मग पाहू...तुला अभ्यास करायचा तर कर काही लागले तर पाहू आपण ..! मी वाटल्यास मदत करतो.....( मदतीचे हात पुढे यायला लागले....असे अनंत हात माझी वाट पाहत होते....नियती संकेत देत होती...!! फक्त ती परीक्षे अगोदर माझी सत्वपरीक्षा पाहत होती......) गमावण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते...अंधार दिसला की झोकून द्यायचे त्यात, एवढे मात्र ठाम शिकलो होतो!!!
लातुरला रूमवर परत आलो...मोठा भाऊ पण कळवळुन सांगायचा बस कर ! अभ्यासावर लक्ष दे! पण त्यालाही माहित होतं. हवेत अभ्यास करायला सांगु शकत नव्हता तो! पण त्याला माझ्या एम ए च्या अभ्यासाची कल्पना होती..एकदम थरार अभ्यास होता. वर्गात अभ्यासात एक नाव होतं माझं ..पुस्तक विकायचा आठवडा झाला की मी काॅलेजला जायचो..वर्गात शक्यतो कोणी नादी लागायचे नाही कारण चाललेला टाॅपिक अगोदरच मला ब-यापैकी माहिती असायचा..वर्गात माझा प्रतिसाद पाहून भिंगे सर खुष असायचे ...म्हणायचे...खुप चांगली समज आहे तुला विषयाची...नॅक ची टिम काॅलेजला आली...सरांनी 2 कमिटीचे काम माझ्याकडे दिले...ते संपवून मी इतरांना मदत केली...आमच्या सेक्शनचे चांगले नाव झाले...सर चांगलाच जिव लावायचे...अर्थात आजही त्यांचा तेवढाच जिव आहे.
एक अस्वस्थता मनात दाटली होती...खुप दिवस झाले MPSC ने जाहिराती टाकली नव्हती..त्या काळात वेबसाईट वगैरे काही नव्हती..तांदळे सर काॅलेज मधे असताना तेथे अभ्यास करायचे..तेथे त्यांचे सहकारी अतुल पाटील ऊर्फ बप्पा! ( अत्यंत दिलदार व दिलखुलास मित्र..सगळे जण त्यांच्यावर कोट्या करणार...तरीही अत्यंत दिलखुलासपणे पहाडी हास्य करत ते स्वीकारणारा...अगदी लहान वयापासूनच घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन लॅब टेक्निशीयन या पदावर काम करणारा...MPSC ने शेवटच्या अॅटेम्प्टलाही सिलेक्शन न दिलेला हा मित्र) अशोक मोहाळे (परभणी वरून आलेले, व त्याच शासकीय पाॅलिटेक्नीक काॅलेज मधे क्लार्क पदावर कार्यरत,ऊत्तम क्रिकेटर व अभ्यासू आणी अत्यंत सहकार्याची भावना असणारे मित्र ) हे ही तयारी करायला लागले होते. वेळ मिळेल तेंव्हा मी पाॅल्टेक्नीक काॅलेजला जायचो. तेथे अभ्यासा बदल चर्चा व्हायच्या. इतर ठिकाणी काय सुरू आहे, महाराष्ट्रात काय चर्चा सुरू आहेत या बाबत माहिती मिळायची. एक मात्र होते.असा एकही दिवस येत नव्हता ज्या दिवशी मी MPSC विसरलो असेन....हे सगळे जण चर्चा करायचे. तेथेही काही लोक त्यांना सहकार्य करायचे तर काहीजण टिकाटिप्पणी! रसायनशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आर्य मॅडम होत्या. त्या खुप प्रोत्साहन द्यायच्या. अधून मधून धुसर झालेल्या स्वप्नाला चकाकी मिळायची. मी Mpsc च्या आसपास राहण्याचा
प्रयत्न करायचो.
मी पुन्हा काॅलेज कडे वळलो होतो...सोबतचे मित्रमैत्रिणी गॅदरींग आणी इतर तत्सम कामात गुरफटले होते..काॅलेजने छोटेखानी ट्रिप काढली होती..मुड नव्हता,गेलो नाही... अशा छानछोकीच्या गोष्टी काही आकर्षीत करू शकत नव्हत्या मनाला..त्या पेक्षा मला कविता लिहिण्याचा असलेला छंद तगवत असायचा...ललित लिहायचो...वाचायचो.. त्यातील अगतिकता अनुभवायचो...पुन्हा वाटायचं..काही तरी करायला हवं आपण आयुष्यात ...भरीव...रेखीव..आखीव....!!!
इके (पाटील) भेटला ..एमपीएससी बद्दल बोलला...अतुल कुलकर्णी पण भेटला तोही बोलला..माळी सरांचे नाव ऐकून होतो..भेटलो नव्हतो..पण त्यांचे व भांबरे सर यांचे सातत्य ऐकत होतो..एके दिवशी मुक्रम भैय्या भेटले..."भाई कब आएगी रे अॅड?" म्हणून अस्वस्थ करून गेले..एक धुकं साचलं होतं..काॅलेजचे मित्रमैत्रिणी भेटायचे ..डिएड पुर्ण होवून ते
नोक-यांना लागले होते..मी चालत रस्त्याने फिरत असताना एखादी टुव्हिलर जवळ थांबायची.. त्यावरील शिक्षकमित्र हाक देवून थांबायचा...आस्थेने विचारायचा...थोडावेळ सोबत बोलायचा...फरक जाणवत असायचा दोघात....जिवाभावाचं बोलताबोलता काहीजण शिव्याही घालायचे...किती चांगली संधी घालवली मी डिएडची म्हणून झापायचे... काही जण रस्त्याच्या दुस-या बाजुने जात असतील तर हात दाखवायचे..थांबायचे...झाडाझडती घ्यायचे...चल निघतो भेटू म्हणून
निघून जायचे...मणामणाचे ओझे देवून...मी रिक्त मनाच्या पोकळीत स्वतःला काही आधार भेटेल म्हणून धुंडाळा घेत रहायचो ..चालत रहायचो...
गजा, जयपाल व इतर काही जण पुण्याला एमबीए ला गेले होते..अधून मधून ते यायचे...चर्चा व्हायची...बॅच मधले मुलं काही ना काही करत होते..गावाकडे जाण्या सारखं काही नव्हतं..कुढत फिरत होतो..पण.. .मळभ दाटून आलं की पाऊस पडतो...अंधार दाटून आला की पहाट होतेच...
मी एके सकाळी नित्यनेमाने आपापले काम उरकून बाहेर निघत होतो..डिसेंबरचा महीना होता..रूमवरील कामे संपली होती...मोठा भाऊ होता...तेवढ्यात रूमवर बातमी धडकली...एमपीएससी च्या राज्यसेवेची जाहिरात मुंबईत लागली होती काल...श्वास एकदम अडकला...अफवा असेल वाटले...गडबडीत धडपडत पेपर आणण्यासाठी निघालो..पाय-या उतरून खाली उतरलो..आणी एकदम लक्षात आले..बाजुला राहणा-या होके सरांकडे पेपर येतो...ते शाळेत गेले होते...गडबडीत त्यांचा पेपर उचलला...उघडला...पाहीले...आणी हर्षवायु झाल्यासारखे मी आरोळी ठोकली...आणी रूम मधे येवून जोरजोरात नाचू लागलो...भैय्याला कळत नव्हते काय झालं..."पागल झालास का? काय झालं ?" म्हणून त्यानं विचारलं...(कदाचीत अतिशयोक्ती वाटेल पण आजही जसंच्या तसं डोळ्यासमोर येतो तो क्षण!) मी ओरडंतंच त्याला सांगितलं "एमपीएससीची ॲड आली अॅड!!, हे घे पेपर बघ!" मी त्याच्याकडे पेपर फेकला...त्याने नीट पाहीले..तो ही खुष झाला..पण माझा उत्साह आवरता आवरत नाही पाहून त्याने एक वाक्य म्हटलं..." अरे फक्त जाहिरात आली आहे, सिलेक्शन नाही झाले..एवढे नाचतोस कशाला...पण कैफ चढला होता मला जणू....त्यातच माझा आत्मविश्वास होता की उत्साह, की नियती माझ्या तोंडून वदवून घेत होती...मी उत्तरलो..." होईल रे ,सिलेक्शन तर होईलच..ते झाल्याशिवाय मी मला सोडणार नाही तु बघ! ह्या अॅटेम्पटला मी सिलेक्ट होवून दाखवणारच!"
इतके दिवस एका काल्पनिक परिस्थितीत संघर्ष सुरू होता..आता प्रत्यक्ष युध्दभुमीवर येण्याची वेळ झाली होती. मी निघालो होतो...सुकर परिणामांची कल्पना करत....जिंकण्यासाठी !! (क्रमशः)

No comments:
Post a Comment