एकांताची निरव पोकळी , मनाची सृजन घालमेल...निर्मिती आसक्त मी ...आणी हृदयात भावनांचे बहर....अभिव्यक्त होण्याच्या तळमळीचे हे पर्व.... माझ्या भावअस्तित्वाचा हा दर्पण.... आणी ढवळून निघणारी आपली...प्रतिबिंबे....
Tuesday, October 30, 2018
Sunday, October 28, 2018
स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 11 : स्पर्धेची झुंज.......!!!
स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 11 : स्पर्धेची झुंज.......!!!
बिए प्रथम वर्ष... परिक्षा झाली. सुट्ट्या लागल्या. या सुट्ट्यात मी पुर्वपिठीके प्रमाणे पुन्हा कामाला गेलो. बाॅयलर, स्टिम, प्रेशर....माळरान, पाऊलवाट...निःशब्द संवाद, मुक्या आवाजात स्वतःशी बोलणे...मनाची घालमेल...लातुरची ओढ...काॅलेजची आठवण...सुट्टी आली की ती अभ्यासाचा असलेला माझा पुर्ण सेट अप बदलवून टाकायची आणी जीवनाच्या सेट अप मधे मला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करायची ...मी तगत रहायचो कारण मला माहिती असायचं हे असं काम करणं फक्त सुट्ट्या पुरतं आहे. नंतर आपला अभ्यास करायला मिळणारच आहे. पण " काळाच्या कळा सोसल्याशिवाय यश जन्माला येत नाही, आणी त्या सोसाव्याच लागतात!!!" मी सोसत होतो गुमान!
सुट्ट्यात लिहीत होतो काहीबाही...घरच्यांना तो पर्यंत समजत होते की मी MPSC ने पछाडलो आहे. आणी ही बाधा चांगलीच होती..पण तुटपुंज्या साधनांनी साध्य प्राप्त करण्याचे आव्हान मला जास्त मागे रेटत होते.कशाबशा सुट्ट्या संपल्या...काॅलेज सुरू झालं...मी अत्यंत उत्सुकता व उत्साह घेवून महाविद्यालयात आलो..अलिकडे मार्क्स चांगले पडायचे त्यामुळे निकालाचे टेन्शन नव्हते..मी अभ्यासाला सुरूवात केली..काॅलेजची अभ्यासिका..क्लास पूर्ववत सुरू झाले..मी पुन्हा माझ्या रूटीन मधे आलो..पण रूटीन सोडुन करण्यासाठी जो मनसुबा मी आखला होता तो अजुन काही दृष्टीक्षेपात येत नव्हता. मी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत होतो..पण किती,कोठे, कसा ...सगळा अंधारच....पण अंधार येतोच मुळी प्रकाशमान करण्यासाठी!!!!
एके दिवशी मी अभ्यासिकेत बसलो होतो,आणी खुप गंभीर होऊन वाचत होतो..त्यावेळी एक अत्यंत ऊंच(मनाने तर त्याहून ही ऊंच) असणारा सिनियर मुलगा हळुच जवळ आला व त्याने विचारले"MPSC चा अभ्यास करत आहेस का?" मी प्रथमच MPSC चे थेट नाव घेवून कोणीतरी विचारत आहे म्हणून थोडा सजग झालो, आणी मी जबाबदार आवाजात त्याला सांगितले "हो भैय्या!!" कारण मला त्याचे नाव माहित होते.......... मुकरम काझी!! ( जो नंतर खरंच माझ्या आयुष्याला ख-या वळणावर घेऊन येणारा पहिला दिशादर्शक व्यक्ती ठरला जर मुकरम भैय्या नसते तर मी MPSCच्या अंधारात किती दिवस चाचपडत असतो माहित नव्हते, काही लोक स्वतः सारखेच इतरांचेही आयुष्य मौल्यवान असते याचे भान बाळगून असतात ते भान असणारा हा व्यक्ती, सदैव मित्रांच्या भल्यासाठी अहोरात्र तत्पर असणारा हा व्यक्ती आजही मित्रासाठी झिजत असतो..MPSC मधे असताना तिने कधी यांना यशाचे दान दिले नाही पण इमानदारीने MPSC चाअभ्यास करणा-या व त्यासाठी धडपडणा-या लातूर मधिल मुलांचा हा दिग्दर्शक व्यक्ती..पुस्तकाच्या दुकानावर गेले असताना तिथे आपल्या मुलास फक्त 1500 रूपयांची पुस्तके घे म्हणुन सांगणा-या त्या मुलाचे वडील , पण जास्त पुस्तके घ्यायची आहेत याची तळमळ असणारा तो मुलगा या दोघांची घालमेल पाहून त्यांची कुठलीही पुर्व ओळख नसताना निव्वळ माणुसकीसाठी स्वतः मदत करून, नंतर त्या मुलाला स्वतः सोबत ठेऊन त्याचे सहकार खात्यात सिलेक्शन होईपर्यंत त्याला मदत करणारा एक दिलदार व ऊमदा व्यक्ती , म्हणजे हा माणुस....हेच नाही तर त्यांच्या आख्ख्या घराला शिक्षणाचे वेड असणारे हे कुटुंब, मुकरम भैय्या व त्यांच्या भाऊ व एक बहिण यांच्या मिळालेल्या सर्व डिग्री यांची बेरीजच माणसाला थकवून टाकेल...सुदैवाने तिघेही भावंडे आज शासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. मुकरम भैय्या स्वतः पोलीस खात्यात वायरलेस विभाग, लहान भाऊ लातूर पोलीस मधिल एक झंझावात तर त्यांची लहान बहिण, दिदी या वर्षी आपली पहिली नोकरी करत असतानाच सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून निवडली गेली आहे. अत्यंत प्रगतीशील विचार असणारे हे कुटुंब, व आपल्या मुलांना असा विचार देणारे त्यांचे अत्यंत ऊमदे वडील , आदरणीय चाचा!! मला अत्यंत प्रेमाने वागवणारे, पोलीस खात्यात अत्यंत ईमानदारीने काम करून नावारुपाला आलेले, आणी मला भेटल्यास अत्यंत मित्रत्वाने भेटून चहा पित पित MPSC बद्दल व मुकरम भैय्याच्या अभ्यासाबद्दल चर्चा करणारे आणी उत्साह वाढवणारे व्यक्ती! दुर्दैवाने चाचा यांचे अकाली व अपघाती निधन झाले. ते तिघा मुलांचे सिलेक्शन पाहू शकले नाहीत, पण या तिघांना जी सामाजिक समज त्यांनी दिली त्यायोगेच हे तिघेही घडले. चाचा गेले आणी मुकरम भैय्याने आख्खे कुटुंब योग्य मार्गावर नेले. अत्यंत जबाबदार व संवेदनशील मनाचा हा व्यक्ती ज्यांच्या ज्यांच्या सोबत जुडला त्या त्या व्यक्तीला त्यांनी मदतच केली आहे...एवढे सारे मुकरम भैय्या बद्दल लिहिणे या साठी की ज्या व्यक्तीने माझी अभ्यासिकेत वर्षभर धडपड पाहिली व माझ्यावर लक्ष ठेवले, माझा लेखाजोखा ठेवला आणी योग्यवेळी मला मदतीचा हात दिला तो पहिला व्यक्ती हाच!! माझा जिवलग मित्र आणी माझ्या कुटुंबा साठी एक सन्माननीय सदस्य!! "शुक्रिया भैय्या ! कुछ लोग फ़रिश्ते होते है। आप वही हो।") मी MPSC चा अभ्यास करतो हे ऐकुन त्यांनी म्हटले, "असा एकट्याने कसा अभ्यास होईल?? तुला खरंच अभ्यास कसा असतो आणी तो कसा करतात बघायचा आहे का??" मी एकदम स्तब्ध झालो! आणी नकळत तोंडून शब्द निघाले"प्लिज!"यावर एक आश्वासक स्मितहास्य करून, मुकरम भय्याने सांगितले , तु टेन्शन मत ले भाई! हम जाएंगे शाम मे, तुझे अच्छे और सीरियस कॅन्डिडेटसे मिलाता हूँ । तु सीरियस पढता है इसलिए मैने बताया ।" मी लगेच होकार भरला. आणी सायंकाळ व्हायची वाट पाहत बसलो. मी खुप अस्वस्थ झालो होतो. मला सायंकाळ कधी होते याची प्रतिक्षा होती. मला मुकरम भैय्याने 5.00 वाजता नंदी स्टाॅपला यायला सांगितले होते. काॅलेज ते नंदी स्टाॅप हे अंतर साधारणतः 3.5 कि.मी. होते. मी साडेतीन वाजताच काॅलेजवरून निघालो, कारण चालत जायला मला वेळ लागला असता....अॅटोने पोहोचण्याची व्यवस्था होउ शकेल एवढे पैसे होते पण तेथे गेल्यास सहज चहा पाजण्याची वेळ आली तर काय? या टेन्शनमध्ये मी चालत निघालो. जाता जाता मी अनेक विचार करत होतो..काय असेल तेथे? कुठली मुले असतील? आपण तेथे अॅडजेस्ट होऊ शकु का? मुकरम तसा चांगला माणुस आहे...तेथे ग्रुप मेंबर व्हायच्या काय अटी असतील???? वगैरे..
मी साडेचार पर्यंत तेथे पोहोचलो. मुकरम भैय्या पाच वाजता हजर झाले. त्यांनी मला त्यांच्या गाडीवरती बसवून घेतले आणि आम्ही निघालो..तो एरीया माझ्या ओळखीचा होता. कारण आठवीला असताना मी याच रस्त्यावरून शाळेत जात होतो. आम्ही एका बिल्डींग जवळ पोहचलो. मला जातानाच त्यांनी समजवून सांगितले होते की, घरमालकाला तेथे गोंधळ चालत नाही तु काही न बोलता गुपचूप माझ्या सोबत चलशील. मी सांगीतल्या प्रमाणे केले. मी गुपचुप वरच्या मजल्यावर त्यांच्या सोबत पोहचलो.तेथे गेल्यावर दिसले की, खाली सतरंजी टाकली आहे. समोर भिंतीवर एक फळा टांगलेला होता. काही खडुचे तुकडे व्यवस्थित ठेवले होते. पोहचल्यावर मी पाहीले, मुकरम भैय्याने पण खडुचे स्वतः जवळील तुकडे काढून तेथे ठेवले. आणी सांगितले मला की, "काॅलेज मे क्लास मे बहोत टुकडे गिरे रहते है। वही ऊठाके लाया हूं, उससे आराम से अपने तिन चार दिन के क्लास की राइटिंग अॅडजेस्ट हो जाती है। " यावरून मला तात्काळ अंदाज आला की येथे असेच आपल्या सारखे गरीब पण होतकरू मुलं अभ्यास करतात. ज्यांना जाणीव आहे. साडेपाच वाजता मला तेथले स्वरूप समजले की, तांबे सर ज्यांना तेथील सगळे मुलं भैय्या म्हणतात त्यांनी हा ग्रुप तयार केला आहे. व येथील सर्व मुले एकत्र पैसे जमा करून त्यातुन खर्च भागवत अभ्यास करतात व तांबे सर तेथे शिकवतात. सहा वाजेपर्यंत हळूहळू मुलं जमायला सुरूवात झाली. सागर पुदाले, नितीन सिरसाट, अशोक गिराम, चंद्रशेखर ऊत्के, सोमनाथ रेड्डी ( नंतरAPO ),संजय (नंतर STI) , उज्ज्वला मॅडम (नंतर PSI),सचिन काळे, अश्विनी मॅडम हे सर्व सिनियर तेथे जमा झाले. आणी तांबे सर यांनी प्रवेश करून ओळख करून घेतली. आणी पहिल्याच लेक्चर मधे समजले, मी आजपर्यंत अभ्यास केला होता पण MPSC चा अभ्यास त्यात फार कमी होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व सिरीयस लेक्चर झाले. डोळे उघडले. MPSC, काय असते, कशी परिक्षा असते, अभ्यासक्रम काय असतो, कसा अभ्यास करावा लागतो,संदर्भ साहित्य काय असते या बद्दल अचुक माहिती मिळाली. मी एकदम स्तब्ध होतो. मुकरम भैय्याने ओळखले, आणी म्हटले, मैने बोला था ना तुझे।मी होकार भरला आणी न विचारता, न सांगता मी त्या ग्रुप चा सदस्य झालो. मी दररोज तेथे जाऊ लागलो.आवश्यक ती फिस मी घरी बोलून व इकडुन तिकडुन जमा केली, तांबेसर एकदम सुंदर शिकवायचे, वर्गात असतानाच शिकवलेले लक्षात राहील अशी त्यांची पध्दत. मुलं अनौपचारिक पण अत्यंत व्यावसायिक पध्दतीने तयारी करत. टेस्ट, ग्रुप डिस्कशन , सिलॅबस, स्वंयमुल्यमापन या बाबी समजत चालल्या होत्या. दिवसेंदिवस काॅलेजच्या क्लास मधून मुलं कमी होवून इकडे जमु लागली..त्या पैकी अनिरुद्ध कुलकर्णी , प्रदीप राऊत ( सहकारी बॅकेत सध्या रुजू)हेही तिकडे जाॅइन झाले. ग्रुप मधिल काही इतर जण पण शिकवायचे.
मी सकाळी काॅलेज, नंतर लाएब्रेरी आणी रात्री क्लास करून मग गावी जात होतो. आता रस्ता सापडला होता पण धावण्यासाठी आवश्यक वेळ मिळत नव्हता. गावी गेले की ती रूम, तो बल्ब आणी मनात प्रकाशाची व्यापकता...क्लास मधे टेस्ट व्हायच्या एकाचढ एक मुलं अभ्यास करायचे. अधून मधून माझाही नंबर यायला लागला.कधी तो गेला की जिद्द वाटायची की आपण असं मागे पडायला नाही पाहिजे , मग त्वेषाने अभ्यास सुरू व्हायचा आणी त्याचा फायदा पुढल्या परिक्षेत व्हायचा. या वरून एक जाणिव झाली की जिद्दीने, त्वेषाने अभ्यास केलातर आपण स्पर्धेत राहू शकतो, टिकू शकतो...तेथे जमलेले सगळे गंभीर होते. त्यामुळे अभ्यासाशिवाय इतर कुठला विषयच असायचा नाही.
मला हळुहळु जाणीव होत होती की, गावाकडून येण्याजाण्यात खुप वेळ जात आहे. आपण क्लासच्या आजुबाजुला जर राहू शकलो तर आपण जास्त अभ्यास करू शकतो. आपल्याला जास्त वेळ मिळेल. इतर मुलं आपल्या पेक्षा जास्त वेळ बसतात त्यामुळे ते वेगाने पुढे निघून जात आहेत. या बाबत इतर सहकारी मित्रांनी पण दुजोरा दिला. मन घट्ट करून या बाबत घरी बोललो. पण घरी एक अडचण होती. एकदमच तीनचार हजार रूपये कसेही करून जुळवता येतील पण दर महिन्याला नियमीतपणे भाडं कसं देणार? खेड्यात दर महिन्याला पैसे येतीलच याची काही हमी नसते. मग मेस चा खर्च तो कसा देणार? मग काॅलेजला रोज कसं जाणार? अडचणीने मला घेरायला सुरूवात केली होती पण मला आता ही संधी सोडायची नव्हती.मी खुप वैतागलो होतो. काही सुचत नव्हते. शेवटी मेसची चिंता नको,आम्ही हाताने जेवण बनवू, दररोज काॅलेजला चालत जाउ, लातुरात राहिलो तर बसच्या पासचे पैसे वाचतील, मी व मोठा भाऊ राहतो असे ठरले, हा तोडगा आम्हा सर्वांसाठी सुसह्य होता.वडिलांनी क्लास पाहीला होता, तेथील मुले पाहिली होती. त्यांना मी तिथं शिकावं ही इच्छा होती. ती कशी तरी जुळवून आणायचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न होता. जुळवाजुळव सुरू झाली. दिवस सरत होते. एके दिवशी मला खुप गंभीर झालेले पाहून वडीलांनी विचारले, मी त्यांना अगदी कळवळून बोललो, लातूर मधे राहिलो तर फायदा होईल. बोलता बोलता डोळ्यात पाणी आले. वडीलांना एकदम जाणीव झाली की मी किती गंभीर आहे. त्यांनी पुर्व तयारी नसताना माझी अवस्था पाहून मला सांगितले, "ठिक आहे ऊद्या रूम शोधू" हातात काहीच नसताना स्वप्न पाहणारा मी आणी ती कदापिही परवडत नसताना त्याच्या साठी स्वतःस वेठीस धरणारे माझे आईवडील...जर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणी जर मला व माझ्या स्व्प्नांना किंमत दिली नसती तर ....तर कदाचित ही कथा लिहायला मला संधी मिळाली नसती...परिस्थितीच्या क्रूर पंजाखाली माझी कथा अशीच अस्तंगत झाली असती. मी माझे स्वप्न हे फक्त माझे नव्हते, ते आम्हा सगळ्यांचा जिवनध्यास बनला होता, आईवडिल, दोन्ही भाऊ यांनी जर माझ्यावर व माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला नसता आणी माझ्या सोबतीला राहीले नसते तर मीही इतराप्रमाणे परिस्थितीच्या वेलीवरील एक न उमललेले फुल ठरलो असतो....माझ्या स्वप्नांच्या दिव्यास त्यांनी वादळात तेवत ठेवले आपली ओंजळ करून आणी त्याचे चटके त्यांच्या हाताला बसले...कितीदा ते हात माझ्यासाठी इतरांकडे विनवणीचा व्यवहार करत होते..आज आठवले तरी जिव कासावीस होतो.....
दुस-या दिवशी मी आणी माझे वडील...ते पुढे मी मागे..(..हाॅस्टेलची आठवण...फक्त त्यांच्या खांद्यावर लोखंडी पेटी नव्हती आणी माझ्या हातात पिशवी.. ) आम्ही रूम शोधायला सुरूवात केली. आजही तो क्षण आठवतो..ज्या भागात मातीच्या खोल्या आहेत तिकडून आमची सुरूवात झाली..झोपडपट्टीचा तो भाग..मी पाहतो आहे , वडील ही पाहत आहेत सरतेशेवटी तेच म्हणाले ईकडे नको , कारण इथे तुला रात्री यायला जायला अडचण होईल. मी तर अशा मानसिकतेत होतो की कसेही होवो , कसलीही असो एक खोली मिळावी बस्स!! सरतेशेवटी एक दहा बाय दहाची खोली (इतर कोणीच घेत नसल्यामुळे) आम्हाला मिळाली. घरमालक आज्जी चांगली व ग्रामीण भागातील असल्याने तेथे राहणे निश्चित झाले. आम्ही सामान घेवून रूमवर आलो. रोज सकाळी आम्ही लवकर ऊठून काॅलेजला चालत जायचो. ते संपले की आल्यावर दोन्ही वेळचा एकदमच स्वयंपाक.. मग मी क्लास कडे जाऊन अभ्यास करायचो...रूटीन बसलं होतं...जाण्या येण्याच्या वेळी मी डायरीत काढलेले व पाठांतराचे मुद्दे सोबत घेवून ते पाठ करत करत जात येत होतो. वेळ सत्कारणी लावत होतो. एक बेभान अवस्था आली होती. कोण काय म्हणेल.? काय समजेल? कसलीच तमा नव्हती. ...आता क्लासमधला माझा दर्जा उन्नत होत होता...मी ऊन्नत होत होतो...मला आत्मविश्वास येत चालला होता...
एकदा अशीच परिक्षा झाली आणी तिच्या अनुषंगाने एक कार्यक्रम क्लासवर ठेवला..त्याला प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर यांना बोलावले गेले...सरांना MPSC करणारी मुले आहेत हे कळल्याने त्यांनी कुठलाही राजशिष्टाचार न बाळगता येतो म्हणून सांगीतले. सर वेळेवर आले. त्यांनी आमचा गुणगौरव केला..आणी तुम्ही माझ्याच काॅलेजचे विद्यार्थी आहात, आपल्या काॅलेजच्या क्लास मधे काय कमतरता आहे म्हणून विचारणा केली. आम्ही चिडीचूप झालो काय बोलावे सुचत नव्हते. आम्ही धर्मसंकटात सापडलो होतो. पण सरांनी आश्वासक सुरात सांगितले की, इकडल्या चांगल्या बाबी आपण आपल्या काॅलेज मधे करू, तुम्ही जेथे चांगलं मार्गदर्शन मिळेल तेथे जाणे योग्यच आहे. हे ऐकल्यावर मग आम्ही सरांना दोन्ही बाजुची तुलना करून सांगितली. सर जरी गुणवत्तेचे पारखी असले तरीही ते खातरजमा करणारच ! हाच त्यांचा गुण "लातूर पॅटर्न " महाराष्ट्राला देवून गेला. सरांनी सांगितले की या क्लासची मुले आणी काॅलेजच्या क्लासची मुले यांचे एक डिस्कशन ठेऊ आणी मग निर्णय घेवू... झाले म्हणजे युध्दच!!!!
क्लासतर्फे मी, सागर, मुकरम भैय्या आणी नितीन, सचिन जाणार ठरले...भुगोल चर्चेचा विषय ठरला. मी खुप जिव तोडून अभ्यास केला. आम्ही सगळेच तयारी करत होतो. शेवटी आम्ही काॅलेजच्या क्लासला गेलो. तेथील आख्खा क्लास विरूद्ध आम्ही. प्रश्नाना तोंड फुटले. अटितटीने प्रश्न विचारले जाऊ लागले. मी लहान असल्याने मला जास्त संधी मिळाली. विचारलेल्या सा-याच प्रश्नाची उत्तरे आम्ही देत असल्याने काॅलेजच्या मुलामुलींना आश्चर्य वाटू लागले. रोजचेच मित्र पण झुंजच लागली, आम्ही अत्यंत योग्यरित्या ऊत्तरे दिल्याने शिक्कामोर्तब झाले की, काॅलेजमधील क्लास मधे सुधारणा अपेक्षीत आहे आणी ते करण्यासाठी तांबे सर!!!!! म्हणजे आता आमचे क्लास काॅलेजवर होणार!!! पुन्हा उलट , मग मी रूम कशाला केली?? पण आम्ही ठरवले की आता काही बदल नको, फक्त अभ्यास करायचा..
तांबेसरच क्लासला शिकवायला काॅलेजवर येत असल्याने आता सगळेच उन्नत होत होते, माझे आर्थिक नुकसान झाले असले तरी एक प्रचंड मोठा फायदा झाला होता आता तेथे विविध विभागातून सिरीयस कॅन्डिडेट त्या क्लासला येत होते..शर्यतीचा पट विस्तारला होता..आणी स्पर्धेसाठी मला स्फुरण चढत होते....मी पटावर उतरलो होतो....आता झुंज सुरू झाली होती......(क्रमशः)
प्रताप
भाग 11 : स्पर्धेची झुंज.......!!!
बिए प्रथम वर्ष... परिक्षा झाली. सुट्ट्या लागल्या. या सुट्ट्यात मी पुर्वपिठीके प्रमाणे पुन्हा कामाला गेलो. बाॅयलर, स्टिम, प्रेशर....माळरान, पाऊलवाट...निःशब्द संवाद, मुक्या आवाजात स्वतःशी बोलणे...मनाची घालमेल...लातुरची ओढ...काॅलेजची आठवण...सुट्टी आली की ती अभ्यासाचा असलेला माझा पुर्ण सेट अप बदलवून टाकायची आणी जीवनाच्या सेट अप मधे मला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करायची ...मी तगत रहायचो कारण मला माहिती असायचं हे असं काम करणं फक्त सुट्ट्या पुरतं आहे. नंतर आपला अभ्यास करायला मिळणारच आहे. पण " काळाच्या कळा सोसल्याशिवाय यश जन्माला येत नाही, आणी त्या सोसाव्याच लागतात!!!" मी सोसत होतो गुमान!
सुट्ट्यात लिहीत होतो काहीबाही...घरच्यांना तो पर्यंत समजत होते की मी MPSC ने पछाडलो आहे. आणी ही बाधा चांगलीच होती..पण तुटपुंज्या साधनांनी साध्य प्राप्त करण्याचे आव्हान मला जास्त मागे रेटत होते.कशाबशा सुट्ट्या संपल्या...काॅलेज सुरू झालं...मी अत्यंत उत्सुकता व उत्साह घेवून महाविद्यालयात आलो..अलिकडे मार्क्स चांगले पडायचे त्यामुळे निकालाचे टेन्शन नव्हते..मी अभ्यासाला सुरूवात केली..काॅलेजची अभ्यासिका..क्लास पूर्ववत सुरू झाले..मी पुन्हा माझ्या रूटीन मधे आलो..पण रूटीन सोडुन करण्यासाठी जो मनसुबा मी आखला होता तो अजुन काही दृष्टीक्षेपात येत नव्हता. मी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत होतो..पण किती,कोठे, कसा ...सगळा अंधारच....पण अंधार येतोच मुळी प्रकाशमान करण्यासाठी!!!!
एके दिवशी मी अभ्यासिकेत बसलो होतो,आणी खुप गंभीर होऊन वाचत होतो..त्यावेळी एक अत्यंत ऊंच(मनाने तर त्याहून ही ऊंच) असणारा सिनियर मुलगा हळुच जवळ आला व त्याने विचारले"MPSC चा अभ्यास करत आहेस का?" मी प्रथमच MPSC चे थेट नाव घेवून कोणीतरी विचारत आहे म्हणून थोडा सजग झालो, आणी मी जबाबदार आवाजात त्याला सांगितले "हो भैय्या!!" कारण मला त्याचे नाव माहित होते.......... मुकरम काझी!! ( जो नंतर खरंच माझ्या आयुष्याला ख-या वळणावर घेऊन येणारा पहिला दिशादर्शक व्यक्ती ठरला जर मुकरम भैय्या नसते तर मी MPSCच्या अंधारात किती दिवस चाचपडत असतो माहित नव्हते, काही लोक स्वतः सारखेच इतरांचेही आयुष्य मौल्यवान असते याचे भान बाळगून असतात ते भान असणारा हा व्यक्ती, सदैव मित्रांच्या भल्यासाठी अहोरात्र तत्पर असणारा हा व्यक्ती आजही मित्रासाठी झिजत असतो..MPSC मधे असताना तिने कधी यांना यशाचे दान दिले नाही पण इमानदारीने MPSC चाअभ्यास करणा-या व त्यासाठी धडपडणा-या लातूर मधिल मुलांचा हा दिग्दर्शक व्यक्ती..पुस्तकाच्या दुकानावर गेले असताना तिथे आपल्या मुलास फक्त 1500 रूपयांची पुस्तके घे म्हणुन सांगणा-या त्या मुलाचे वडील , पण जास्त पुस्तके घ्यायची आहेत याची तळमळ असणारा तो मुलगा या दोघांची घालमेल पाहून त्यांची कुठलीही पुर्व ओळख नसताना निव्वळ माणुसकीसाठी स्वतः मदत करून, नंतर त्या मुलाला स्वतः सोबत ठेऊन त्याचे सहकार खात्यात सिलेक्शन होईपर्यंत त्याला मदत करणारा एक दिलदार व ऊमदा व्यक्ती , म्हणजे हा माणुस....हेच नाही तर त्यांच्या आख्ख्या घराला शिक्षणाचे वेड असणारे हे कुटुंब, मुकरम भैय्या व त्यांच्या भाऊ व एक बहिण यांच्या मिळालेल्या सर्व डिग्री यांची बेरीजच माणसाला थकवून टाकेल...सुदैवाने तिघेही भावंडे आज शासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. मुकरम भैय्या स्वतः पोलीस खात्यात वायरलेस विभाग, लहान भाऊ लातूर पोलीस मधिल एक झंझावात तर त्यांची लहान बहिण, दिदी या वर्षी आपली पहिली नोकरी करत असतानाच सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून निवडली गेली आहे. अत्यंत प्रगतीशील विचार असणारे हे कुटुंब, व आपल्या मुलांना असा विचार देणारे त्यांचे अत्यंत ऊमदे वडील , आदरणीय चाचा!! मला अत्यंत प्रेमाने वागवणारे, पोलीस खात्यात अत्यंत ईमानदारीने काम करून नावारुपाला आलेले, आणी मला भेटल्यास अत्यंत मित्रत्वाने भेटून चहा पित पित MPSC बद्दल व मुकरम भैय्याच्या अभ्यासाबद्दल चर्चा करणारे आणी उत्साह वाढवणारे व्यक्ती! दुर्दैवाने चाचा यांचे अकाली व अपघाती निधन झाले. ते तिघा मुलांचे सिलेक्शन पाहू शकले नाहीत, पण या तिघांना जी सामाजिक समज त्यांनी दिली त्यायोगेच हे तिघेही घडले. चाचा गेले आणी मुकरम भैय्याने आख्खे कुटुंब योग्य मार्गावर नेले. अत्यंत जबाबदार व संवेदनशील मनाचा हा व्यक्ती ज्यांच्या ज्यांच्या सोबत जुडला त्या त्या व्यक्तीला त्यांनी मदतच केली आहे...एवढे सारे मुकरम भैय्या बद्दल लिहिणे या साठी की ज्या व्यक्तीने माझी अभ्यासिकेत वर्षभर धडपड पाहिली व माझ्यावर लक्ष ठेवले, माझा लेखाजोखा ठेवला आणी योग्यवेळी मला मदतीचा हात दिला तो पहिला व्यक्ती हाच!! माझा जिवलग मित्र आणी माझ्या कुटुंबा साठी एक सन्माननीय सदस्य!! "शुक्रिया भैय्या ! कुछ लोग फ़रिश्ते होते है। आप वही हो।") मी MPSC चा अभ्यास करतो हे ऐकुन त्यांनी म्हटले, "असा एकट्याने कसा अभ्यास होईल?? तुला खरंच अभ्यास कसा असतो आणी तो कसा करतात बघायचा आहे का??" मी एकदम स्तब्ध झालो! आणी नकळत तोंडून शब्द निघाले"प्लिज!"यावर एक आश्वासक स्मितहास्य करून, मुकरम भय्याने सांगितले , तु टेन्शन मत ले भाई! हम जाएंगे शाम मे, तुझे अच्छे और सीरियस कॅन्डिडेटसे मिलाता हूँ । तु सीरियस पढता है इसलिए मैने बताया ।" मी लगेच होकार भरला. आणी सायंकाळ व्हायची वाट पाहत बसलो. मी खुप अस्वस्थ झालो होतो. मला सायंकाळ कधी होते याची प्रतिक्षा होती. मला मुकरम भैय्याने 5.00 वाजता नंदी स्टाॅपला यायला सांगितले होते. काॅलेज ते नंदी स्टाॅप हे अंतर साधारणतः 3.5 कि.मी. होते. मी साडेतीन वाजताच काॅलेजवरून निघालो, कारण चालत जायला मला वेळ लागला असता....अॅटोने पोहोचण्याची व्यवस्था होउ शकेल एवढे पैसे होते पण तेथे गेल्यास सहज चहा पाजण्याची वेळ आली तर काय? या टेन्शनमध्ये मी चालत निघालो. जाता जाता मी अनेक विचार करत होतो..काय असेल तेथे? कुठली मुले असतील? आपण तेथे अॅडजेस्ट होऊ शकु का? मुकरम तसा चांगला माणुस आहे...तेथे ग्रुप मेंबर व्हायच्या काय अटी असतील???? वगैरे..
मी साडेचार पर्यंत तेथे पोहोचलो. मुकरम भैय्या पाच वाजता हजर झाले. त्यांनी मला त्यांच्या गाडीवरती बसवून घेतले आणि आम्ही निघालो..तो एरीया माझ्या ओळखीचा होता. कारण आठवीला असताना मी याच रस्त्यावरून शाळेत जात होतो. आम्ही एका बिल्डींग जवळ पोहचलो. मला जातानाच त्यांनी समजवून सांगितले होते की, घरमालकाला तेथे गोंधळ चालत नाही तु काही न बोलता गुपचूप माझ्या सोबत चलशील. मी सांगीतल्या प्रमाणे केले. मी गुपचुप वरच्या मजल्यावर त्यांच्या सोबत पोहचलो.तेथे गेल्यावर दिसले की, खाली सतरंजी टाकली आहे. समोर भिंतीवर एक फळा टांगलेला होता. काही खडुचे तुकडे व्यवस्थित ठेवले होते. पोहचल्यावर मी पाहीले, मुकरम भैय्याने पण खडुचे स्वतः जवळील तुकडे काढून तेथे ठेवले. आणी सांगितले मला की, "काॅलेज मे क्लास मे बहोत टुकडे गिरे रहते है। वही ऊठाके लाया हूं, उससे आराम से अपने तिन चार दिन के क्लास की राइटिंग अॅडजेस्ट हो जाती है। " यावरून मला तात्काळ अंदाज आला की येथे असेच आपल्या सारखे गरीब पण होतकरू मुलं अभ्यास करतात. ज्यांना जाणीव आहे. साडेपाच वाजता मला तेथले स्वरूप समजले की, तांबे सर ज्यांना तेथील सगळे मुलं भैय्या म्हणतात त्यांनी हा ग्रुप तयार केला आहे. व येथील सर्व मुले एकत्र पैसे जमा करून त्यातुन खर्च भागवत अभ्यास करतात व तांबे सर तेथे शिकवतात. सहा वाजेपर्यंत हळूहळू मुलं जमायला सुरूवात झाली. सागर पुदाले, नितीन सिरसाट, अशोक गिराम, चंद्रशेखर ऊत्के, सोमनाथ रेड्डी ( नंतरAPO ),संजय (नंतर STI) , उज्ज्वला मॅडम (नंतर PSI),सचिन काळे, अश्विनी मॅडम हे सर्व सिनियर तेथे जमा झाले. आणी तांबे सर यांनी प्रवेश करून ओळख करून घेतली. आणी पहिल्याच लेक्चर मधे समजले, मी आजपर्यंत अभ्यास केला होता पण MPSC चा अभ्यास त्यात फार कमी होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व सिरीयस लेक्चर झाले. डोळे उघडले. MPSC, काय असते, कशी परिक्षा असते, अभ्यासक्रम काय असतो, कसा अभ्यास करावा लागतो,संदर्भ साहित्य काय असते या बद्दल अचुक माहिती मिळाली. मी एकदम स्तब्ध होतो. मुकरम भैय्याने ओळखले, आणी म्हटले, मैने बोला था ना तुझे।मी होकार भरला आणी न विचारता, न सांगता मी त्या ग्रुप चा सदस्य झालो. मी दररोज तेथे जाऊ लागलो.आवश्यक ती फिस मी घरी बोलून व इकडुन तिकडुन जमा केली, तांबेसर एकदम सुंदर शिकवायचे, वर्गात असतानाच शिकवलेले लक्षात राहील अशी त्यांची पध्दत. मुलं अनौपचारिक पण अत्यंत व्यावसायिक पध्दतीने तयारी करत. टेस्ट, ग्रुप डिस्कशन , सिलॅबस, स्वंयमुल्यमापन या बाबी समजत चालल्या होत्या. दिवसेंदिवस काॅलेजच्या क्लास मधून मुलं कमी होवून इकडे जमु लागली..त्या पैकी अनिरुद्ध कुलकर्णी , प्रदीप राऊत ( सहकारी बॅकेत सध्या रुजू)हेही तिकडे जाॅइन झाले. ग्रुप मधिल काही इतर जण पण शिकवायचे.
मी सकाळी काॅलेज, नंतर लाएब्रेरी आणी रात्री क्लास करून मग गावी जात होतो. आता रस्ता सापडला होता पण धावण्यासाठी आवश्यक वेळ मिळत नव्हता. गावी गेले की ती रूम, तो बल्ब आणी मनात प्रकाशाची व्यापकता...क्लास मधे टेस्ट व्हायच्या एकाचढ एक मुलं अभ्यास करायचे. अधून मधून माझाही नंबर यायला लागला.कधी तो गेला की जिद्द वाटायची की आपण असं मागे पडायला नाही पाहिजे , मग त्वेषाने अभ्यास सुरू व्हायचा आणी त्याचा फायदा पुढल्या परिक्षेत व्हायचा. या वरून एक जाणिव झाली की जिद्दीने, त्वेषाने अभ्यास केलातर आपण स्पर्धेत राहू शकतो, टिकू शकतो...तेथे जमलेले सगळे गंभीर होते. त्यामुळे अभ्यासाशिवाय इतर कुठला विषयच असायचा नाही.
मला हळुहळु जाणीव होत होती की, गावाकडून येण्याजाण्यात खुप वेळ जात आहे. आपण क्लासच्या आजुबाजुला जर राहू शकलो तर आपण जास्त अभ्यास करू शकतो. आपल्याला जास्त वेळ मिळेल. इतर मुलं आपल्या पेक्षा जास्त वेळ बसतात त्यामुळे ते वेगाने पुढे निघून जात आहेत. या बाबत इतर सहकारी मित्रांनी पण दुजोरा दिला. मन घट्ट करून या बाबत घरी बोललो. पण घरी एक अडचण होती. एकदमच तीनचार हजार रूपये कसेही करून जुळवता येतील पण दर महिन्याला नियमीतपणे भाडं कसं देणार? खेड्यात दर महिन्याला पैसे येतीलच याची काही हमी नसते. मग मेस चा खर्च तो कसा देणार? मग काॅलेजला रोज कसं जाणार? अडचणीने मला घेरायला सुरूवात केली होती पण मला आता ही संधी सोडायची नव्हती.मी खुप वैतागलो होतो. काही सुचत नव्हते. शेवटी मेसची चिंता नको,आम्ही हाताने जेवण बनवू, दररोज काॅलेजला चालत जाउ, लातुरात राहिलो तर बसच्या पासचे पैसे वाचतील, मी व मोठा भाऊ राहतो असे ठरले, हा तोडगा आम्हा सर्वांसाठी सुसह्य होता.वडिलांनी क्लास पाहीला होता, तेथील मुले पाहिली होती. त्यांना मी तिथं शिकावं ही इच्छा होती. ती कशी तरी जुळवून आणायचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न होता. जुळवाजुळव सुरू झाली. दिवस सरत होते. एके दिवशी मला खुप गंभीर झालेले पाहून वडीलांनी विचारले, मी त्यांना अगदी कळवळून बोललो, लातूर मधे राहिलो तर फायदा होईल. बोलता बोलता डोळ्यात पाणी आले. वडीलांना एकदम जाणीव झाली की मी किती गंभीर आहे. त्यांनी पुर्व तयारी नसताना माझी अवस्था पाहून मला सांगितले, "ठिक आहे ऊद्या रूम शोधू" हातात काहीच नसताना स्वप्न पाहणारा मी आणी ती कदापिही परवडत नसताना त्याच्या साठी स्वतःस वेठीस धरणारे माझे आईवडील...जर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणी जर मला व माझ्या स्व्प्नांना किंमत दिली नसती तर ....तर कदाचित ही कथा लिहायला मला संधी मिळाली नसती...परिस्थितीच्या क्रूर पंजाखाली माझी कथा अशीच अस्तंगत झाली असती. मी माझे स्वप्न हे फक्त माझे नव्हते, ते आम्हा सगळ्यांचा जिवनध्यास बनला होता, आईवडिल, दोन्ही भाऊ यांनी जर माझ्यावर व माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला नसता आणी माझ्या सोबतीला राहीले नसते तर मीही इतराप्रमाणे परिस्थितीच्या वेलीवरील एक न उमललेले फुल ठरलो असतो....माझ्या स्वप्नांच्या दिव्यास त्यांनी वादळात तेवत ठेवले आपली ओंजळ करून आणी त्याचे चटके त्यांच्या हाताला बसले...कितीदा ते हात माझ्यासाठी इतरांकडे विनवणीचा व्यवहार करत होते..आज आठवले तरी जिव कासावीस होतो.....
दुस-या दिवशी मी आणी माझे वडील...ते पुढे मी मागे..(..हाॅस्टेलची आठवण...फक्त त्यांच्या खांद्यावर लोखंडी पेटी नव्हती आणी माझ्या हातात पिशवी.. ) आम्ही रूम शोधायला सुरूवात केली. आजही तो क्षण आठवतो..ज्या भागात मातीच्या खोल्या आहेत तिकडून आमची सुरूवात झाली..झोपडपट्टीचा तो भाग..मी पाहतो आहे , वडील ही पाहत आहेत सरतेशेवटी तेच म्हणाले ईकडे नको , कारण इथे तुला रात्री यायला जायला अडचण होईल. मी तर अशा मानसिकतेत होतो की कसेही होवो , कसलीही असो एक खोली मिळावी बस्स!! सरतेशेवटी एक दहा बाय दहाची खोली (इतर कोणीच घेत नसल्यामुळे) आम्हाला मिळाली. घरमालक आज्जी चांगली व ग्रामीण भागातील असल्याने तेथे राहणे निश्चित झाले. आम्ही सामान घेवून रूमवर आलो. रोज सकाळी आम्ही लवकर ऊठून काॅलेजला चालत जायचो. ते संपले की आल्यावर दोन्ही वेळचा एकदमच स्वयंपाक.. मग मी क्लास कडे जाऊन अभ्यास करायचो...रूटीन बसलं होतं...जाण्या येण्याच्या वेळी मी डायरीत काढलेले व पाठांतराचे मुद्दे सोबत घेवून ते पाठ करत करत जात येत होतो. वेळ सत्कारणी लावत होतो. एक बेभान अवस्था आली होती. कोण काय म्हणेल.? काय समजेल? कसलीच तमा नव्हती. ...आता क्लासमधला माझा दर्जा उन्नत होत होता...मी ऊन्नत होत होतो...मला आत्मविश्वास येत चालला होता...
एकदा अशीच परिक्षा झाली आणी तिच्या अनुषंगाने एक कार्यक्रम क्लासवर ठेवला..त्याला प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर यांना बोलावले गेले...सरांना MPSC करणारी मुले आहेत हे कळल्याने त्यांनी कुठलाही राजशिष्टाचार न बाळगता येतो म्हणून सांगीतले. सर वेळेवर आले. त्यांनी आमचा गुणगौरव केला..आणी तुम्ही माझ्याच काॅलेजचे विद्यार्थी आहात, आपल्या काॅलेजच्या क्लास मधे काय कमतरता आहे म्हणून विचारणा केली. आम्ही चिडीचूप झालो काय बोलावे सुचत नव्हते. आम्ही धर्मसंकटात सापडलो होतो. पण सरांनी आश्वासक सुरात सांगितले की, इकडल्या चांगल्या बाबी आपण आपल्या काॅलेज मधे करू, तुम्ही जेथे चांगलं मार्गदर्शन मिळेल तेथे जाणे योग्यच आहे. हे ऐकल्यावर मग आम्ही सरांना दोन्ही बाजुची तुलना करून सांगितली. सर जरी गुणवत्तेचे पारखी असले तरीही ते खातरजमा करणारच ! हाच त्यांचा गुण "लातूर पॅटर्न " महाराष्ट्राला देवून गेला. सरांनी सांगितले की या क्लासची मुले आणी काॅलेजच्या क्लासची मुले यांचे एक डिस्कशन ठेऊ आणी मग निर्णय घेवू... झाले म्हणजे युध्दच!!!!
क्लासतर्फे मी, सागर, मुकरम भैय्या आणी नितीन, सचिन जाणार ठरले...भुगोल चर्चेचा विषय ठरला. मी खुप जिव तोडून अभ्यास केला. आम्ही सगळेच तयारी करत होतो. शेवटी आम्ही काॅलेजच्या क्लासला गेलो. तेथील आख्खा क्लास विरूद्ध आम्ही. प्रश्नाना तोंड फुटले. अटितटीने प्रश्न विचारले जाऊ लागले. मी लहान असल्याने मला जास्त संधी मिळाली. विचारलेल्या सा-याच प्रश्नाची उत्तरे आम्ही देत असल्याने काॅलेजच्या मुलामुलींना आश्चर्य वाटू लागले. रोजचेच मित्र पण झुंजच लागली, आम्ही अत्यंत योग्यरित्या ऊत्तरे दिल्याने शिक्कामोर्तब झाले की, काॅलेजमधील क्लास मधे सुधारणा अपेक्षीत आहे आणी ते करण्यासाठी तांबे सर!!!!! म्हणजे आता आमचे क्लास काॅलेजवर होणार!!! पुन्हा उलट , मग मी रूम कशाला केली?? पण आम्ही ठरवले की आता काही बदल नको, फक्त अभ्यास करायचा..
तांबेसरच क्लासला शिकवायला काॅलेजवर येत असल्याने आता सगळेच उन्नत होत होते, माझे आर्थिक नुकसान झाले असले तरी एक प्रचंड मोठा फायदा झाला होता आता तेथे विविध विभागातून सिरीयस कॅन्डिडेट त्या क्लासला येत होते..शर्यतीचा पट विस्तारला होता..आणी स्पर्धेसाठी मला स्फुरण चढत होते....मी पटावर उतरलो होतो....आता झुंज सुरू झाली होती......(क्रमशः)
प्रताप
Wednesday, October 17, 2018
स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 10 : स्वप्ननाची पाऊलवाट रेखताना.....!!!
स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 10 : स्वप्ननाची पाऊलवाट रेखताना.....!!!
बारावीच्या नंतर बि.ए. ची सुरूवात झाली. राज्यशास्त्र , लोकप्रशासन व इंग्रजी साहित्य हे विषय मी घेतले. वर्ष सुरू झाले. आणी मी नुकताच डि एड न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला MPSC साठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मला माझा निर्णय चुकु द्यायचा नव्हता. मला माझं आयुष्य गुलाबासारखं फुलवता येईल की नाही माहित नव्हतं पण भर वैशाख वणव्यात फुलणा-या गुलमोहरा सारखा मी नक्कीच त्याला जुळवणार होतो. मी शिकायला सुरूवात केली....आणी मी दुसरे करू तरी काय शकत होतो!
जुने मित्र निघून गेले, नविन मित्र मिळाले. वर्ष सुरू झालं तसा अभ्यास ही सुरू झाला. घेतलेले विषय सखोल शिकवले जात असत.पण हवे ते सापडत नव्हते. जिव कासावीस होत रहायचा. MPSC चा अभ्यास करायचा होता. काय करायचे सुचत नव्हते. सकाळी गावावरून निघायचे, काॅलेजला यायचे, शिकवलेले समजुन घ्यायचे. 2.00 वा. काॅलेज सुटायचे. पण बारावीची सवय होती. आणी गावात लवकर जाऊन करण्यासाठी काही नव्हते. ना गावात कुठली सुविधा ना वातावरण. सगळ्या खेड्यासारखे हे ही एक गाव, जिथे शेती, मजुरी किंवा रिकामटेकडेपणा या शिवाय चौथा पर्याय नव्हता. आणी ओढीने घराकडे जायला ना शेती होती ना धंदा. सोबत करता येईल असे मित्र ही गावात नव्हते. तसेच काॅलेज सुटल्यानंतर टाईमपास करत फिरायला खिशात पैसा तरी हवा , पण तो ही नसल्याने एकमेव चांगला आणी सुसह्यय पर्याय होता तो म्हणजे काॅलेजची लाएब्रेरी...आणी मी तिथे बसायला सुरूवात केली. मी तिथे बसत होतो आणि झपाटून वाचत होतो. पण त्याला ना दशा होती ना दिशा....पण । प्रयत्नांती परमेश्वर । म्हणतात...
मी काही तरी वाचतो, जास्त वेळ बसतो हे सिनीयर्सच्या दोन मुलांनी पाहिले. व ते माझ्या आसपास बसु लागले. एक होते प्रकाश मस्के व दुसरे होते तोडकर. तेही असेच तगमगणारे व झगडणारे होते. त्यांनी मला काय करतोस म्हणून विचारले? मी त्यांना खुप अदबीने सांगितले की मी एमपीएससीची तयारी करण्यासाठी वाचत आहे. त्यावर त्यांनी मला सांगितले की, आम्हाला पण काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे. आपण मिळून अभ्यास करू. मला खुप आनंद झाला कारण मला एमपीएससीच्या नावाने चिडवणारे खुपजण होते पण कोणी तरी त्याला गांभीर्याने घेतले होते. मस्के हे बाभळगाव चे रहिवासी, दररोज ते माझ्यासारखेच अपडाऊन करणारे. तर तोडकर हे लातुरमधेच रहायचे. आम्ही तिघांनीही खुप भाराऊन आणी गांभीर्याने ठरवून टाकले की खुप अभ्यास करायचा.पण हे असे होते की, आम्ही गावाला जायचे पक्कं केलं पण कोणत्या आणी कसे? हे मात्र माहिती नव्हतं...पण प्रत्यक्षात कृतीला सुरूवात झाली होती...मला खुप हुरूप आला होता..कसा आणी किती अभ्यास करावा याचेच पिसे मला लागले होते. आम्ही विस्कळीत का होईना पण खुपच अभ्यास करत होतो. मस्के आणी मी खेड्यातले असल्याने एकमेकांशी ट्युनिंगने राहत होतो. ते ही दुपारचा डबा आणायचे. मग मी ही डबा न्यायचो. आम्ही काॅलेज सुटल्यानंतर जो आणी जसा असेल तो डबा खायचो. आणी अभ्यास करायचो. काही दिवसांनी काॅलेजच्या नविन इमारतीचे काम सुरू झाले. आणी लायब्ररीच्या गर्दीत वाढ झाल्याने आम्ही तिघांनी ठरवले की वेगळ्या ठिकाणी अभ्यास करू. आणी आजही डोळ्यांसमोर ते दिवस येतात...आठवले तरी पोटात कालवा कालव होते..आम्ही शांत वेळ मिळेल म्हणून त्या बांधकामाचं काम सुरू असलेल्या इमारतीत कोणाला कळणार नाही अशा पध्दतीने अभ्यासाला बसू लागलो...जणू काही आम्ही आयुष्याचं बांधकाम काढलं होतं....
मी एकाचवेळी अनेक भूमिकेत होतो. रेग्युलर काॅलेज मधे रेग्युलर विद्यार्थी, भरपूर मित्र मैत्रिणी. आणी ते सगळे घरी गेले की एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी, मित्रासाठी भांडणारा मुलगा, एनएसएस मधे सक्रिय सहभाग,आणी स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात लक्षणीय व बक्षिस मिळेपर्यंत सहभाग.पण हे सगळं चाललं होतं एका "आएडेंटिटी क्रायसीस" साठी ! मला माझी ओळख निर्माण करायची होती. सर्व सिमा तोडायच्या होत्या. लांघायची होती ही आयुष्यातील अंतरे! मी जवळपास सगळंच करत होतो. पण पुर्णत्वाचा साधा आभासही होत नव्हता. फक्त एक होतं मात्र! मी इतरा सारखा नाही हे मला कळायला सुरूवात झाली होती. माझे हे दोन्ही सिनीयर्स आणी मी अभ्यासा सोबतच अत्यंत भावनिकतेने भविष्या बद्दल बोलायचो. त्यामुळे झगडण्याची जिद्द वाढली. आणी स्वप्न पेरून जर त्यांची नीट मशागत केली तर ते मुळ धरतातच !!!! याचा आलेला पहिला प्रत्यय म्हणजे शाहू काॅलेज जे महाराष्ट्रालाच नाही तर पुर्ण देशाला ज्याने मेरिट, मेडिकल व इंजिनियरींग साठीचा "शाहू पॅटर्न " , "लातूर पॅटर्न " दिला त्या महाविद्यालयास नावारुपाला आणणारे आदरणीय प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर यांची नेहमीच एक खंत असायची की, आपण महाराष्ट्राला दर वर्षी शेकड्याने मेरिटचे विद्यार्थी देतो. पण आपण आज पावेतो स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काहीच करू शकत नाही, या साठी त्यांनी काॅलेज मधे नव्याने रूजू झालेल्या प्राध्यापकांना घेवून महाविद्यालयातच " स्पर्धा परीक्षा" विषयक वर्ग प्रथमच सुरू केले!!! त्यांचा हेतू अत्यंत प्रामाणिक होता...मी एमपीएससी करायला सुरूवात (पण तशी ती फक्त भावनिकच होती हे नंतर कळले) केली आणी त्याचवेळी व वर्षी काॅलेजने हे क्लास सुरू केले....शुभशकूनच होता हा!!!!!
मी माझ्या सिनियर सह त्या वर्गास बसू लागलो. तेथे इच्छुक विद्यार्थी एकत्र आल्याने अजून हिंमत आली. अनिरुद्ध, मकरंद, निर्भय जाधव, प्रदिप राऊत , मनिषा (asst. Comm. Vat),असे काही सिरीयस वर्गमित्र तेथे भेटले. ते ही क्लासला यायचे. आम्ही सगळे काॅलेजचेच असल्याने आम्हाला सकाळी शिकवणारे प्राध्यापकवृंदच सायंकाळी शिकवायचे. पण महाविद्यालयीन विषय आणी एमपीएससीचे विषय यात साम्य असले तरी अॅप्रोच भिन्न असतो. महाविद्यालयात इतिहास शिकणे आणि एमपीएससी साठी इतिहास तयार करणे यात मोठा फरक असतो. हे समजत नव्हते. सगळेच अनअनुभवी पण हेतु मात्र खुप उदात्त!! आम्ही शिकत होतो. पण अपुर्णत्वाची रूखरूख येथे होतीच.पण एकट्याने दिशाहीन अभ्यास करण्यापेक्षा सामूहिक काहीतरी भरीव करण्याचा हा प्रयत्न ही आश्वासक होता...कमीत कमी या प्रयत्नांमुळे इच्छुक विद्यार्थ्यांचा संपर्क झाला. भलेही तो काॅलेजचा एक आदर्शवत उपक्रम होता. पण सर्वोत्तमचा ध्यास असणा-या जाधव सरांना आणी आम्हा विद्यार्थ्यांना अपुर्णत्वच जाणवत होते. आमच्या पैकी खुप जण काहीतरी नविन आहे म्हणून आले होते. आम्ही शिकत होतो....त्या बॅच मधिल अनेकजणांनी महाविद्यालयाची परिक्षा येण्या अगोदरच क्लास बंद केला आणि वार्षिक परिक्षा आल्याने काॅलेजने पण.....त्यातील अनेकजण आज विविध क्षेत्रात नावारुपाला आले आहेत अनिरुद्ध कुलकर्णी हा संपादन, लेखन, अनुवाद व सामाजिक संघटन यात एक अग्रणी नाव बनत आहे. तर निर्भय जाधव हा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पुण्यात एक नावाजलेले नाव आहे. ज्याच्या मार्गदर्शनातून अनेक अधिकारी घडत आहेत.फक्त चटका लावणारी एकच गोष्ट...माझ्या दोन्ही सिनीयर्स पैकी प्रकाश मस्के यांनी एमपीएससी सोडली ते गावी असतात तर तोडकर यांचा संपर्क झाला नाही. एकदा सुट्टीला गेल्यावर अचानक मस्के लातूर मधे गांधी चौकात भेटले. प्रथम मी तहसीलदार असल्याने जपून पण नंतर , (मी आजही त्याच आदराने त्यांना पाहतो याची जाणीव झाल्याने ) डोळ्यात पाणी आणून त्यांनी माझं कौतुक केलं, पाठ थोपटली. आणी भावड्या तु तरी करून दाखवलंस !अभिमान वाटतो! म्हणून भरभरून बोलले. माझ्या आयुष्याला हातभार लावणारे त्यांचे हात....जर प्रशासनात असते तर.......काही स्वप्न ऊगवतात पण मुळ धरत नाहीत.. त्याला अनंत कारणे असतात पण ..असो त्यांचा आदर कायम आहे माझ्या मनात...कारण माझ्या प्रयत्नांना त्यांनी पहिल्या टप्प्यातच खुप भावनिक आधार दिला .. आणी आज माझ्या यशाचं निर्मळ मनाने कौतुक करून त्यांनी त्यांच्या विशाल ह्रदयाचा परिचय ही दिला...
याच वर्षात महाविद्यालयीन आयुष्य भरभरून जगता आले. एनएसएसचा कॅम्प तर अविस्मरणीयच! भुकंपग्रस्तांसाठी चलबुर्गा गावात गेलेला हा कॅम्प, तेथे भुकंपग्रस्तांसाठी घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे केलेले काम, केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, उनाडपणा आणी तरीही उत्कृष्ट पथक म्हणून गौरव यातुन आपोआपच नेतृत्वगुण विकसीत होत गेला, कष्टाची सवय दृढ झाली आणी जिवाभावाचे मित्र भेटले शेळके(पिंट्या), लखादिवे,संतोष..असे खुपजण..ज्यांनी आयुष्यातील उणीवा मैत्रीने भरून टाकल्या. असेच उणीवा भरून काढणारे व सतत संपर्कात राहून प्रेरणा देणारे मित्र म्हणजे जयपाल , युसूफ, ईस्माइल, विनोद,डाॅ.संघरत्न सोनवणे( खो खो चा नामांकीत खेळाडू ते पुणे विद्यापिठाचा एक स्काॅलर विद्यार्थी व महाराष्ट्रातील वर्तमान बुध्दिवादी आगामी विचारवंत) संतोष तंत्रे (मला गाणे शिकवणारा, स्नेहसंमेलनाच्या साठी तयारी करून घेणारा संगीताचा तत्कालीन विद्यार्थी व आता संगीत महाविद्यालयाचा संचालक आणी संगीत विद्यापिठाचा सदस्य)आलोक चिंचोलकर(कोणाचेही भांडण असो आलोकने सांगितले की ते मिटणारच असा दरारा असणारा पण जेंव्हाही भेटला तेंव्हा- होतोस रे तु! अभ्यास कर म्हणून सतत आत्मविश्वास वाढवणारा महसूल खात्यातील माझा सहकारी), संजय गायकवाड (रेल्वे सेवा), महेश सुडे, प्रा. युवराज वाघमारे, सचिन आडाणे( राष्ट्रीय ख्यातीचा बास्केटबॉल खेळाडू व क्रिडा शिक्षक) असे अनंत मित्र ज्यांनी आयुष्य शिकवले व भरीव केले...तसेच मैत्रिणी ज्यांनी सामाजिक सभ्यतेचे भान ठेवत सातत्याने केलेले कौतुक...या सर्वांनी आयुष्यात अर्थ निर्माण केला. मी महाविद्यालयात एमपीएससी शिकत होतो पण वार्षिक परिक्षा आल्याने ते क्लास बंद झाले. मी काॅलेजचा अभ्यास सुरू केला.
काॅलेजचा अभ्यास सुरू केला की, आठवणारा एकमेव मित्र म्हणजे गज्या!! (गजानन सुरवसे) त्या काळातील काॅलेजचा फॅशन आयकाॅन, अत्यंत सुबक दिसणारा, हुशार पण वर्षभर स्वतःच्या धुंदित सुखी असणारा, खेळाडू (बास्केटबॉल, व्हाॅलीबाॅल) व आत्ताचा LIC -D.O., युपिएससी होता होता वाचलेला (त्यामुळे तो आजही शिव्या खातो सर्वांच्या)माझा नववी पासुनचा बालमित्र (ज्याने सदैव साथ दिली) तो अभ्यासाला यायचा. मी काढलेल्या नोट्स भांडून हक्काने वापरायचा आणी बरोब्बर स्वतःचे डोकं लावून परिक्षेत लिहायचा आणी इतरांच्या बरोबरीने मार्क्स घ्यायचा, सगळ्यांना धक्का!! वर्षभर वर्गात नियमीत नसणारा पण तरीही भरपुर मार्कस घेणारा तो अजुन भाव खाऊन जायचा. त्यातल्या त्यात मुलीमधे जास्त गाॅसिपींग असायची ती पुन्हा वाढत राहील अशी तरतुद होउन जायची. हा तो मित्र ज्याने MPSC स्वतः केली नाही . पण माझ्या MPSC च्या तयारीच्या काळात क्वालिटी इनपुट दिले व मदत केली (त्याचा संदर्भ येईलच पुढे).
या सर्व मित्रांत व विविध उपक्रमात मी राहूनही मला सतत एमपीएससीची हुरहुर असायची. मी स्वतःला खुप
ताणत होतो. कुठलीही जागा नैराशासाठी शिल्लक राहणार नाही या साठी स्वतःला गुंतवून ठेवत होतो. काही सिनियर मंडळी येता जाता मला खोचकपणे काय MPSC! काय चालले आहे म्हणून विचारायचे. मी त्यांना हसून उत्तर द्यायचो पण मनात चर्रर्र व्हायचे आणी खुणगाठ अजुन तिव्र व्हायची की, अशी टिका , खोचक शेरे आयुष्य भर नको असतील तर अभ्यास करावा लागेल. मला हरवलेले पान व्हायचे नव्हते. मला माझी गडद रेषा ओढायची होती. मला डंका पेटवायचा होता!!!!
बि ए प्रथम वर्ष हे MPSC करण्याच्या साठी कृतीशील वर्ष ठरले. या वर्षी नविन सहकारी भेटले, काॅलेज मधे क्लास होऊन तिन चार महिने नविन काही शिकायला मिळाले. मी वर्गात शिकवल्या जाणा-या अभ्यासातही MPSC चा कंटेंट पाहत असे त्यामुळे कधिकधी प्राध्यापक मंडळी अंदाज घ्यायचे. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मी इतरही संदर्भ देवून ऊत्तर देत असल्याने मला गांभीर्याने घेतले जावू लागले. वर्गातल्या काही मुलामुलींना थोडे आश्चर्य वाटायचे, ते कौतुकाने पहायचे, कधिकधी सर ही कौतुक करायचे. पण मला कधी शेफारल्या सारखं झालं नाही.किंवा मी कधि स्वतःला विशेष समजत नव्हतो, अधुन मधुन सर लोक कंट्रोल ठेऊन असायचे. एकदा मी व संतोष काॅलेज सुटल्यानंतर एका रिकाम्या वर्गात बसलो होतो. आमची चर्चा सुरू होती. चर्चेचा विषय होता गॅट करार. आम्ही बोलत होतो. फार काही क्वालिटी डिस्कशन नव्हते ते पण गोंधळ मात्र क्वालिटीचा होता! आम्ही त्वेषाने बोलत असतानाच महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर राऊंडवर असल्याने ते त्या वर्गासमोर आले हे आमच्या लक्षात आले नाही. महाविद्यालयाचा नियम होता की काॅलेज संपले अथवा लेक्चर ऑफ असेल तर एकतर काॅलेज बाहेर किंवा सरळ लाएब्रेरीत बसायचे. आम्ही तर दोन्ही नियम तोडले होते. रितसर चौकशी झाली. ओळखपत्र जप्त झाले आणी खुप बोलण्याची हौस आहे तर सायंकाळी 5.00 वा. वादविवाद स्पर्धा होत असलेल्या वर्गात भेटायला बोलावले आणी ओळखपत्र घेवून जायला सांगितले. पर्याय नव्हता, सायंकाळी 4.45 वा. घाबरत घाबरत हजर राहिलो. वर्गात बसलो. फोरम फाॅर फ्री एंटरप्रायझेस तर्फे तेथे "कामात नितीमूल्यांची आवश्यकता " या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित होती.मला वाटले ऐकायला लावतील आणी नंतर समज देवून परत पाठवतील.त्या हिशोबाने मी वर्गात बसलो होतो.सर आले, स्पर्धा सुरू झाली, स्पर्धक बोलत होते, अचानक माझ्या नावाचा पुकारा झाला. मी एकदम हबकून गेलो. मी नको ही म्हणायच्या स्थितीत नव्हतो. काही ओळखीचे स्पर्धक तेथे होते. सर पण बसलेच होते. नकार देणे म्हणजे शालजोडीतील शब्दानी सत्कार झाला असता. विचार केला बोलणी खाण्यापेक्षा बोललेलेच बरे! आणी ओळखपत्र ही परत घ्यायचे होते !! मी मनाचा हिय्या करून उठलो. मी अगोदरच ऊठायला आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेतला होता. मी उठलो, डायसवर गेलो, क्षणभर दिर्घ श्वास घेतला, आणी मी बोलायला सुरूवात केली. मी बोलत होतो सात मिनिटांचा वेळ होता मी अकरा मिनीटे बोललो. गुपचुप खाली येऊन बसलो, स्पर्धा पुर्ण होईपर्यंत बसण्या शिवाय पर्याय नव्हता. मी बसलो, माझ्यानंतर तिघेजण अजून बोलले. स्पर्धा सुरू असताना माझे सगळे लक्ष ओळखपत्रावर होते. आगाऊपणा केला असता तर सरळ घरी पत्र गेले असते. मग पालकां समोर हजेरी झाली असती. स्पर्धा संपली, निकाल जाहीर करण्याची वेळ आली. मी तो झाल्या बरोबर माझे ओळखपत्र घेवून व बोलणी खाऊन जाण्याची मानसिक तयारी करून बसलो होतो. निकाल जाहीर करायला सुरूवात झाली, अगोदर उत्तेजनार्थ बक्षिसे जाहिर झाली, तृतीय बक्षिस आणी त्यानंतर द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आणी ते मिळाल्या बाबत माझे नाव!!!! मला सर्वात अगोदर माझे ओळखपत्र मिळाले, त्या सोबत प्रमाणपत्र व बक्षिसाची रक्कम व सोबत पाठीवर थाप, एक स्मितहास्य व सोबत पुन्हा वर्गात बसून गोंधळ करायचा नाही ही समज !!!! मला त्या दिवशी खुप आश्चर्याचे धक्के बसले, व एक जाणिव झाली , आपण एवढेही वाईट बोलत नाही दिलेल्या विषयावर !!!
मोठा भाऊ राहूल आता क्लासमेट होता. त्याला चित्रकलेने झपाटले होते. तो विविध प्रयोग करून त्याचे कौशल्य वाढवत होता. तर लहान भाऊ निशांत शाळेत असतानाच वादविवाद - वक्तृत्व करायला त्याने सुरूवात केली होती. गावातले काही लोक कुजबुजत रहायचे. आम्ही मात्र आमचे वेड घेवून निघालो होतो. आईवडिल आमच्यावर नितांत विश्वास ठेवून होते. तरीही अधुन मधुन ते सातत्याने जाणीव करून द्यायचे. वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती ती चिरस्मरणात आहे "घडी(क्षण) गेली की पिढी बिघडते" ," तुमचे शिक्षण हिच आमची कमाई आहे" या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेऊन होतो. आणी माझी वर्षभराची ही चाललेली धडपड एकजण अत्यंत अलिप्त होवून पाहत होता. मी काय वाचतो, किती गंभीर आहे वगैरे माझ्या प्रत्येक हालचालींचा लेखाजोखा एक व्यक्ती ठेवत होता. फक्त त्याची खात्री पटली की मग तो पुढे येवून मला मदत करणार होता...आपण आपल्या धुंदीत चालत राहतो. पण काही लोक आपला मार्ग सुरळीत होण्यासाठी नकळत कारण बनतात. ते मार्ग सुकर करतात. मी स्वप्न पेरले होते,त्यांने मुळपण धरले होते. पण त्याची वाढ होण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार होत होती. माझ्या निष्ठेपोटी अथवा कोणाच्या तरी चांगुलपणा व तळमळीपोटी मी MPSC च्या जवळ जाणार होतो
...नियती पट आखते..काही चांगले लोकही पेरून टाकते आयुष्यात...फक्त आपण आपले सत्व टिकवायला हवे. आपली आपल्या स्वप्नांवर निष्ठा हवी...पाऊलो कोएलो च्या "द अल्केमिस्ट" यातुन मिळणारा संदेश "ध्येयवेडेपणा घेवून जर आपण निष्ठेने स्वप्नपूर्ती कडे वाटचाल करत राहिलो तर सारं जग तुमच्या मदतीला धावून येते, फक्त नियती वेळोवेळी आपल्याला संकेत देत असते व आपल्याशी स्वप्नाची भाषा बोलत असते ती आपण ओळखायला हवी व चालत रहायला हवे सतत" हा एकदम खरा आहे.याची शब्दशः प्रचिती मला आहे. फक्त स्वप्न खरी असतात, अडचणी खोट्या..अडचणीमुळे उलट आपण मजबूत व दृढ व्हायला हवे. मुलं मुली जेंव्हा सांगतात की सर माझी परिस्थिती खराब आहे, घरी अडचणी आहेत तेंव्हा खरं तर ते अडचणीला शरण जात असतात हे जाणवते , खरं तर अशा अडचणी मुळेच तर आपली स्टोरी बनत असते. त्या नसतील तर आपली स्टोरी कशी बनेल. उलट अडचणी असल्यास आपण नियतीचे आभार मानले पाहिजेत कारण तिने आपल्याला लढण्याचे कारण दिले. पाय रोवून आपण थांबायला हवे आणी भिडायला हवे प्रतिकुलते सोबत.."कौन कहता है आसमां में छेद नहीं होता । जरा तबियत से पत्थर तो उछालो यारो।" मी स्वप्न पथावरील पहिला मैलाचा दगड गाडला होता...मी पाऊलवाट रेखाटायला सुरूवात केली होती..(क्रमशः)
(प्रताप )
भाग 10 : स्वप्ननाची पाऊलवाट रेखताना.....!!!
बारावीच्या नंतर बि.ए. ची सुरूवात झाली. राज्यशास्त्र , लोकप्रशासन व इंग्रजी साहित्य हे विषय मी घेतले. वर्ष सुरू झाले. आणी मी नुकताच डि एड न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला MPSC साठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मला माझा निर्णय चुकु द्यायचा नव्हता. मला माझं आयुष्य गुलाबासारखं फुलवता येईल की नाही माहित नव्हतं पण भर वैशाख वणव्यात फुलणा-या गुलमोहरा सारखा मी नक्कीच त्याला जुळवणार होतो. मी शिकायला सुरूवात केली....आणी मी दुसरे करू तरी काय शकत होतो!
जुने मित्र निघून गेले, नविन मित्र मिळाले. वर्ष सुरू झालं तसा अभ्यास ही सुरू झाला. घेतलेले विषय सखोल शिकवले जात असत.पण हवे ते सापडत नव्हते. जिव कासावीस होत रहायचा. MPSC चा अभ्यास करायचा होता. काय करायचे सुचत नव्हते. सकाळी गावावरून निघायचे, काॅलेजला यायचे, शिकवलेले समजुन घ्यायचे. 2.00 वा. काॅलेज सुटायचे. पण बारावीची सवय होती. आणी गावात लवकर जाऊन करण्यासाठी काही नव्हते. ना गावात कुठली सुविधा ना वातावरण. सगळ्या खेड्यासारखे हे ही एक गाव, जिथे शेती, मजुरी किंवा रिकामटेकडेपणा या शिवाय चौथा पर्याय नव्हता. आणी ओढीने घराकडे जायला ना शेती होती ना धंदा. सोबत करता येईल असे मित्र ही गावात नव्हते. तसेच काॅलेज सुटल्यानंतर टाईमपास करत फिरायला खिशात पैसा तरी हवा , पण तो ही नसल्याने एकमेव चांगला आणी सुसह्यय पर्याय होता तो म्हणजे काॅलेजची लाएब्रेरी...आणी मी तिथे बसायला सुरूवात केली. मी तिथे बसत होतो आणि झपाटून वाचत होतो. पण त्याला ना दशा होती ना दिशा....पण । प्रयत्नांती परमेश्वर । म्हणतात...
मी काही तरी वाचतो, जास्त वेळ बसतो हे सिनीयर्सच्या दोन मुलांनी पाहिले. व ते माझ्या आसपास बसु लागले. एक होते प्रकाश मस्के व दुसरे होते तोडकर. तेही असेच तगमगणारे व झगडणारे होते. त्यांनी मला काय करतोस म्हणून विचारले? मी त्यांना खुप अदबीने सांगितले की मी एमपीएससीची तयारी करण्यासाठी वाचत आहे. त्यावर त्यांनी मला सांगितले की, आम्हाला पण काहीतरी चांगले करून दाखवायचे आहे. आपण मिळून अभ्यास करू. मला खुप आनंद झाला कारण मला एमपीएससीच्या नावाने चिडवणारे खुपजण होते पण कोणी तरी त्याला गांभीर्याने घेतले होते. मस्के हे बाभळगाव चे रहिवासी, दररोज ते माझ्यासारखेच अपडाऊन करणारे. तर तोडकर हे लातुरमधेच रहायचे. आम्ही तिघांनीही खुप भाराऊन आणी गांभीर्याने ठरवून टाकले की खुप अभ्यास करायचा.पण हे असे होते की, आम्ही गावाला जायचे पक्कं केलं पण कोणत्या आणी कसे? हे मात्र माहिती नव्हतं...पण प्रत्यक्षात कृतीला सुरूवात झाली होती...मला खुप हुरूप आला होता..कसा आणी किती अभ्यास करावा याचेच पिसे मला लागले होते. आम्ही विस्कळीत का होईना पण खुपच अभ्यास करत होतो. मस्के आणी मी खेड्यातले असल्याने एकमेकांशी ट्युनिंगने राहत होतो. ते ही दुपारचा डबा आणायचे. मग मी ही डबा न्यायचो. आम्ही काॅलेज सुटल्यानंतर जो आणी जसा असेल तो डबा खायचो. आणी अभ्यास करायचो. काही दिवसांनी काॅलेजच्या नविन इमारतीचे काम सुरू झाले. आणी लायब्ररीच्या गर्दीत वाढ झाल्याने आम्ही तिघांनी ठरवले की वेगळ्या ठिकाणी अभ्यास करू. आणी आजही डोळ्यांसमोर ते दिवस येतात...आठवले तरी पोटात कालवा कालव होते..आम्ही शांत वेळ मिळेल म्हणून त्या बांधकामाचं काम सुरू असलेल्या इमारतीत कोणाला कळणार नाही अशा पध्दतीने अभ्यासाला बसू लागलो...जणू काही आम्ही आयुष्याचं बांधकाम काढलं होतं....
मी एकाचवेळी अनेक भूमिकेत होतो. रेग्युलर काॅलेज मधे रेग्युलर विद्यार्थी, भरपूर मित्र मैत्रिणी. आणी ते सगळे घरी गेले की एमपीएससीचा अभ्यास करणारा विद्यार्थी, मित्रासाठी भांडणारा मुलगा, एनएसएस मधे सक्रिय सहभाग,आणी स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमात लक्षणीय व बक्षिस मिळेपर्यंत सहभाग.पण हे सगळं चाललं होतं एका "आएडेंटिटी क्रायसीस" साठी ! मला माझी ओळख निर्माण करायची होती. सर्व सिमा तोडायच्या होत्या. लांघायची होती ही आयुष्यातील अंतरे! मी जवळपास सगळंच करत होतो. पण पुर्णत्वाचा साधा आभासही होत नव्हता. फक्त एक होतं मात्र! मी इतरा सारखा नाही हे मला कळायला सुरूवात झाली होती. माझे हे दोन्ही सिनीयर्स आणी मी अभ्यासा सोबतच अत्यंत भावनिकतेने भविष्या बद्दल बोलायचो. त्यामुळे झगडण्याची जिद्द वाढली. आणी स्वप्न पेरून जर त्यांची नीट मशागत केली तर ते मुळ धरतातच !!!! याचा आलेला पहिला प्रत्यय म्हणजे शाहू काॅलेज जे महाराष्ट्रालाच नाही तर पुर्ण देशाला ज्याने मेरिट, मेडिकल व इंजिनियरींग साठीचा "शाहू पॅटर्न " , "लातूर पॅटर्न " दिला त्या महाविद्यालयास नावारुपाला आणणारे आदरणीय प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर यांची नेहमीच एक खंत असायची की, आपण महाराष्ट्राला दर वर्षी शेकड्याने मेरिटचे विद्यार्थी देतो. पण आपण आज पावेतो स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काहीच करू शकत नाही, या साठी त्यांनी काॅलेज मधे नव्याने रूजू झालेल्या प्राध्यापकांना घेवून महाविद्यालयातच " स्पर्धा परीक्षा" विषयक वर्ग प्रथमच सुरू केले!!! त्यांचा हेतू अत्यंत प्रामाणिक होता...मी एमपीएससी करायला सुरूवात (पण तशी ती फक्त भावनिकच होती हे नंतर कळले) केली आणी त्याचवेळी व वर्षी काॅलेजने हे क्लास सुरू केले....शुभशकूनच होता हा!!!!!
मी माझ्या सिनियर सह त्या वर्गास बसू लागलो. तेथे इच्छुक विद्यार्थी एकत्र आल्याने अजून हिंमत आली. अनिरुद्ध, मकरंद, निर्भय जाधव, प्रदिप राऊत , मनिषा (asst. Comm. Vat),असे काही सिरीयस वर्गमित्र तेथे भेटले. ते ही क्लासला यायचे. आम्ही सगळे काॅलेजचेच असल्याने आम्हाला सकाळी शिकवणारे प्राध्यापकवृंदच सायंकाळी शिकवायचे. पण महाविद्यालयीन विषय आणी एमपीएससीचे विषय यात साम्य असले तरी अॅप्रोच भिन्न असतो. महाविद्यालयात इतिहास शिकणे आणि एमपीएससी साठी इतिहास तयार करणे यात मोठा फरक असतो. हे समजत नव्हते. सगळेच अनअनुभवी पण हेतु मात्र खुप उदात्त!! आम्ही शिकत होतो. पण अपुर्णत्वाची रूखरूख येथे होतीच.पण एकट्याने दिशाहीन अभ्यास करण्यापेक्षा सामूहिक काहीतरी भरीव करण्याचा हा प्रयत्न ही आश्वासक होता...कमीत कमी या प्रयत्नांमुळे इच्छुक विद्यार्थ्यांचा संपर्क झाला. भलेही तो काॅलेजचा एक आदर्शवत उपक्रम होता. पण सर्वोत्तमचा ध्यास असणा-या जाधव सरांना आणी आम्हा विद्यार्थ्यांना अपुर्णत्वच जाणवत होते. आमच्या पैकी खुप जण काहीतरी नविन आहे म्हणून आले होते. आम्ही शिकत होतो....त्या बॅच मधिल अनेकजणांनी महाविद्यालयाची परिक्षा येण्या अगोदरच क्लास बंद केला आणि वार्षिक परिक्षा आल्याने काॅलेजने पण.....त्यातील अनेकजण आज विविध क्षेत्रात नावारुपाला आले आहेत अनिरुद्ध कुलकर्णी हा संपादन, लेखन, अनुवाद व सामाजिक संघटन यात एक अग्रणी नाव बनत आहे. तर निर्भय जाधव हा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पुण्यात एक नावाजलेले नाव आहे. ज्याच्या मार्गदर्शनातून अनेक अधिकारी घडत आहेत.फक्त चटका लावणारी एकच गोष्ट...माझ्या दोन्ही सिनीयर्स पैकी प्रकाश मस्के यांनी एमपीएससी सोडली ते गावी असतात तर तोडकर यांचा संपर्क झाला नाही. एकदा सुट्टीला गेल्यावर अचानक मस्के लातूर मधे गांधी चौकात भेटले. प्रथम मी तहसीलदार असल्याने जपून पण नंतर , (मी आजही त्याच आदराने त्यांना पाहतो याची जाणीव झाल्याने ) डोळ्यात पाणी आणून त्यांनी माझं कौतुक केलं, पाठ थोपटली. आणी भावड्या तु तरी करून दाखवलंस !अभिमान वाटतो! म्हणून भरभरून बोलले. माझ्या आयुष्याला हातभार लावणारे त्यांचे हात....जर प्रशासनात असते तर.......काही स्वप्न ऊगवतात पण मुळ धरत नाहीत.. त्याला अनंत कारणे असतात पण ..असो त्यांचा आदर कायम आहे माझ्या मनात...कारण माझ्या प्रयत्नांना त्यांनी पहिल्या टप्प्यातच खुप भावनिक आधार दिला .. आणी आज माझ्या यशाचं निर्मळ मनाने कौतुक करून त्यांनी त्यांच्या विशाल ह्रदयाचा परिचय ही दिला...
याच वर्षात महाविद्यालयीन आयुष्य भरभरून जगता आले. एनएसएसचा कॅम्प तर अविस्मरणीयच! भुकंपग्रस्तांसाठी चलबुर्गा गावात गेलेला हा कॅम्प, तेथे भुकंपग्रस्तांसाठी घराच्या बांधकामासाठी पाया खोदण्याचे केलेले काम, केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, उनाडपणा आणी तरीही उत्कृष्ट पथक म्हणून गौरव यातुन आपोआपच नेतृत्वगुण विकसीत होत गेला, कष्टाची सवय दृढ झाली आणी जिवाभावाचे मित्र भेटले शेळके(पिंट्या), लखादिवे,संतोष..असे खुपजण..ज्यांनी आयुष्यातील उणीवा मैत्रीने भरून टाकल्या. असेच उणीवा भरून काढणारे व सतत संपर्कात राहून प्रेरणा देणारे मित्र म्हणजे जयपाल , युसूफ, ईस्माइल, विनोद,डाॅ.संघरत्न सोनवणे( खो खो चा नामांकीत खेळाडू ते पुणे विद्यापिठाचा एक स्काॅलर विद्यार्थी व महाराष्ट्रातील वर्तमान बुध्दिवादी आगामी विचारवंत) संतोष तंत्रे (मला गाणे शिकवणारा, स्नेहसंमेलनाच्या साठी तयारी करून घेणारा संगीताचा तत्कालीन विद्यार्थी व आता संगीत महाविद्यालयाचा संचालक आणी संगीत विद्यापिठाचा सदस्य)आलोक चिंचोलकर(कोणाचेही भांडण असो आलोकने सांगितले की ते मिटणारच असा दरारा असणारा पण जेंव्हाही भेटला तेंव्हा- होतोस रे तु! अभ्यास कर म्हणून सतत आत्मविश्वास वाढवणारा महसूल खात्यातील माझा सहकारी), संजय गायकवाड (रेल्वे सेवा), महेश सुडे, प्रा. युवराज वाघमारे, सचिन आडाणे( राष्ट्रीय ख्यातीचा बास्केटबॉल खेळाडू व क्रिडा शिक्षक) असे अनंत मित्र ज्यांनी आयुष्य शिकवले व भरीव केले...तसेच मैत्रिणी ज्यांनी सामाजिक सभ्यतेचे भान ठेवत सातत्याने केलेले कौतुक...या सर्वांनी आयुष्यात अर्थ निर्माण केला. मी महाविद्यालयात एमपीएससी शिकत होतो पण वार्षिक परिक्षा आल्याने ते क्लास बंद झाले. मी काॅलेजचा अभ्यास सुरू केला.
काॅलेजचा अभ्यास सुरू केला की, आठवणारा एकमेव मित्र म्हणजे गज्या!! (गजानन सुरवसे) त्या काळातील काॅलेजचा फॅशन आयकाॅन, अत्यंत सुबक दिसणारा, हुशार पण वर्षभर स्वतःच्या धुंदित सुखी असणारा, खेळाडू (बास्केटबॉल, व्हाॅलीबाॅल) व आत्ताचा LIC -D.O., युपिएससी होता होता वाचलेला (त्यामुळे तो आजही शिव्या खातो सर्वांच्या)माझा नववी पासुनचा बालमित्र (ज्याने सदैव साथ दिली) तो अभ्यासाला यायचा. मी काढलेल्या नोट्स भांडून हक्काने वापरायचा आणी बरोब्बर स्वतःचे डोकं लावून परिक्षेत लिहायचा आणी इतरांच्या बरोबरीने मार्क्स घ्यायचा, सगळ्यांना धक्का!! वर्षभर वर्गात नियमीत नसणारा पण तरीही भरपुर मार्कस घेणारा तो अजुन भाव खाऊन जायचा. त्यातल्या त्यात मुलीमधे जास्त गाॅसिपींग असायची ती पुन्हा वाढत राहील अशी तरतुद होउन जायची. हा तो मित्र ज्याने MPSC स्वतः केली नाही . पण माझ्या MPSC च्या तयारीच्या काळात क्वालिटी इनपुट दिले व मदत केली (त्याचा संदर्भ येईलच पुढे).
या सर्व मित्रांत व विविध उपक्रमात मी राहूनही मला सतत एमपीएससीची हुरहुर असायची. मी स्वतःला खुप
ताणत होतो. कुठलीही जागा नैराशासाठी शिल्लक राहणार नाही या साठी स्वतःला गुंतवून ठेवत होतो. काही सिनियर मंडळी येता जाता मला खोचकपणे काय MPSC! काय चालले आहे म्हणून विचारायचे. मी त्यांना हसून उत्तर द्यायचो पण मनात चर्रर्र व्हायचे आणी खुणगाठ अजुन तिव्र व्हायची की, अशी टिका , खोचक शेरे आयुष्य भर नको असतील तर अभ्यास करावा लागेल. मला हरवलेले पान व्हायचे नव्हते. मला माझी गडद रेषा ओढायची होती. मला डंका पेटवायचा होता!!!!
बि ए प्रथम वर्ष हे MPSC करण्याच्या साठी कृतीशील वर्ष ठरले. या वर्षी नविन सहकारी भेटले, काॅलेज मधे क्लास होऊन तिन चार महिने नविन काही शिकायला मिळाले. मी वर्गात शिकवल्या जाणा-या अभ्यासातही MPSC चा कंटेंट पाहत असे त्यामुळे कधिकधी प्राध्यापक मंडळी अंदाज घ्यायचे. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मी इतरही संदर्भ देवून ऊत्तर देत असल्याने मला गांभीर्याने घेतले जावू लागले. वर्गातल्या काही मुलामुलींना थोडे आश्चर्य वाटायचे, ते कौतुकाने पहायचे, कधिकधी सर ही कौतुक करायचे. पण मला कधी शेफारल्या सारखं झालं नाही.किंवा मी कधि स्वतःला विशेष समजत नव्हतो, अधुन मधुन सर लोक कंट्रोल ठेऊन असायचे. एकदा मी व संतोष काॅलेज सुटल्यानंतर एका रिकाम्या वर्गात बसलो होतो. आमची चर्चा सुरू होती. चर्चेचा विषय होता गॅट करार. आम्ही बोलत होतो. फार काही क्वालिटी डिस्कशन नव्हते ते पण गोंधळ मात्र क्वालिटीचा होता! आम्ही त्वेषाने बोलत असतानाच महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर राऊंडवर असल्याने ते त्या वर्गासमोर आले हे आमच्या लक्षात आले नाही. महाविद्यालयाचा नियम होता की काॅलेज संपले अथवा लेक्चर ऑफ असेल तर एकतर काॅलेज बाहेर किंवा सरळ लाएब्रेरीत बसायचे. आम्ही तर दोन्ही नियम तोडले होते. रितसर चौकशी झाली. ओळखपत्र जप्त झाले आणी खुप बोलण्याची हौस आहे तर सायंकाळी 5.00 वा. वादविवाद स्पर्धा होत असलेल्या वर्गात भेटायला बोलावले आणी ओळखपत्र घेवून जायला सांगितले. पर्याय नव्हता, सायंकाळी 4.45 वा. घाबरत घाबरत हजर राहिलो. वर्गात बसलो. फोरम फाॅर फ्री एंटरप्रायझेस तर्फे तेथे "कामात नितीमूल्यांची आवश्यकता " या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित होती.मला वाटले ऐकायला लावतील आणी नंतर समज देवून परत पाठवतील.त्या हिशोबाने मी वर्गात बसलो होतो.सर आले, स्पर्धा सुरू झाली, स्पर्धक बोलत होते, अचानक माझ्या नावाचा पुकारा झाला. मी एकदम हबकून गेलो. मी नको ही म्हणायच्या स्थितीत नव्हतो. काही ओळखीचे स्पर्धक तेथे होते. सर पण बसलेच होते. नकार देणे म्हणजे शालजोडीतील शब्दानी सत्कार झाला असता. विचार केला बोलणी खाण्यापेक्षा बोललेलेच बरे! आणी ओळखपत्र ही परत घ्यायचे होते !! मी मनाचा हिय्या करून उठलो. मी अगोदरच ऊठायला आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेतला होता. मी उठलो, डायसवर गेलो, क्षणभर दिर्घ श्वास घेतला, आणी मी बोलायला सुरूवात केली. मी बोलत होतो सात मिनिटांचा वेळ होता मी अकरा मिनीटे बोललो. गुपचुप खाली येऊन बसलो, स्पर्धा पुर्ण होईपर्यंत बसण्या शिवाय पर्याय नव्हता. मी बसलो, माझ्यानंतर तिघेजण अजून बोलले. स्पर्धा सुरू असताना माझे सगळे लक्ष ओळखपत्रावर होते. आगाऊपणा केला असता तर सरळ घरी पत्र गेले असते. मग पालकां समोर हजेरी झाली असती. स्पर्धा संपली, निकाल जाहीर करण्याची वेळ आली. मी तो झाल्या बरोबर माझे ओळखपत्र घेवून व बोलणी खाऊन जाण्याची मानसिक तयारी करून बसलो होतो. निकाल जाहीर करायला सुरूवात झाली, अगोदर उत्तेजनार्थ बक्षिसे जाहिर झाली, तृतीय बक्षिस आणी त्यानंतर द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आणी ते मिळाल्या बाबत माझे नाव!!!! मला सर्वात अगोदर माझे ओळखपत्र मिळाले, त्या सोबत प्रमाणपत्र व बक्षिसाची रक्कम व सोबत पाठीवर थाप, एक स्मितहास्य व सोबत पुन्हा वर्गात बसून गोंधळ करायचा नाही ही समज !!!! मला त्या दिवशी खुप आश्चर्याचे धक्के बसले, व एक जाणिव झाली , आपण एवढेही वाईट बोलत नाही दिलेल्या विषयावर !!!
मोठा भाऊ राहूल आता क्लासमेट होता. त्याला चित्रकलेने झपाटले होते. तो विविध प्रयोग करून त्याचे कौशल्य वाढवत होता. तर लहान भाऊ निशांत शाळेत असतानाच वादविवाद - वक्तृत्व करायला त्याने सुरूवात केली होती. गावातले काही लोक कुजबुजत रहायचे. आम्ही मात्र आमचे वेड घेवून निघालो होतो. आईवडिल आमच्यावर नितांत विश्वास ठेवून होते. तरीही अधुन मधुन ते सातत्याने जाणीव करून द्यायचे. वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती ती चिरस्मरणात आहे "घडी(क्षण) गेली की पिढी बिघडते" ," तुमचे शिक्षण हिच आमची कमाई आहे" या सगळ्या गोष्टी मी लक्षात ठेऊन होतो. आणी माझी वर्षभराची ही चाललेली धडपड एकजण अत्यंत अलिप्त होवून पाहत होता. मी काय वाचतो, किती गंभीर आहे वगैरे माझ्या प्रत्येक हालचालींचा लेखाजोखा एक व्यक्ती ठेवत होता. फक्त त्याची खात्री पटली की मग तो पुढे येवून मला मदत करणार होता...आपण आपल्या धुंदीत चालत राहतो. पण काही लोक आपला मार्ग सुरळीत होण्यासाठी नकळत कारण बनतात. ते मार्ग सुकर करतात. मी स्वप्न पेरले होते,त्यांने मुळपण धरले होते. पण त्याची वाढ होण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार होत होती. माझ्या निष्ठेपोटी अथवा कोणाच्या तरी चांगुलपणा व तळमळीपोटी मी MPSC च्या जवळ जाणार होतो
...नियती पट आखते..काही चांगले लोकही पेरून टाकते आयुष्यात...फक्त आपण आपले सत्व टिकवायला हवे. आपली आपल्या स्वप्नांवर निष्ठा हवी...पाऊलो कोएलो च्या "द अल्केमिस्ट" यातुन मिळणारा संदेश "ध्येयवेडेपणा घेवून जर आपण निष्ठेने स्वप्नपूर्ती कडे वाटचाल करत राहिलो तर सारं जग तुमच्या मदतीला धावून येते, फक्त नियती वेळोवेळी आपल्याला संकेत देत असते व आपल्याशी स्वप्नाची भाषा बोलत असते ती आपण ओळखायला हवी व चालत रहायला हवे सतत" हा एकदम खरा आहे.याची शब्दशः प्रचिती मला आहे. फक्त स्वप्न खरी असतात, अडचणी खोट्या..अडचणीमुळे उलट आपण मजबूत व दृढ व्हायला हवे. मुलं मुली जेंव्हा सांगतात की सर माझी परिस्थिती खराब आहे, घरी अडचणी आहेत तेंव्हा खरं तर ते अडचणीला शरण जात असतात हे जाणवते , खरं तर अशा अडचणी मुळेच तर आपली स्टोरी बनत असते. त्या नसतील तर आपली स्टोरी कशी बनेल. उलट अडचणी असल्यास आपण नियतीचे आभार मानले पाहिजेत कारण तिने आपल्याला लढण्याचे कारण दिले. पाय रोवून आपण थांबायला हवे आणी भिडायला हवे प्रतिकुलते सोबत.."कौन कहता है आसमां में छेद नहीं होता । जरा तबियत से पत्थर तो उछालो यारो।" मी स्वप्न पथावरील पहिला मैलाचा दगड गाडला होता...मी पाऊलवाट रेखाटायला सुरूवात केली होती..(क्रमशः)
(प्रताप )
Sunday, October 14, 2018
स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 9: मला स्वप्नाने झपाटले...
स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 9: मला स्वप्नाने झपाटले...
बारावीचं व्हेकेशन सुरू झालं. अशावेळी काॅलेज मधे फक्त 12 वी चेच विद्यार्थी येत जात असत.त्यामुळे एक शांतता असायची..विद्यार्थी कमी असल्याने व इतर धावपळ नसल्याने प्राध्यापकवृंद जास्त वेळ द्यायचे.. सरांच्या ओळखी दृढ व्हायच्या सरांना विद्यार्थ्यांची परिस्थिती कळून यायची. ते मग अशा विद्यार्थ्यांना जरा जास्तच आस्थेने शिकवायचे. व सतत परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते या बाबत भान ठेवायला अभिप्रेरीत करायचे. कारण आम्हाला शिकवणारे जवळपास सर्वच प्राध्यापक स्वतःच अत्यंत बिकट परिस्थितीतुन आलेले होते.त्यांना परिस्थितीची जाण होती आणी त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत कसे टिकून रहायचे हे सतत ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते सांगत रहायचे. काही सर तर स्टाफरूम मधे बोलवून अडचणी विचारायचे. मी धडपड
करणा-यापैकी आहे हे त्यांना माहीत असल्याने त्यांना आस्था असायची. त्यामुळे हुरूप यायचा , वाटायचं सर एवढे समजवून सांगतात तर आपण मेहनत घेतली पाहिजे...काही असेच चांगले मित्र मैत्रिणी धडपडताना पाहिले की लढण्याची जिद्द वाढायची. बहुतांश मित्र मैत्रिणीना बारावीत खुप अभ्यास करून डि एड ला जायचे होते. मी मात्र एकटाच असा होतो की मला डि एड करायचे नव्हते.पण अभ्यास करायचा होता. मी तो करताना ठरवले होते की फक्त काॅलेजच्या विषयाचा नाही तर सामान्य ज्ञानाचाही अभ्यास करायचा. थोडेफार मार्क्स कमी पडले तरी चालतील (अर्थात हा दृष्टीकोन मी घरी कळू दिला नाही, कारण माझ्या नात्यातील व गावातील खुप जणांनी वडिलांना सल्ला दिला होता की 'जर लवकर डि एड झाले तर घरची अडचण दुर होईल. मग पुढे शिकून तो काही का करेना !' आणी वडील पण दोन तिन वेळा सहज हा विषय बोलून गेले होते) पण मी ठरवले होते की मी डि एड वगैरे करणार नाही. कारण मला माहित होतं. "गड सर करायचा असेल तर सगळे दोर कापावे लागतात!" मी खरंच खुप धुमसत होतो...मला आता परिस्थिती म्हणून नाही तर " स्वंयसिध्दीच्या गरजे पोटी " MPSC करायची होती .पण जरी ठरलं असलं तरी परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. कारण अकरावीच्या नंतर सुट्ट्या नसल्याने मला कोठे कामासाठी जाता आले नाही..अख्खं वर्ष वंचनेचे चटके बसणार होते...नुसती परिक्षाच नव्हती तर सत्वपरीक्षा वाट पाहत होती. आणी मी ही आता सज्ज झालो होतो...
बारावी सुरू झाली , फार वेगाने अभ्यासक्रम शिकवला जात होता. ऊर्वरित वेळेत विविध परिक्षा घेवून मुल्यमापन केले जात होते. जेथे उणीवा होत्या ते पुन्हा शिकवले जात होते. सकाळी सहा वाजता गावाकडून निघून मी रात्री नऊ , साडे नऊ ला घरी जात होतो. दिवसभर काॅलेजच्या अभ्यासिकेत बसून वाचन चालायचे. इतर काही करण्यासारखे नव्हते. अभ्यासिकेत इतर पुस्तकाचे वाचन सुरू रहायचे. मित्रासोबत चर्चा व्हायच्या. पण या मुळे मी पुस्तकी किडा होणार नाही याचीही काळजी घेत होतो. घरी ऊशीरा गेल्यावर घरचे विचारायचे ऊशीर का झाला? मी उत्तर द्यायचो की अभ्यास करत बसलो होतो. गुपचूप असेल ते जेवायचे आणी मग दुस-या दिवशी पुन्हा तेच...
गरीबीची लाज वाटण्या इतपतही उसंत मी ठेवली नाही स्वतःला...पण खुप तीव्रतेने जाणवायचे, आणी आजही आठवते, पुर्ण वर्षभर माझ्याकडे काॅलेजचा युनिफॉर्म सोडला तर फक्त एक जास्तीचे शर्ट होते !!!. युनिफॉर्मला सुट्टी असलेल्या दिवशी मी तो शर्ट वापरायचो...वर्षाच्या शेवटी शेवटी तो खुप विरळ झाला होता. भिती वाटायची की तो फाटला तर काय??? पण सुदैवाने त्याने वर्षभर साथ दिली. त्या शर्टाची आजही आठवण येत राहते....
काॅलेज मधे तसा मी ब-यापैकी सर्वांना माहित होतो. सिनीयर्स ही नावानिशी ओळखायचे. प्राध्यापक, शिपाई मंडळी यांच्यात ही माझी चांगली ओळख होती. आणी भरपूर मित्र परिवार होता. मला सातत्याने या सर्वांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ मिळायचे. मीही माझ्या सारख्या फाटक्या परिस्थितीच्या मित्रांना धिराचं बोलायचो. शिकत होतो , टिकत होतो. गरीबी आता उणीव वाटत नव्हती, आता ती हवी होती कारण मला तिलाच भिडायचे होते. तीच माझी संपत्ती बनत चालली होती. या महाविद्यालयांने मला सगळ्यात जास्त काय शिकवले ? तर स्वाभिमान व आत्मभान!!आणी गरीबी मुळे लज्जित न होता तीला संपवण्यासाठी प्रयत्नवादी रहायचे...सोबतच्या मित्रांनीही कधी कोणालाच ती जाणवेल असे वर्तन केले नाही. ते आमच्या पिढीचं अनमोल शहाणपण होतं. म्हणून त्या काळातील सर्व मित्र मैत्रिणी या आयुष्यभराचे साथी झाले आहेत. आजही आम्ही संपर्कात आहोत.
अधुन मधुन वडील अचानक काॅलेज मधे यायचे , आणी मी काय करतो आहे ते पहायचे. पण मी कधीच काही वावगं करत नसल्याने ते समाधानाने परत जायचे. हे बारावीचे वर्ष एवढे अनमोल आहे आयुष्यात की काॅलेज ची आठवण आली की हेच वर्ष डोळ्यांसमोर येतं. सर्व मुले भारावलेले.. एकमेकांशी अतूट भावनेने वागणारे.. एकमेकाला आधार देत आयुष्याचा प्रत्येक भाव तन्मयतेने जगणारे असे सगळे...आजही आम्ही बहुतांश जण परस्परांच्या संपर्कात आहोत..पण काहीजणांचा संपर्क झाला नाही. आयुष्याचे ही हरवलेली पाने भेटत नसल्याने हुरहुर दाटून येते...
हे बारावीचे वर्ष मला खुप काही शिकवत होते. अभ्यास, आयुष्य, मैत्री, गुरुजनांचा आदर, सामाजिक दृष्टिकोन, कौटुंबिक समस्या, आर्थिक मर्यादा व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न. आता मला परिस्थिती भितीदायक न वाटता आव्हानात्मक वाटायला लागली. ती जेवढा दबाव टाकायची तेवढी जास्त उसळी आत मधून यायला लागली. मी मन लावून अभ्यास करत होतो. दहावी सारखं हे वर्ष मला गमवायचं नव्हते. मी जास्तीत जास्त वेळ अभ्यासिकेत घालवत होतो. पण सगळा वेळ निव्वळ 12 वी ला न देता मी MPSC ची उपलब्ध पुस्तके पण वाचत होतो. ते वाचताना मला काय सिलॅबस असतो, काय विचारले जाते, अभ्यास कसा करायचा असतो, परिक्षा कशी असते या बद्दल काहीही माहित नव्हते. पण मी अभ्यास करत होतो. कोणाला विचारावे असे कोणी नव्हतेही आसपास...आणी त्या वेळी मी MPSC बद्दल कोणाला विचारणे म्हणजे स्वतःचे हसू करून घेण्यासारखे होते .वर्ष झपाट्याने सरत होते.
वर्गात भरपूर मुले होती जे लातुरच्या आसपासच्या खेड्यातून रोज यायचे. चर्चा व्हायच्या. सिनीयर्स किंवा वर्गातील मुले विविध चळवळी, आंदोलने यावर बोलायचे. आणी त्यात सक्रिय होण्याचा प्रयत्न करायचे. मी मात्र राजकीय दृष्ट्या कसलीही सक्रियता ठेवली नव्हती. विद्यार्थ्याच्या उद्बोधनासाठी काॅलेज विविध कार्यक्रम आयोजित करायचे. अशा कार्यक्रमांना हजर रहावे लागायचे. अशा उपस्थितीमुळे खुप काही शिकायला मिळायचे.
बारावीची परिक्षा जवळ आली. मी ब-यापैकी अभ्यास केला होता. त्या सोबतच मी इतर ही सामान्य ज्ञानाचा अभ्यास केला होता. माझ्या वर्गमित्रांनीही खुप अभ्यास केला होता. आम्ही सगळ्यांनी परिक्षा दिली. मीही खुप चांगल्या पद्धतीने पेपर लिहीले. ते लिहिताना सामान्य ज्ञानाचा जो काही विस्कळीत अभ्यास केला होता त्याचाही वापर केला. मार्क्स किती पडतात या पेक्षा विश्लेषणात्मक लिहले आहे याचे जास्त समाधान होते. परिक्षा झाली. मोठा भाऊ ही सुट्टीला आला. आता तो परत जाणार नव्हता.कारण त्याचे नवोदयचे शिक्षण पुर्ण झाले होते. आणी लहान भाऊ दहावीला जाणार होता. आगामी वर्षात खर्च वाढणार होता. याची जाणीव आम्हा सर्वांना होती. अकरावीच्या सुट्ट्यात काम न केल्याने ही अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे सुट्ट्या लागल्या बरोबर आम्ही तिघे भाऊ कंपनीत कामाला निघालो.फरक एवढाच होता की लहान भाऊ ऑफसेट मधे तर मी व मोठा भाऊ नव्याने स्थापित बायोफर्टिलायझरच्या कंपनीत कामाला जात होतो. मला या कंपनीत बाॅयलर चालवावा लागला. हे अत्यंत धोकादायक काम होतं. पण पर्याय नव्हता. मी ते शिकून घेतलं. माझ्या सोबत मोठा भाऊ पण ते काम करायचा पण नंतर त्याला तेथुन दुस-या युनिट मधे काम करावं लागलं. मला हे बाॅयलर चालवताना खुप वाईट वाटायचं पण मी करू तरी काय शकत होतो? अजून माझा दिवस उगवायचा होता....
सर्व सुट्ट्याभर आमचा एकच दिनक्रम..सकाळी 6ला उठायचे आणी 7वाजता कंपनीत..रात्री 7वा. सुट्टी झाली की घरी...बस्स! आयुष्य एवढे अनुभव देत होतं की, कधी सुट्ट्यात मौज करण्याचा पुसट विचारही मनात येत नव्हता.. आम्ही सकाळी सोबत घेऊन गेलेला डबा दुपारी खायचो. तो कधी कधी खराब झालेला असायचा.पण पर्याय नव्हता. पुर्ण सुट्ट्या आम्ही गुमान काम केले. ना कुठल्या कार्यक्रमाला, ना लग्नाला, ना इतर ठिकाणी जायला भेटायचे . पण त्याचे वाईट वाटण्याचे काही कारण नव्हते...गावातल्याही कुठल्या कार्यक्रमात आमचा सहभाग अथवा उपस्थिती रहायची नाही. कधितरी मित्र गावाकडे भेटायला यायचे..सगळं पहायचे..माझ्याकडे लपवण्या सारखंही काही नसल्याने मीही आहे तसा त्यांना भेटायचो. ते आधाराचं बोलायचे. आणी परत निघायचे.मन पुन्हा भरून यायचं..वाटायचं काय हे दिवस आहेत? कधी बदलेल हे सगळं? पण काळ आपल्याच गतीनं चालत असतो. त्याला लवकर संपवता येत नाही की लांबवता येत नाही..त्याचे भोग भोगायचेच असतात. ही सुट्टीही अशीच कामात गेली..
कंपनीतून चालत परत येताना आम्ही नि:शब्द असायचो. ते 3 कि.मी. चे अंतर फक्त आत्मसंवाद चालायचा. फक्त एक बाब होती ज्या माळरानावर मी स्वप्नबिज पेरले होते ते रस्ताभर सोबत करायचं आणी मुक्याने ओरडून ओरडून सांगायचं...विसरू नकोस तुझ्या स्वप्नांनी अजून ऊगवायला सुरूवात केली नाही. आणी मग आत्मसंवाद जास्त बोलका व्हायचा. अशा प्रत्येक संध्याकाळी मी स्वप्नांना अंगाखांद्यावर घेवून प्रवास करायचो. संध्याकाळ भारलेली असायची. जिवात कोलाहल असायचा. आत्मउन्नतीचा ध्यास हीच खरी संपत्ती आहे. हे मनावर ठसायचे. मी रंगीत संध्याकाळ सांजावताना पाहत असायचो...आणी गावच्या माळरानावरून दिसणा-या लातुरच्या दिव्याच्या ठिपक्यात मला माझे स्वप्न प्रकाशमान होताना दिसायचे...
बारावीचा निकाल लागला. चांगले मार्क मिळाले. आणी ठरलेल्या पध्दतीने घरी सल्ले द्यायला अनेक हितचिंतक येवून गेले. बहुतांश लोकांनी डि एड करण्याचा सल्ला दिला. पण माझ्या मनात एमपीएससी करण्याचा मनसुबा दृढ झाला होता. मी मला कुठेच गुंतवणार नव्हतो. सर्वांनी परिस्थितीचा विचार करून डिएड चा सल्ला दिला होता. पण मला परिस्थितीला शरण जायचे नव्हते. मला तिच्यावर मात करण्यासाठी झगडायचे होते. मला आता मीही थांबवणार नव्हतो...सरते शेवटी मी डिएड न करण्याचा निर्णय घेतला, वर्गातल्या सर्व हुशार मुलांनी चांगले मार्क्स घेतले व ते डिएडला गेले. मी मात्र कुठल्या उत्साहाने पुढील तिन वर्ष काढणार होतो काय माहीत? एक अनिश्चिततेची पोकळी होती. मी चालायला सुरूवात केली होती. सर्व हुशार मित्र डिएडला गेल्याने थोडीशी पोकळी वाटत होती...पण ती पोकळी मी स्वप्नानी भरून टाकली होती. एक अवघड दिशेने मी पाऊल टाकले होते. ज्या निर्धाराने मी घरच्या लोकांना डिएड करणार नाही म्हणून सांगीतले होते तो निर्धार मी कोठून आणला होता मलाच आज आश्चर्य वाटते. कशाच्या भरवशावर मी हा डाव मांडला होता माहित नव्हते. कसा, कधी मी एमपीएससी पास होणार होतो याची सुतराम कल्पना नव्हती पण एक मात्र नक्की माहित होते ... मी एमपीएससी पास होणारच होतो....!!!!! मला स्वप्नांनी अक्षरशः झपाटले होते.....!!!!!!! (क्रमशः)
-प्रताप -
भाग 9: मला स्वप्नाने झपाटले...
बारावीचं व्हेकेशन सुरू झालं. अशावेळी काॅलेज मधे फक्त 12 वी चेच विद्यार्थी येत जात असत.त्यामुळे एक शांतता असायची..विद्यार्थी कमी असल्याने व इतर धावपळ नसल्याने प्राध्यापकवृंद जास्त वेळ द्यायचे.. सरांच्या ओळखी दृढ व्हायच्या सरांना विद्यार्थ्यांची परिस्थिती कळून यायची. ते मग अशा विद्यार्थ्यांना जरा जास्तच आस्थेने शिकवायचे. व सतत परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते या बाबत भान ठेवायला अभिप्रेरीत करायचे. कारण आम्हाला शिकवणारे जवळपास सर्वच प्राध्यापक स्वतःच अत्यंत बिकट परिस्थितीतुन आलेले होते.त्यांना परिस्थितीची जाण होती आणी त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत कसे टिकून रहायचे हे सतत ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते सांगत रहायचे. काही सर तर स्टाफरूम मधे बोलवून अडचणी विचारायचे. मी धडपड
करणा-यापैकी आहे हे त्यांना माहीत असल्याने त्यांना आस्था असायची. त्यामुळे हुरूप यायचा , वाटायचं सर एवढे समजवून सांगतात तर आपण मेहनत घेतली पाहिजे...काही असेच चांगले मित्र मैत्रिणी धडपडताना पाहिले की लढण्याची जिद्द वाढायची. बहुतांश मित्र मैत्रिणीना बारावीत खुप अभ्यास करून डि एड ला जायचे होते. मी मात्र एकटाच असा होतो की मला डि एड करायचे नव्हते.पण अभ्यास करायचा होता. मी तो करताना ठरवले होते की फक्त काॅलेजच्या विषयाचा नाही तर सामान्य ज्ञानाचाही अभ्यास करायचा. थोडेफार मार्क्स कमी पडले तरी चालतील (अर्थात हा दृष्टीकोन मी घरी कळू दिला नाही, कारण माझ्या नात्यातील व गावातील खुप जणांनी वडिलांना सल्ला दिला होता की 'जर लवकर डि एड झाले तर घरची अडचण दुर होईल. मग पुढे शिकून तो काही का करेना !' आणी वडील पण दोन तिन वेळा सहज हा विषय बोलून गेले होते) पण मी ठरवले होते की मी डि एड वगैरे करणार नाही. कारण मला माहित होतं. "गड सर करायचा असेल तर सगळे दोर कापावे लागतात!" मी खरंच खुप धुमसत होतो...मला आता परिस्थिती म्हणून नाही तर " स्वंयसिध्दीच्या गरजे पोटी " MPSC करायची होती .पण जरी ठरलं असलं तरी परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. कारण अकरावीच्या नंतर सुट्ट्या नसल्याने मला कोठे कामासाठी जाता आले नाही..अख्खं वर्ष वंचनेचे चटके बसणार होते...नुसती परिक्षाच नव्हती तर सत्वपरीक्षा वाट पाहत होती. आणी मी ही आता सज्ज झालो होतो...
बारावी सुरू झाली , फार वेगाने अभ्यासक्रम शिकवला जात होता. ऊर्वरित वेळेत विविध परिक्षा घेवून मुल्यमापन केले जात होते. जेथे उणीवा होत्या ते पुन्हा शिकवले जात होते. सकाळी सहा वाजता गावाकडून निघून मी रात्री नऊ , साडे नऊ ला घरी जात होतो. दिवसभर काॅलेजच्या अभ्यासिकेत बसून वाचन चालायचे. इतर काही करण्यासारखे नव्हते. अभ्यासिकेत इतर पुस्तकाचे वाचन सुरू रहायचे. मित्रासोबत चर्चा व्हायच्या. पण या मुळे मी पुस्तकी किडा होणार नाही याचीही काळजी घेत होतो. घरी ऊशीरा गेल्यावर घरचे विचारायचे ऊशीर का झाला? मी उत्तर द्यायचो की अभ्यास करत बसलो होतो. गुपचूप असेल ते जेवायचे आणी मग दुस-या दिवशी पुन्हा तेच...
गरीबीची लाज वाटण्या इतपतही उसंत मी ठेवली नाही स्वतःला...पण खुप तीव्रतेने जाणवायचे, आणी आजही आठवते, पुर्ण वर्षभर माझ्याकडे काॅलेजचा युनिफॉर्म सोडला तर फक्त एक जास्तीचे शर्ट होते !!!. युनिफॉर्मला सुट्टी असलेल्या दिवशी मी तो शर्ट वापरायचो...वर्षाच्या शेवटी शेवटी तो खुप विरळ झाला होता. भिती वाटायची की तो फाटला तर काय??? पण सुदैवाने त्याने वर्षभर साथ दिली. त्या शर्टाची आजही आठवण येत राहते....
काॅलेज मधे तसा मी ब-यापैकी सर्वांना माहित होतो. सिनीयर्स ही नावानिशी ओळखायचे. प्राध्यापक, शिपाई मंडळी यांच्यात ही माझी चांगली ओळख होती. आणी भरपूर मित्र परिवार होता. मला सातत्याने या सर्वांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ मिळायचे. मीही माझ्या सारख्या फाटक्या परिस्थितीच्या मित्रांना धिराचं बोलायचो. शिकत होतो , टिकत होतो. गरीबी आता उणीव वाटत नव्हती, आता ती हवी होती कारण मला तिलाच भिडायचे होते. तीच माझी संपत्ती बनत चालली होती. या महाविद्यालयांने मला सगळ्यात जास्त काय शिकवले ? तर स्वाभिमान व आत्मभान!!आणी गरीबी मुळे लज्जित न होता तीला संपवण्यासाठी प्रयत्नवादी रहायचे...सोबतच्या मित्रांनीही कधी कोणालाच ती जाणवेल असे वर्तन केले नाही. ते आमच्या पिढीचं अनमोल शहाणपण होतं. म्हणून त्या काळातील सर्व मित्र मैत्रिणी या आयुष्यभराचे साथी झाले आहेत. आजही आम्ही संपर्कात आहोत.
अधुन मधुन वडील अचानक काॅलेज मधे यायचे , आणी मी काय करतो आहे ते पहायचे. पण मी कधीच काही वावगं करत नसल्याने ते समाधानाने परत जायचे. हे बारावीचे वर्ष एवढे अनमोल आहे आयुष्यात की काॅलेज ची आठवण आली की हेच वर्ष डोळ्यांसमोर येतं. सर्व मुले भारावलेले.. एकमेकांशी अतूट भावनेने वागणारे.. एकमेकाला आधार देत आयुष्याचा प्रत्येक भाव तन्मयतेने जगणारे असे सगळे...आजही आम्ही बहुतांश जण परस्परांच्या संपर्कात आहोत..पण काहीजणांचा संपर्क झाला नाही. आयुष्याचे ही हरवलेली पाने भेटत नसल्याने हुरहुर दाटून येते...
हे बारावीचे वर्ष मला खुप काही शिकवत होते. अभ्यास, आयुष्य, मैत्री, गुरुजनांचा आदर, सामाजिक दृष्टिकोन, कौटुंबिक समस्या, आर्थिक मर्यादा व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न. आता मला परिस्थिती भितीदायक न वाटता आव्हानात्मक वाटायला लागली. ती जेवढा दबाव टाकायची तेवढी जास्त उसळी आत मधून यायला लागली. मी मन लावून अभ्यास करत होतो. दहावी सारखं हे वर्ष मला गमवायचं नव्हते. मी जास्तीत जास्त वेळ अभ्यासिकेत घालवत होतो. पण सगळा वेळ निव्वळ 12 वी ला न देता मी MPSC ची उपलब्ध पुस्तके पण वाचत होतो. ते वाचताना मला काय सिलॅबस असतो, काय विचारले जाते, अभ्यास कसा करायचा असतो, परिक्षा कशी असते या बद्दल काहीही माहित नव्हते. पण मी अभ्यास करत होतो. कोणाला विचारावे असे कोणी नव्हतेही आसपास...आणी त्या वेळी मी MPSC बद्दल कोणाला विचारणे म्हणजे स्वतःचे हसू करून घेण्यासारखे होते .वर्ष झपाट्याने सरत होते.
वर्गात भरपूर मुले होती जे लातुरच्या आसपासच्या खेड्यातून रोज यायचे. चर्चा व्हायच्या. सिनीयर्स किंवा वर्गातील मुले विविध चळवळी, आंदोलने यावर बोलायचे. आणी त्यात सक्रिय होण्याचा प्रयत्न करायचे. मी मात्र राजकीय दृष्ट्या कसलीही सक्रियता ठेवली नव्हती. विद्यार्थ्याच्या उद्बोधनासाठी काॅलेज विविध कार्यक्रम आयोजित करायचे. अशा कार्यक्रमांना हजर रहावे लागायचे. अशा उपस्थितीमुळे खुप काही शिकायला मिळायचे.
बारावीची परिक्षा जवळ आली. मी ब-यापैकी अभ्यास केला होता. त्या सोबतच मी इतर ही सामान्य ज्ञानाचा अभ्यास केला होता. माझ्या वर्गमित्रांनीही खुप अभ्यास केला होता. आम्ही सगळ्यांनी परिक्षा दिली. मीही खुप चांगल्या पद्धतीने पेपर लिहीले. ते लिहिताना सामान्य ज्ञानाचा जो काही विस्कळीत अभ्यास केला होता त्याचाही वापर केला. मार्क्स किती पडतात या पेक्षा विश्लेषणात्मक लिहले आहे याचे जास्त समाधान होते. परिक्षा झाली. मोठा भाऊ ही सुट्टीला आला. आता तो परत जाणार नव्हता.कारण त्याचे नवोदयचे शिक्षण पुर्ण झाले होते. आणी लहान भाऊ दहावीला जाणार होता. आगामी वर्षात खर्च वाढणार होता. याची जाणीव आम्हा सर्वांना होती. अकरावीच्या सुट्ट्यात काम न केल्याने ही अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे सुट्ट्या लागल्या बरोबर आम्ही तिघे भाऊ कंपनीत कामाला निघालो.फरक एवढाच होता की लहान भाऊ ऑफसेट मधे तर मी व मोठा भाऊ नव्याने स्थापित बायोफर्टिलायझरच्या कंपनीत कामाला जात होतो. मला या कंपनीत बाॅयलर चालवावा लागला. हे अत्यंत धोकादायक काम होतं. पण पर्याय नव्हता. मी ते शिकून घेतलं. माझ्या सोबत मोठा भाऊ पण ते काम करायचा पण नंतर त्याला तेथुन दुस-या युनिट मधे काम करावं लागलं. मला हे बाॅयलर चालवताना खुप वाईट वाटायचं पण मी करू तरी काय शकत होतो? अजून माझा दिवस उगवायचा होता....
सर्व सुट्ट्याभर आमचा एकच दिनक्रम..सकाळी 6ला उठायचे आणी 7वाजता कंपनीत..रात्री 7वा. सुट्टी झाली की घरी...बस्स! आयुष्य एवढे अनुभव देत होतं की, कधी सुट्ट्यात मौज करण्याचा पुसट विचारही मनात येत नव्हता.. आम्ही सकाळी सोबत घेऊन गेलेला डबा दुपारी खायचो. तो कधी कधी खराब झालेला असायचा.पण पर्याय नव्हता. पुर्ण सुट्ट्या आम्ही गुमान काम केले. ना कुठल्या कार्यक्रमाला, ना लग्नाला, ना इतर ठिकाणी जायला भेटायचे . पण त्याचे वाईट वाटण्याचे काही कारण नव्हते...गावातल्याही कुठल्या कार्यक्रमात आमचा सहभाग अथवा उपस्थिती रहायची नाही. कधितरी मित्र गावाकडे भेटायला यायचे..सगळं पहायचे..माझ्याकडे लपवण्या सारखंही काही नसल्याने मीही आहे तसा त्यांना भेटायचो. ते आधाराचं बोलायचे. आणी परत निघायचे.मन पुन्हा भरून यायचं..वाटायचं काय हे दिवस आहेत? कधी बदलेल हे सगळं? पण काळ आपल्याच गतीनं चालत असतो. त्याला लवकर संपवता येत नाही की लांबवता येत नाही..त्याचे भोग भोगायचेच असतात. ही सुट्टीही अशीच कामात गेली..
कंपनीतून चालत परत येताना आम्ही नि:शब्द असायचो. ते 3 कि.मी. चे अंतर फक्त आत्मसंवाद चालायचा. फक्त एक बाब होती ज्या माळरानावर मी स्वप्नबिज पेरले होते ते रस्ताभर सोबत करायचं आणी मुक्याने ओरडून ओरडून सांगायचं...विसरू नकोस तुझ्या स्वप्नांनी अजून ऊगवायला सुरूवात केली नाही. आणी मग आत्मसंवाद जास्त बोलका व्हायचा. अशा प्रत्येक संध्याकाळी मी स्वप्नांना अंगाखांद्यावर घेवून प्रवास करायचो. संध्याकाळ भारलेली असायची. जिवात कोलाहल असायचा. आत्मउन्नतीचा ध्यास हीच खरी संपत्ती आहे. हे मनावर ठसायचे. मी रंगीत संध्याकाळ सांजावताना पाहत असायचो...आणी गावच्या माळरानावरून दिसणा-या लातुरच्या दिव्याच्या ठिपक्यात मला माझे स्वप्न प्रकाशमान होताना दिसायचे...
बारावीचा निकाल लागला. चांगले मार्क मिळाले. आणी ठरलेल्या पध्दतीने घरी सल्ले द्यायला अनेक हितचिंतक येवून गेले. बहुतांश लोकांनी डि एड करण्याचा सल्ला दिला. पण माझ्या मनात एमपीएससी करण्याचा मनसुबा दृढ झाला होता. मी मला कुठेच गुंतवणार नव्हतो. सर्वांनी परिस्थितीचा विचार करून डिएड चा सल्ला दिला होता. पण मला परिस्थितीला शरण जायचे नव्हते. मला तिच्यावर मात करण्यासाठी झगडायचे होते. मला आता मीही थांबवणार नव्हतो...सरते शेवटी मी डिएड न करण्याचा निर्णय घेतला, वर्गातल्या सर्व हुशार मुलांनी चांगले मार्क्स घेतले व ते डिएडला गेले. मी मात्र कुठल्या उत्साहाने पुढील तिन वर्ष काढणार होतो काय माहीत? एक अनिश्चिततेची पोकळी होती. मी चालायला सुरूवात केली होती. सर्व हुशार मित्र डिएडला गेल्याने थोडीशी पोकळी वाटत होती...पण ती पोकळी मी स्वप्नानी भरून टाकली होती. एक अवघड दिशेने मी पाऊल टाकले होते. ज्या निर्धाराने मी घरच्या लोकांना डिएड करणार नाही म्हणून सांगीतले होते तो निर्धार मी कोठून आणला होता मलाच आज आश्चर्य वाटते. कशाच्या भरवशावर मी हा डाव मांडला होता माहित नव्हते. कसा, कधी मी एमपीएससी पास होणार होतो याची सुतराम कल्पना नव्हती पण एक मात्र नक्की माहित होते ... मी एमपीएससी पास होणारच होतो....!!!!! मला स्वप्नांनी अक्षरशः झपाटले होते.....!!!!!!! (क्रमशः)
-प्रताप -
Subscribe to:
Posts (Atom)
राधेस बोल लागे....
चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा कि...
.jpg)
-
पळस पेटला रानी निळ्या आभाळाला झळा वैशाखाच्या विरहात येती सावलीला कळा रंग निळ्या आभाळात ऊष्ण केशरी लकाकी पहाडाच्या माथ्याला येते ...
-
सांज बावरी घडी..रात येण्याचा प्रहर.. गोठ्याकडे वासराच्या ओढीने निघालेल्या गायीच्या खुराने ऊधळलेल्या मातीने आसमंत बावरत...
-
कवी ग्रेस!!! साठोत्तरी मराठी कवितेची अनवट सुरावट..... " I AM ANCIENT MAN IN MODERN ERA " असं म्हणत आपल्याच नव्या उपमा,नव्या प्र...