कवी ग्रेस!!!
साठोत्तरी मराठी कवितेची अनवट सुरावट.....
" I AM ANCIENT MAN IN MODERN ERA " असं म्हणत आपल्याच नव्या उपमा,नव्या प्रतिमा आणत एक आत्ममग्नी व प्रतिमा व प्रतिकांचा संयोग करत ग्रेसांची कविता मराठी काव्य क्षेत्रात आली..खरंतर ही कविता म्हणजे मराठी कवितेच्या भाळावरली सुरेख गोंदणनक्षीच!!
कोणी दुर्बोध म्हणावे,कोणी आत्ममग्न कविता म्हणावे पण ग्रेसांची कविता कशासही फशी पडत नाही. ती अवकाशाचे किनारे शोधत, व्याकुळ संध्यासमयी चंद्रमाधवीचे प्रदेश साकारत अफाट बनत जाते. अणुच्या आतड्यावरही ती विसावते तर तीला प्रसरण होताना अनंत आकाशगंगाही अपु-या वाटतात...अल्पायुशी संध्याकालाच्या चिरोट्या जागेत ग्रेसांची कविता विश्व तोलून धरते ते ही स्वतःचेच! कोणाला खुश करण्यासाठी ही कविता यमक जुळवत बसत नाही ती स्वतःचे वृत्त घडवत निघते. वेदना आणी सायंकाळ या दोहोस अलिंगन देत ती सांगते...
"मी खरेच दुर निघालो,
तु येवू नको ना मागे
पाऊस कुठेतरी वाजे
हृदयाची तुटती धागे"
तरीही या कवितेचा पाठलाग सुटवत नाही, "माझ्या प्रतिमा,प्रतिके तुम्हाला समजत नाहीत म्हणून मी दुर्बोध ठरत नाही तो तुमचा प्रश्न आहे, मला माझी कविता सहज समजते" इतकं ठणकवून सांगत ती डौलात निघते सांध्यपर्वातील वैष्णवी बनत! झाडाची साउलवेळ टिपत हा दुःखाचा महाकवी निघतो...हाती आल्या दगडाचे फुल बनवतो आणी त्या फुलाचा कैफ वाचकांना चढतो!! अजब रसायन! गहजब कवी!!!
"मी महाकवी दुःखाचा
प्राचिन नदिपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फुल"
हे गारूड सुटवत नाही, उलगडत नाही, उमजत नाही तरीही ते भारतेच..!! सरांची कविता ही आपल्या विश्वातील कविता नाहीच मुळी ती त्यांच्याच विश्वातील एक स्वगत आहे...ते त्यांनाच बोलते..आपण फक्त जे आपल्या ओंजळीत सांडलं तेवढंच समाधान मानायचं..तरीही संपृक्त करणारी ही कविता आहे!! कधी तुकयाच्या हातामधला ती अभंग उचलत निघते तर कधी स्तनावरील गोंदणनक्षीत ती हरवते...गायकंठी हंबर हा तीचा मुलभाव! ती व्याकुळ करते,ती भारते,ती अलगद पसरत राहते निळे धुके बनत...! सांजप्रवाही अलगद वाहवत नेणारा हा कवी....सरांचे आज पुण्यस्मरण...!
सरांची कविता समजून घेण्याचा प्रयत्न करत तीचा अर्थ लावण्याची भुल न करता ती जशी आहे तशी स्विकारणेच सर्वोत्तम!! कारण ती समजून घ्यायला सरांच्या अनवट भावविश्वातच रममाण व्हावे लागते!!
"आकाश जसे दिसते
तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी
गाय जशी हंबरते
तसेच व्याकुळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही
अलगद भरूनी यावे"
सर आपली कविता माझ्या सारख्या अनंताना भारते!!
(Pr@t@p)
२६ मार्च २०२१
www.prataprachana.blogspot.com
साठोत्तरी मराठी कवितेची अनवट सुरावट.....
" I AM ANCIENT MAN IN MODERN ERA " असं म्हणत आपल्याच नव्या उपमा,नव्या प्रतिमा आणत एक आत्ममग्नी व प्रतिमा व प्रतिकांचा संयोग करत ग्रेसांची कविता मराठी काव्य क्षेत्रात आली..खरंतर ही कविता म्हणजे मराठी कवितेच्या भाळावरली सुरेख गोंदणनक्षीच!!
कोणी दुर्बोध म्हणावे,कोणी आत्ममग्न कविता म्हणावे पण ग्रेसांची कविता कशासही फशी पडत नाही. ती अवकाशाचे किनारे शोधत, व्याकुळ संध्यासमयी चंद्रमाधवीचे प्रदेश साकारत अफाट बनत जाते. अणुच्या आतड्यावरही ती विसावते तर तीला प्रसरण होताना अनंत आकाशगंगाही अपु-या वाटतात...अल्पायुशी संध्याकालाच्या चिरोट्या जागेत ग्रेसांची कविता विश्व तोलून धरते ते ही स्वतःचेच! कोणाला खुश करण्यासाठी ही कविता यमक जुळवत बसत नाही ती स्वतःचे वृत्त घडवत निघते. वेदना आणी सायंकाळ या दोहोस अलिंगन देत ती सांगते...
"मी खरेच दुर निघालो,
तु येवू नको ना मागे
पाऊस कुठेतरी वाजे
हृदयाची तुटती धागे"
तरीही या कवितेचा पाठलाग सुटवत नाही, "माझ्या प्रतिमा,प्रतिके तुम्हाला समजत नाहीत म्हणून मी दुर्बोध ठरत नाही तो तुमचा प्रश्न आहे, मला माझी कविता सहज समजते" इतकं ठणकवून सांगत ती डौलात निघते सांध्यपर्वातील वैष्णवी बनत! झाडाची साउलवेळ टिपत हा दुःखाचा महाकवी निघतो...हाती आल्या दगडाचे फुल बनवतो आणी त्या फुलाचा कैफ वाचकांना चढतो!! अजब रसायन! गहजब कवी!!!
"मी महाकवी दुःखाचा
प्राचिन नदिपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फुल"
हे गारूड सुटवत नाही, उलगडत नाही, उमजत नाही तरीही ते भारतेच..!! सरांची कविता ही आपल्या विश्वातील कविता नाहीच मुळी ती त्यांच्याच विश्वातील एक स्वगत आहे...ते त्यांनाच बोलते..आपण फक्त जे आपल्या ओंजळीत सांडलं तेवढंच समाधान मानायचं..तरीही संपृक्त करणारी ही कविता आहे!! कधी तुकयाच्या हातामधला ती अभंग उचलत निघते तर कधी स्तनावरील गोंदणनक्षीत ती हरवते...गायकंठी हंबर हा तीचा मुलभाव! ती व्याकुळ करते,ती भारते,ती अलगद पसरत राहते निळे धुके बनत...! सांजप्रवाही अलगद वाहवत नेणारा हा कवी....सरांचे आज पुण्यस्मरण...!
सरांची कविता समजून घेण्याचा प्रयत्न करत तीचा अर्थ लावण्याची भुल न करता ती जशी आहे तशी स्विकारणेच सर्वोत्तम!! कारण ती समजून घ्यायला सरांच्या अनवट भावविश्वातच रममाण व्हावे लागते!!
"आकाश जसे दिसते
तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी
गाय जशी हंबरते
तसेच व्याकुळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही
अलगद भरूनी यावे"
सर आपली कविता माझ्या सारख्या अनंताना भारते!!
(Pr@t@p)
२६ मार्च २०२१
www.prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment