शब्दांच्या अंतःकरणी
ध्यान कुणाचे लागे
जोडण्या तुला मी...
हात कुणाचे मागे?
माग कुणाचा काढत
मन निघे अनवाणी
फुलकळ्याच्या खोल
आतवर सुगंध ओल्या धुनी
हाक दाटले डोळे
आणिक कटाक्षाची दिक्षा
तुझ्या क्षणांना अनंत ...
द्यावी प्रतिक्षेची भिक्षा
चांदघडीचा शकून साजे
हवेस हुरहुर वाटे
रात एकल्या एकटवेळी
सय कुणाची दाटे?
रात झडीचे थेंब घेउनी
पाऊस असा का पडे?
मातीच्या काळजावर
हलक्या थेंबाचे ओरखडे
बहर असा हा उठवत जाई
मृत फुलांच्या राशी
गंध कुणाचा भटकत राही
माझ्या एकांताच्या पाशी?
थेंब जणू की अत्तर अत्तर
सागर हो सुगंधी...
दे हाकारा!....स्वतःवरली
उठवून दे तु बंदी!
सांजप्रहरी सागर गाई
पावसाची गीते
घेवून नदीच्या अंतरातील
पात्र...भरले...रिते...!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
31/7/2021
No comments:
Post a Comment