गडगडाटी वळिव अनाहुत
विरळ बरसून गेला
जीव मातीचा तसाच तृष्ण
पाण्या तरसून गेला
किती गर्जना त्याच्या मोठ्या
मातीची हाक विरली
दग्ध विरहाच्या तप्त झळ्यांनी
माती मूक झरली
उगाच कशाला त्याने येऊन
राघू वाटा मोडल्या?
आल्या गेल्या पावलांच्या
नक्षी त्याने खोडल्या
मी देऊ कसले दाखले
कितीदा येऊन गेलो
उमटल्या 'येत्या' खुणा कुठल्या?
निराश पाहून आलो....
("やaraτa ₱)
www.prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment