स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 7: .....10 वी ..."फ".... लाजिरवाणी पण आयुष्य घडवणारी टक्केवारी...!!!
नववी ची परिक्षा झाली...पेपर चांगले गेले..निकाल लागला...दहावीत गेलो...पाहता पाहता दहावी... !!! शालेय जीवनाचा संरक्षक कोश असण्याचं अंतिम वर्ष... या नंतर..नव्हे या वर्षीपासुनच सगळे आयुष्याच्या वास्तविकतेची तयारी करतात...पण काहीजणांना जास्त खडतरता वाट्याला येते.......मी त्या पैकी एक....
शाळा सुरू झाली ..माझ्या शाळेत ऊन्हाळ्याचे व्हेकेशन क्लास नावाचा प्रकार नव्हता..पण सकाळची नियमीत शाळा संपल्यावर सायंकाळी एक्सट्रा क्लास चालायचे...शाळा भरण्या अगोदर सोबतची मुलं ट्युशन करून यायची..मला ती सोय नव्हती....सकाळची शाळा संपल्यास, सर्व मित्र आपापल्या घरी जायचे..आणि सायंकाळी मग क्लासला यायचे..मी मात्र शाळेच्या आसपास फिरत रहायचो...कधी कधी शाळेजवळ एखाद्या मित्राच्या घरी थांबायचो.. पण दररोज एखाद्याच्या घरी जाणे योग्य वाटत नसे.. सायंकाळी क्लास करायचा..गडबडीने चालत शिवाजी चौक गाठायचा..एसटी वेळेवर भेटली तर लगेच गावाकडे जायचे..नाहीतर शेवटची पावणे दहाची बस पकडून जायचे...ऊशीर व्हायचा...गावात रात्री लवकरच सामसुम होवून जायची...जास्त ऊशिर झाला तर वडील रोडवर बस थांबते तेथे येऊन वाट बघत थांबायचे...मग मी उतरलो की ..वडील एवढा ऊशीर का झाला हे विचारायचे..मी कारण सांगायचो..आम्ही मग रोडवरून घराकडे जायचो...जे असेल ते थोडेफार खायचो..दिवस शाळा व क्लास सोडला तर पुर्ण वाया गेलेला असायचा...दमून झोप लागायची..पहाटे आई किंवा वडील हाक मारून ऊठवायचे.. मग दुस-या दिवशी पुन्हा धावपळ...शाळा...क्लास ...त्या दरम्यान इकडे तिकडे टाइम पास..गणितच जमत नव्हतं दिवस कसा मॅनेज करायचा...
माझ्या या दिनक्रमामुळे घरी तर टेन्शन होतेच... पण इतरांना पण टेन्शन येत होते..."एवढा वेळ कुठे शाळा असते का? एवढी जिवापेक्षा जास्त शाळा शिकून थोडंच कोणी कामदार (नौकरदार) होतं , उगी जमते तेवढी शाळा शिकायला पाहिजे....वगैरे" अशी विविध बोलणी घरच्यांना ऐकावी लागायची.... लोकांचं चुकत नव्हतं...गावात त्यांचं जेवढं विश्व होतं त्या वरून ते मत व्यक्त करत होते... ..सगळ्या गावासारखं हे ही एक गाव...सगळे सण उत्सव यथाशक्ती खर्च करून विविध प्रथा परंपरेने साजरे करायचे...तोकड्या साधनावर समाधानानं जगायचं..सुगी चांगली झाली तरी बचत करत करत काटकसरीनं जगायचं..पोरांना टाकायचं म्हणून शाळेत टाकायचं... शाळा जमली त्याला तरी पुढे आर्थिक कुवत असेल तिथपर्यंतच शिकवायच...पोराचा एखादा विषय चुकुन राहिला किंवा तो नापास झाला तर मग कसलाही पुनर्विचार न करता रोजगाराच्या मागे लावायचं...कितीही वंचना असली तरीही समाधानाने जगायचं....सुखी समृध्द आयुष्य टिव्ही तच पाहून ते वेगळंच काहीतरी असतं आपला काही संबंध नाही ही ठाम समजूत करून घ्यायची.......गाव म्हणजे... सगळं काही एकमेकाच्या आधाराने...किंवा वेळ प्रसंगी एकमेकावर कुरघोडी करत आयुष्य कंठत रहायचं...गावात जयंती, सप्ता , भजन , पोथी वाचन हे कुठलीही चिकीत्सा न करता साजरी करायची...काही वाईट झालंच तर प्रारब्ध समजून मुकाट दिवस काढायचं...एखादा कोणी अर्धवट शिकलेला गावात पुढारीपण करतो त्याला निष्ठा वाहायची... हिच त्यांची जगायची रित....त्यामुळे गावातले , गल्लीतले लोक माझ्या शाळेत जाण्या-येण्यावरून सल्ले द्यायचे... मात्र व्हायचे उलंट..माझ्या घरचे आणि मी अजून जास्त जिद्दीने शिक्षणाची ओढ करायचो....तसेही आम्हाला कर्ज काढून शिक्षण देण्याने घर बदनामच होते.....
माझ्या अशा होणा-या धावपळीमुळे शेवटी मला लातूर मधे ठेवण्याचे ठरले..भिडस्त स्वभावाच्या माझ्या वडीलांनी नाही नाही करत माझ्या चुलत बहिणीच्या घरी मला दहावीचे वर्ष होईस्तोवर राहण्याची व्यवस्था केली..मी तिथे रहायला जाताना मला घरून जे जे देता येईल ते ते देवून वडील मला तेथे सोडुन गेले..सकाळी शाळा भरण्या अगोदर मुलं ट्युशन करतात म्हणून मला ऊसने अर्थात कर्जाने पैसे घेऊन गणिताची ट्युशनही लावून दिली. माझ्याकडे सायकल नसल्याने शाळेसमोरच असणारे ट्युशन लावले गेले..मी स्थिरावल्या सारखे झाल्याने रोज शाळेत जात होतो..येत होतो आणि ट्युशन करत होतो...पहिली घटक चाचणी आली ..पहिल्यांदाच मुलामुलींची मिळून घटक चाचणी झाली..आणी शाळेच्या या नविन प्रथेमुळे ...घटक चाचणीत मुलामुलींच्या जुजबी ओळखी झाल्या...घटक चाचणी नंतरही त्या " जुजबी "ओळखी सुरू राहिल्याने शाळेने अजून जास्त कडक शिस्त लागू केली..त्यावेळी काळ ही असा होता की,मुलं आणी मुली एकमेकाला बोलूच शकत नव्हते. चुकून बोलंतच असतील तर एखाद्या कामाशिवाय नाही आणी ते दोघं बोलंत असतील तर एवढ्या अंतरावरून बोलत की ते बोलताना त्या दोघांच्या मधून वर्गातल्या मुलांचा आख्खा लोंढा आरामात निघून जाईल ..आणी तो हमखास जायचाच!!!!! घटक चाचणीत चांगले मार्क मिळाले...
दोन तिन महिने निघून गेले..आणी जाणवायला लागलं की माझ्या तिथे राहण्यामुळे बहिण आणि तिच्या नव-यात बेबनाव होत आहे..अगोदरच त्यांच्यात पुर्वी पासुनच भांडण व्हायचे, बहिण एकदम नव-याला घाबरणारी.. त्यात माझ्या राहण्याने भांडणात वाढ झाली असे मला जाणवायला लागले...माझी खुपच अडचण होत होती....आणी त्या बहिणीची पण...ती मला काही सांगू पण शकत नव्हती...अगोदर पासुन भावजीचा स्वभाव म्हणजे सगळया घरावर हुकुमत ठेवण्याचा..घरातले सगळेच त्यांना प्रचंड घाबरत असत...ते दिवस दिवस भर ऑफीस बुडवून, कधी अर्ध्या वेळेतुनच परत येवून तर कधी कधी महिन् महिने ऑफीसला न जाता घरी कोणाशी न बोलता कागद घेवून आकडे जुळवत बसलेले असायचे..ते घरी असले की कोणाचाही आवाज नसायचा..मी त्यांना अगोदरच काही बोलत नव्हतो, त्यात त्यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे मी जेवढा वेळ घरा बाहेर थांबता येईल तेवढा थांबायचो.. आणी मी खुप वेळ घराबाहेर राहतो म्हणुन त्यांना माझ्या बहिणीकडे तक्रार करायला वाव भेटायचा..मला कोणाला काहीच बोलता येत नव्हतं..याची परिणीती म्हणजे मी थोडा दबून वागायला लागलो..आत्मविश्वास हरवला...आणी डोकं काम करेनासं झालं...भावजीवर काय वैयक्तिक टेन्शन होते ते त्यांनाच माहित..त्यांच्या टेन्शन मधे सगळं घर मात्र चिडीचूप रहायचं....एक दिवशी मी असाच ऊशीरा घरी पोहचलो.. अचानक बहिण व तिची मुलं रडताना दिसल्याने मी तिला रोजच्या सारखाच काही प्रकार असेल म्हणुन काय झाले म्हणून विचारले.. त्यावर तीने सांगितले की मी तिथे राहणे योग्य राहणार नाही..मी एकही शब्द न बोलता माझे कपडे व पुस्तके एका पिशवीत भरले आणी भाऊजींनी तिच्या माध्यमातून मला निरोप दिला आहे हे ओळखून रात्री गावाकडे जाण्यासाठीची शेवटची बस पकडण्यासाठी मी निघालो..नाईलाजाने बहिण म्हणाली उद्या सकाळी जा..कदाचित दारूच्या नशेत हे बोलले असतील ...पण माझ्या आत्मसन्मानाला खोलवर इजा झाली होती..मी अंतरी दुखावलो होतो...मी तिला वाईट वाटणार नाही अशा पध्दतीने अत्यंत संयमी पणाने सांगितले की टेन्शन घेऊ नको..मी घरी पोहोचेन...मी घरातुन रात्री नऊ वाजता बाहेर पडलो...बाहेर पडताना बहिण रडत होती..भाच्चा पण रडत होता तो पाचवीला असल्याने व अधुन मधुन मी त्याला अभ्यासाचे सांगत असल्याने त्याला ही माझी सवय झाली होती....मी दारा बाहेर पाउल टाकताना पाहीले ..भाऊजी दारूच्या नशेत झोपलेले होते......चार गल्ली पलिकडे गिरीश नावाचा माझा मित्र राहत होता मी त्याच्या कडे गेलो..त्याचे वडील रात्री ऑटो चालवायचे आणी दिवसा त्याची आई आणि वडील मेस चालवायचे...तो माझा क्लासमेट असल्याने मी त्याच्या कडे गेलो...तो मेस मधल्या मुलांना जेवण वाढत होता..मी अचानक गेल्याने..तो बाहेर आला...मी त्याला काहीच बोललो नसतानाही त्याने ओळखले काहीतरी बिघडले आहे..त्यांने विचारले..मी त्याला इतर काहीच न बोलता गावाकडे जात आहे म्हणून सांगितले..त्याने आग्रह केला आता जाऊ नको ..पण मी त्याला सांगितले की जावे लागेल...तिकीटासाठी पैसे घेतले..त्यांने जेवणासाठी विचारल्यास मात्र खुप दाटून आले..पण मी जेवण झाले आहे म्हणून सांगीतले आणी निघालो...
रस्त्याने मी त्या अंधारातून चालताना स्वतःला प्रश्न विचारत होतो की माझी अशी कोणती चुक झाली म्हणून मी येथे रहायला आलो होतो? आणि मी असे काय वाईट केलं होतं म्हणून माझ्यावर अशी अपमानास्पद वेळ आली? उद्या सकाळी ट्युशन , शाळा कशी करणार??? ज्या अंधारातून मी चालत निघालो होतो त्या पेक्षा जास्त अंधार आत दाटून आला होता.....भावजीच्या अशा वागणुकीचा मला किंवा माझ्या घरच्यांना बिल्कुल अंदाज व पूर्वकल्पना नसल्याने अशी गल्लत झाली होती..मी तिरमिरीत आणी विचारात चालत शिवाजी चौकात पोहचलो...बस ची वाट पाहीली...मन था-यावर नव्हते..असंख्य समस्या एका दिवसात समोर आल्या होत्या...बसलेली घडी विस्कटली होती..खचाखच भरलेली बस आली..कसाबसा गाडीत शिरलो...गाडी निघाल्यास मात्र एकदम काळजात धस्स झालं ..'आता घरी काय सांगायचं?'....
गावात गाडी पोहचली..अत्यंत दबावाखाली असल्याने धड रस्ता ही सुचत नव्हता...घरी गेल्यावर रामायणंच झालं...आईवडिलांना धक्का बसला...वडील म्हणाले तु काहीतरी चुक केली असेल...खुप रागवले..ओरडले माझ्यावर.. अगोदरच मी खुप दिवसा पासून दबावात होतो आता एकदम रसातळाला गेलो....लोक काय म्हणतील, पाहुणे काय म्हणतील...त्यांना पडलेले प्रश्न वेगळेच होते..आणी मला मात्र शाळा दिसत होती...पुन्हा पहिल्या पासून सुरूवात करावी लागणार होती....आणी सगळं विखुरलं होतं...दोन दिवस सारं स्थिरावायला लागले...आईची मध्यस्थी झाली..मी पुन्हा शाळेत जायला लागलो पण कसेतरी करून लावलेली ट्युशन मात्र करू शकत नव्हतो...मुलं खुप अभ्यास करायची ...मी मात्र या नैराश्यामुळे आक्रमक होवु लागलो होतो...आणी आपोआप माझी संगत शाळेतल्या टुकार मुलां सोबत जुळून गेली...मग मी शाळा ही बुडवली ...खुप भांडण, मारामारी करू लागलो...त्या भांडणा-या मुलांना माझ्या हुशारीचं कौतुक वाटायचं..आणी मला त्यांची बेडर जीवनशैली माझ्या अवस्थेवर उतारा वाटायची...बेभान होण्याची अवस्था आली...टुकार पध्दतीने जगणं हे ही जगणंच असतं असं वाटायला लागलं...घटक चाचणी वेळीच्या जुजबी ओळखी...दिर्घ ओळखीत रुपांतरीत झाल्या...मला परिणामांची भिती वाटेनासी झाली.....मी अक्षरशः वाया चाललो होतो....
मात्र हा बदल माझे क्लास टिचर यांच्या लक्षात आला...त्यांनी एके दिवशी शाळा सुटल्यावर मी, संदिप आणी मयुर या तिघांना शिपाया करवी निरोप देऊन शाळेच्या गच्चीवर बोलावले...(कितीही टुकारपणा केला तरी गुरुजनांचा आणी सामाजिक सभ्यचाराचा अवमान व्हावा असे कदापिही वर्तन मी केलेले नव्हते) आम्ही तिघेही गेलो...वर आप्पाराव सर व होनराव सर दोघेच होते...त्यांनी आम्हाला बसवलं आणि अत्यंत गांभीर्याने आमच्या चुका सांगून त्या करू नका, लहानपणी केलेल्या चुका आयुष्य बिघडवतात हे अत्यंत संयमाने व मित्रत्वाने समजवून सांगीतले....दोन्ही सर जवळपास दिड तास बोलंत होते....आणी दर सेकंदाला माझी टुकारपणाची नशा ऊतरत चालली होती....माझ्या व्यक्तीमत्वावर चढलेली पुटं गळुन पडली आणी मलूल झालेला निश्चय प्रज्जवलीत व्हायला लागला.. दरम्यानच्या काळात घेतलेले निर्णय आयुष्यभरासाठी सोबत घेऊन चालण्यासाठी ठाम निश्चय झाला.चुक समजली... पण ती दुरूस्त करण्यासाठी वेळ असायला हवी....!! अंतिम बोर्ड परीक्षेला फक्त दोन महिने राहिले होते..मी घरी पोहचल्यावर वडिलांशी आईशी बोललो..फक्त दोन महिने लातूरला रहायचे आहे म्हणून विनवणी केली..पण ती प्रत्यक्षात येण्यासाठी विस दिवस गेले...जेमतेम काही दिवस शिल्लक राहिले होते...आता परिक्षेचं दडपण जाणवायला लागलं होतं...सरते शेवटी घरच्यांनी किमान अभ्यास तरी होईल म्हणून व मी खुपच विनंती केल्याने मला लातूर मधे ठेवण्याचा निर्णय घेतला...विक्रम नगर मधे खुप मित्र झालेले असल्याने व ते ही बहुतांशी दहावी "फ" मधिल विद्यार्थी असल्याने व वैयक्तिक कारणाने ....मी एक परवडणारी मातीचे घर असणारी रूम तेथे भाड्याने घेतली, घरच्यांनी जेवण बनवायला माझ्या आज्जीला माझ्या सोबत ठेवले...(या वर्षातल्या सगळ्या कारणाने एकतर घरचा खर्च मी खुप वाढवून टाकला होता त्यात मी पुन्हा वाढ केली) पण मी आता इमानदारीने अभ्यासाला सुरूवात केली...विनोद नावाचा मित्र सोबत अभ्यास करायचा...पण आता बराच उशीर झाला होता.....आता तो अभ्यास न राहता...स्वतःला नापास होण्यापासून वाचवणे या थराला पोहचला होता...!!!
आता खरी घाबरगुंडी सुटली होती...कमी वेळात, तो ही नविन सिलॅबस कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय पुर्ण करणे म्हणजे दिव्यच!!! पण करत होतो...पश्चताप जाणवत होता...गाईड अथवा ' 21 अपेक्षित ' हे ही नव्हते..निव्वळ क्रमिक पुस्तकाधारे अभ्यास सुरू होता....
परिक्षा फी भरण्याची वेळ संपत आली होती...वडिल गावाकडून अजून पैसे घेऊन आले नव्हते..ते म्हणाले होते..सध्या आहे त्या पुस्तकातुन अभ्यास कर..आपण लवकरच फी भरू आणी गाईड घेऊ..पण मी रोज वाट पहायचो.. शेवटी परिक्षा फी भरण्याची वेळ निघून गेली..लेट फी ची वेळ सुरू झाली..मला खुप तणाव यायला लागला...मी दररोज शाळेत जावून त्यांची वाट पहायचो.. मला समजत असायचं ते तिकडे फी च्या पैशाची जुळवाजुळव करत असतील ..पण मग राग ही यायचा...सरते शेवटी लेट फी भरायला दोन दिवस राहिले...मी शाळेत जाऊन थांबायचो त्यांची वाट पहायचो..... लेट फी भरण्याचा शेवटचा दिवस...सायंकाळ 4:30 वाजले..मी वडील ज्या रस्त्याने येवू शकतात त्या रस्त्यावर जाऊन थांबलो..जिवाची नुसती घालमेल सुरू होती...कोणाला सांगायला जावं किंवा कोणाकडून उसने पैसे घ्यायला जावं आणी नेमके वडिल येवून गेले तर...या भितीपोटी मला तेथुन जाता ही येत नव्हतं..अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली होती..जर फी भरली नाही गेली तर अख्खं वर्ष वाया जाण्याची भिती निर्माण झाली होती..एक एक रूपयांची किंमत काय असते हे तेथेच समजले...मनात भिती दाटून येत होती की अशा फी न भरू न शकल्याच्या कारणाने जर वर्ष वाया गेले तर मी काय करेन वर्ष भर??? की मला पण गावातल्या मुलासारखे शाळा सोडावी लागेल? सगळे मुलं काॅलेजला जातील ...मी काय करेन??? आपणच काहीतरी करून पैसे शिल्लक ठेवायला पाहिजे होते वगैरे विचार डोक्यात येत होते...मला काहीच सुचत नव्हते...पण नियती थांबू देत नाही...डोळे पाण्याने भरून येत होते...मी अत्यंत असहाय्य होवून या परिस्थितीला अद्दल घडवायचीच हा निर्धार करत होतो..पण या निर्धारासाठी मला वर्ष वाया जाण्याची घोर किंमत देणे परवडणार नव्हते...वेळ जात होती..आणी मी अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या मानसिकतेत आलो होतो...आणी त्याच वेळी.....अचानक खांद्यावर हात पडला आणी" काय झालं...? " हा प्रश्न कानावर पडला...मी एकदम रडवेला झालो होतो....कसा कोण जाणे तो योगायोगाचा क्षण माझ्या आयुष्यात आला...मनात तळमळ असेल तर नियती निराश करत नाही याचा प्रत्यय येण्याचा तो क्षण..... माझ्या पुण्याला राहणा-या मोठ्या मामाचा मुलगा पुण्यावरून गावाकडे जाण्यासाठी लातूर हून जात होता. त्याला माझी शाळा माहित असल्याने तो शाळेकडे मला घ्यायला आला होता..त्याला वाटले की माझी शाळा सुटली असेल तर तो मला सोबत घेऊन गावाकडे जाईल...या योगायोगाचा धक्का मला आजपर्यंत जाणवतो...!!!! त्याला माझी स्थिती पाहून खुप वाईट वाटले... त्यांच्याशी माझी लहान पणा पासूनच मैत्री असल्याने व लहानपणी त्यांनेच पोहायला शिकवले असल्याने ...आमच्यात मित्रत्वाचे संबंध होते.. मला त्याने धिर दिला आणी सांगितलं की " एवढे टेन्शन कशाला घेतो? चल आपण फी भरू...मामा ( माझे वडील) कदाचित गाडी न मिळाल्यामुळे किंवा ईतर कारणाने ऊशीरा आले तर ऑफिस बंद होवून जाईल!!" त्याने मला त्याही परिस्थितीत माझी किंवा माझ्या कुटुंबाची मर्यादा जाणवू दिली नाही..व एकदाही मी त्याला फी भर न म्हणता किंबहुना मी तसे म्हणणारही नाही हे ओळखून स्वतःच फी भरण्याची तत्परता दाखवून माझा नियती वरचा विश्वास त्याने दृढ केला..त्या मदतीच्या हाताची किंमत आणी जाणीव आज ही अमुल्य आहे...अशा अनाहूत पुढे आलेल्या मदतीच्या हातांनीच माझ्या आयुष्याला आकार व आधार दिला आहे...
फी भरली, शाळा सिलॅबस संपल्यामुळे बंद होती...आता फक्त एकच ...अभ्यास...इकडून तिकडून मदत घेत..अभ्यास करताना मात्र खुप अडचणी येत होत्या..वाटायचं तिकडे वसतिगृहात राहिलो असतो तर बरं झालं असतं..पण एकदा चुकायला सुरूवात झाली की चुकतंच जाते...परिक्षा आली...दडपणात परिक्षा दिली...गणित भुमीतीचा पेपर अवघड गेला होता..पुन्हा सगळं सामान बांधून गावाकडे निघालो...जे काही बरे वाईट अनुभव या वर्षाने दिले होते..ते संचित सोबत होतं..आयुष्याची शिदोरी अशीच बनत जाते..मला आत्मचिंतन करण्याची गरज होती...पण आता आत्मचिंतन करून भागणार नव्हतं...कृती हवी होती..पण मी ठरवलं होतं...आता शिक्षणासाठी कमी पडायचं नाही...नापास होणार नाही आपण पण टक्केवारी घसरणार होती..ऐन मोक्याच्या वेळी समस्या आल्या होत्या...आता रडायचं नाही लढायचं ठरवलं होतं...परिस्थितीला शरण जायचं नाही तर तिच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करायचा हा निर्धार केला होता...त्यासाठी ज्या दिवशी गावात पोहचलो त्याच्या दुस-या दिवशी जिल्हा परिषद शाळेतील काही मित्र गावापासून 3 किलोमिटर अंतरावर असणा-या ज्या प्रिंटीगप्रेस आणी ऑफसेट कंपनीत कामाला जात होते तेथे जायचे ठरवले. सुट्ट्या असे पर्यंत काम करायचे आणी मग शिक्षण घ्यायचे असे ठरवल्याने मोठा भाऊ पण सुट्ट्या असल्याने कामास तयार झाला. घरी परिस्थिती बिकट असल्याने पण फक्त सुट्ट्यातच काम करायचे असल्याने व काम पुस्तकांचे असल्याने घरच्यांनी जायला परवानगी दिली...
मी आणी माझा मोठा भाऊ कंपनीत गेलो..कंपनी मालकांना भेटलो..परिस्थितीची जाण असलेला हा भला माणूस..पण त्यांना रेग्युलर काम करणारे मुलं पाहिजे होते..त्यांना आम्ही कामाबद्दल बोललो..त्यांनी दरमहा सहाशे रूपये मिळतील म्हणून सांगीतले. आठ तासा पेक्षा जास्त काम केल्यास दिडपट ओव्हरटाईम बद्दल ही सांगीतले. आम्ही काम मिळाले म्हणूनच उपकृत झालो होतो कारण त्या वयात करण्या सारखे तेवढेच एक काम गावालगत उपलब्ध होते...दररोज सकाळी आम्ही दोघे भाऊ 6:30 वाजता निघायचो आणी 7.00 वाजता कंपनीत पोहचून कामाला लागायचो, पुस्तकाच्या फाॅर्मची जुळवाजुळव करणे, मशिनला ते पुरवणे, तयार झालेल्या पुस्तकाचे गठ्ठे बांधणे, बालभारतीच्या गोदामात पुस्तके पोहचवण्यासाठी गाडी भरणे..गाडीतुन पुस्तके काढून थप्पी लावणे, वेगवेगळ्या कंपनीच्या प्रॉडक्ट साठी लागणारे कव्हर तेथे बनत असत,त्यासाठी मशिनला लागणारा माल पुरवणे अशी कामे करायचो... काम एवढे अचूक व गतीने करायला लागलो की..कंपनी मालकांनी न सांगता न मागता परस्पर पगार वाढवला, सकाळी 7.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत आम्ही काम करायचो...काम करताना डोक्यात विचार असायचा की इमानदारीने काम केले तर कंपनी मालक सुट्ट्या संपल्यास अडवणुक करणार नाहीत...कामात एवढी गती आली की, सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत केलेल्या कामावर तिन शिफ्ट मशीन चालायची...कशाचा राग त्या कामावर निघत होता माहीत नव्हतं...डोक्यात सतत विचार असायचा की हे काम आपल्याला फक्त सुट्ट्यात करायचे आहे..तेथे अगोदर पासून काम करणारे मित्र मात्र तिथे स्थिरावले होते. युनिट फार मोठं होतं साधारणतः 300 लोक काम करायचे . सगळे जण कामाचे कौतुक करायचे. आणी लहानपणा पासून ओळखणारे गावचे इतर सहकारी कामगार शिक्षण सोडू नका म्हणायचे... काम करताना डोक्यात सतत शाळा असायची....
निकाल जवळ आला..धाकधूक वाढली ...काय होते माहिती नव्हतं..तो लागला...पास झालो..फक्त 52% मिळाले होते पण या 52% ने दुनिया दाखवली होती..रसातळाला न जाता तरंगायची धमक दिली होती, साधनांची कमतरता लांघायचा कानमंत्र दिला होता..आणी भावी आयुष्यातील प्रवासाची जाणीवगर्भ सुरूवात करून दिली होती...घरी 52% वरून चांगलीच खरडपट्टी मिळाली..गावात काही लोकांना कुत्सिक हसण्यासाठी विषय मिळाला...आणी मला प्रज्जवलीत होण्यासाठी ठिणगी...अंतरीचा दिवा पेटला होता तो वादळात तेवण्यासाठी सज्ज होत होता..
52% वर कोठे अॅडमिशन मिळेल माहित नव्हते. कला शाखेशिवाय पर्याय नव्हता. प्रवेशासाठी फार्म भरले होते. पास झालो ही भावना उमेद निर्माण करून गेली..आता चुकायचे नाही हे भान आले...आता धावण्यासाठी तयार होतो पण रस्ता मिळत नव्हता....लहानपणी मोठ्या भावाचा झालेला सत्कार आठवत रहायचा...तेंव्हा पासुनच वाटायचं आपण काहीतरी मोठ्ठं झालं पाहिजे.. आता ठरवत होतो...जेंव्हा जेंव्हा बस स्टॅंड वर जायचो तेंव्हा तेंव्हा "स्पर्धा परीक्षा" मासीक पहायला मिळायचं... त्यावर मुला मुलीचे फोटो दिसायचे व त्या खाली अधिकारी पदाचा ऊल्लेख असायचा...त्या पुस्तकाच्या आत काय असतं ते माहिती नव्हतं...चुलत काका असेच संघर्षातुन शासकीय नोकरीत लागुन तहसीलदार म्हणून काम करत होते..त्यांची मुलं अर्थात मिलींद भाऊ (PSI) व सुनिल भाऊ (STI) परभणी कृषी विद्यापीठात शिकून सिलेक्शन झाल्याचे माहित होतं. एकदम लहान असताना मिलींद भाऊ कधी तरी घरी आल्याचं व त्यांच्या लग्नाला बिदरला गेल्याचं आठवत रहायचं...काका कधितरी घरी यायचे त्यांनी आणलेला बिस्किटचा पुडा आठवायचा पण..नंतर कधी नियमीत संपर्क राहिला नव्हता...पण वडील अधून मधून त्यांच्या बद्दल खुप अभिमानाने बोलायचे..आई पण कौतुक करायची..पण सोबतच "असे काहीतरी करायला पाहिजे " असे नक्की म्हणायची..ती सहज बोलून जायची..पण अंतःकरणात पक्षांचा अख्खा थवा चिवचिवायला लागायचा आणि मी नकळत उड्डाणाच्या आवेशात यायचो...वडील कौतुकाने पुतण्या बद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यांतील चमक मनात ठिणगी निर्माण करायची पण पडलेले 52% वास्तवाची जाणीव करून देत असत मी रिअॅक्ट होवूच शकत नव्हतो...
निकाल लागल्यावर कंपनी मालकांना भेटलो ...त्यांना खरे काय ते सांगितले..कायम काम करू शकत नाही शिक्षण आहे जावे लागेल..त्यांनी थोडेसे पाहिले आणि सांगितले ठिक आहे..पगार घेऊन जा...आम्ही त्यांचे आभार मानले..पगाराच्या पाकिटात जास्तीचे पैसे आहेत म्हणून सुपरवायझर ला सांगीतले तर त्यांनी सांगितले की, तुम्हा दोघांना पगार वाढवून मिळाला आहे..( तो पगार प्रत्येक सुट्टयात वाढतच राहीला आणी इतरांनी काम सोडून गेल्यास जर पुन्हा ते परत आले तर त्यांना पहिल्या पगार दरा पासून काम करावे लागायचे...तो नियम आम्हाला कधीच लागु झाला नाही.... पेठे साहेब त्यांचे नाव , काॅलेजला असताना त्यांची पुतणी वर्गात होती, तिला माहित होते आम्ही तिच्या काकाच्या कंपनीत सुट्ट्यात काम करतो पण तिने ते कधी जाणवू दिले नाही आणी त्यामुळे माझी मान ही कधि झुकली नाही...)
अॅडमिशन साठी प्रयत्न चालले होते..अनपेक्षित पणे महाराष्ट्रातील नामांकित काॅलेज, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे प्रवेश मिळाला . मी स्वतःला भाग्यवान समजत होतो...आता मागे हटायचे नव्हते..ही पाच वर्षे आयुष्य घडवणार होती..शाळेतले काही मित्र, घटक चाचणीत जुजबी ओळखी झालेल्या विशेष विद्यार्थीसह ब-याच जणांचे प्रवेश झाले होते...आयुष्य घडवणा-या या महाविद्यालयाने जे दिले ते क्वचितच मिळत असेल इतरत्र....मिळालेल्या पगारातून काॅलेजचा युनिफॉर्म, इतर शैक्षणिक साहित्य घेतलं, शैक्षणिक विद्यार्थ्यासाठी असणारा एसटीचा पास काढला....काॅलेज सुरू व्हायला अवकाश होता...सुट्टयात माळरानावर एकट्याने जायला क्वचित भेटले होते कामामुळे....मी आठवणीने त्याला काॅलेज सुरू होण्या अगोदर भेटायला गेलो... आणी तेथे जाऊन त्याला सांगीतले..माझे मनोरथ...!! पेरून टाकली माझी स्वप्न त्याच्या खडकाळ जमिनीवर आणी त्या स्वप्नांच्या बिया वाहणा-या वा-यावर स्वार होवून माझ्या अंतःकरणात रूजण्यासाठी परत आल्या ...मी बिया रूजवून घराकडे परत येत होतो...गाव शांत होत होतं आणी माझ्या आत खळबळ माजली होती... गावच्या मंदिरात वाजणारा अभंग वा-या सोबत वाहत कानावर पोहचत होता आणी मी नेमका शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निरखून पाहून पुढे येवून बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ऊभा होतो........ संघर्षाची ज्वाला आता वणवा होवू पाहत होती....(क्रमशः)
(प्रताप)
भाग 7: .....10 वी ..."फ".... लाजिरवाणी पण आयुष्य घडवणारी टक्केवारी...!!!
नववी ची परिक्षा झाली...पेपर चांगले गेले..निकाल लागला...दहावीत गेलो...पाहता पाहता दहावी... !!! शालेय जीवनाचा संरक्षक कोश असण्याचं अंतिम वर्ष... या नंतर..नव्हे या वर्षीपासुनच सगळे आयुष्याच्या वास्तविकतेची तयारी करतात...पण काहीजणांना जास्त खडतरता वाट्याला येते.......मी त्या पैकी एक....
शाळा सुरू झाली ..माझ्या शाळेत ऊन्हाळ्याचे व्हेकेशन क्लास नावाचा प्रकार नव्हता..पण सकाळची नियमीत शाळा संपल्यावर सायंकाळी एक्सट्रा क्लास चालायचे...शाळा भरण्या अगोदर सोबतची मुलं ट्युशन करून यायची..मला ती सोय नव्हती....सकाळची शाळा संपल्यास, सर्व मित्र आपापल्या घरी जायचे..आणि सायंकाळी मग क्लासला यायचे..मी मात्र शाळेच्या आसपास फिरत रहायचो...कधी कधी शाळेजवळ एखाद्या मित्राच्या घरी थांबायचो.. पण दररोज एखाद्याच्या घरी जाणे योग्य वाटत नसे.. सायंकाळी क्लास करायचा..गडबडीने चालत शिवाजी चौक गाठायचा..एसटी वेळेवर भेटली तर लगेच गावाकडे जायचे..नाहीतर शेवटची पावणे दहाची बस पकडून जायचे...ऊशीर व्हायचा...गावात रात्री लवकरच सामसुम होवून जायची...जास्त ऊशिर झाला तर वडील रोडवर बस थांबते तेथे येऊन वाट बघत थांबायचे...मग मी उतरलो की ..वडील एवढा ऊशीर का झाला हे विचारायचे..मी कारण सांगायचो..आम्ही मग रोडवरून घराकडे जायचो...जे असेल ते थोडेफार खायचो..दिवस शाळा व क्लास सोडला तर पुर्ण वाया गेलेला असायचा...दमून झोप लागायची..पहाटे आई किंवा वडील हाक मारून ऊठवायचे.. मग दुस-या दिवशी पुन्हा धावपळ...शाळा...क्लास ...त्या दरम्यान इकडे तिकडे टाइम पास..गणितच जमत नव्हतं दिवस कसा मॅनेज करायचा...
माझ्या या दिनक्रमामुळे घरी तर टेन्शन होतेच... पण इतरांना पण टेन्शन येत होते..."एवढा वेळ कुठे शाळा असते का? एवढी जिवापेक्षा जास्त शाळा शिकून थोडंच कोणी कामदार (नौकरदार) होतं , उगी जमते तेवढी शाळा शिकायला पाहिजे....वगैरे" अशी विविध बोलणी घरच्यांना ऐकावी लागायची.... लोकांचं चुकत नव्हतं...गावात त्यांचं जेवढं विश्व होतं त्या वरून ते मत व्यक्त करत होते... ..सगळ्या गावासारखं हे ही एक गाव...सगळे सण उत्सव यथाशक्ती खर्च करून विविध प्रथा परंपरेने साजरे करायचे...तोकड्या साधनावर समाधानानं जगायचं..सुगी चांगली झाली तरी बचत करत करत काटकसरीनं जगायचं..पोरांना टाकायचं म्हणून शाळेत टाकायचं... शाळा जमली त्याला तरी पुढे आर्थिक कुवत असेल तिथपर्यंतच शिकवायच...पोराचा एखादा विषय चुकुन राहिला किंवा तो नापास झाला तर मग कसलाही पुनर्विचार न करता रोजगाराच्या मागे लावायचं...कितीही वंचना असली तरीही समाधानाने जगायचं....सुखी समृध्द आयुष्य टिव्ही तच पाहून ते वेगळंच काहीतरी असतं आपला काही संबंध नाही ही ठाम समजूत करून घ्यायची.......गाव म्हणजे... सगळं काही एकमेकाच्या आधाराने...किंवा वेळ प्रसंगी एकमेकावर कुरघोडी करत आयुष्य कंठत रहायचं...गावात जयंती, सप्ता , भजन , पोथी वाचन हे कुठलीही चिकीत्सा न करता साजरी करायची...काही वाईट झालंच तर प्रारब्ध समजून मुकाट दिवस काढायचं...एखादा कोणी अर्धवट शिकलेला गावात पुढारीपण करतो त्याला निष्ठा वाहायची... हिच त्यांची जगायची रित....त्यामुळे गावातले , गल्लीतले लोक माझ्या शाळेत जाण्या-येण्यावरून सल्ले द्यायचे... मात्र व्हायचे उलंट..माझ्या घरचे आणि मी अजून जास्त जिद्दीने शिक्षणाची ओढ करायचो....तसेही आम्हाला कर्ज काढून शिक्षण देण्याने घर बदनामच होते.....
माझ्या अशा होणा-या धावपळीमुळे शेवटी मला लातूर मधे ठेवण्याचे ठरले..भिडस्त स्वभावाच्या माझ्या वडीलांनी नाही नाही करत माझ्या चुलत बहिणीच्या घरी मला दहावीचे वर्ष होईस्तोवर राहण्याची व्यवस्था केली..मी तिथे रहायला जाताना मला घरून जे जे देता येईल ते ते देवून वडील मला तेथे सोडुन गेले..सकाळी शाळा भरण्या अगोदर मुलं ट्युशन करतात म्हणून मला ऊसने अर्थात कर्जाने पैसे घेऊन गणिताची ट्युशनही लावून दिली. माझ्याकडे सायकल नसल्याने शाळेसमोरच असणारे ट्युशन लावले गेले..मी स्थिरावल्या सारखे झाल्याने रोज शाळेत जात होतो..येत होतो आणि ट्युशन करत होतो...पहिली घटक चाचणी आली ..पहिल्यांदाच मुलामुलींची मिळून घटक चाचणी झाली..आणी शाळेच्या या नविन प्रथेमुळे ...घटक चाचणीत मुलामुलींच्या जुजबी ओळखी झाल्या...घटक चाचणी नंतरही त्या " जुजबी "ओळखी सुरू राहिल्याने शाळेने अजून जास्त कडक शिस्त लागू केली..त्यावेळी काळ ही असा होता की,मुलं आणी मुली एकमेकाला बोलूच शकत नव्हते. चुकून बोलंतच असतील तर एखाद्या कामाशिवाय नाही आणी ते दोघं बोलंत असतील तर एवढ्या अंतरावरून बोलत की ते बोलताना त्या दोघांच्या मधून वर्गातल्या मुलांचा आख्खा लोंढा आरामात निघून जाईल ..आणी तो हमखास जायचाच!!!!! घटक चाचणीत चांगले मार्क मिळाले...
दोन तिन महिने निघून गेले..आणी जाणवायला लागलं की माझ्या तिथे राहण्यामुळे बहिण आणि तिच्या नव-यात बेबनाव होत आहे..अगोदरच त्यांच्यात पुर्वी पासुनच भांडण व्हायचे, बहिण एकदम नव-याला घाबरणारी.. त्यात माझ्या राहण्याने भांडणात वाढ झाली असे मला जाणवायला लागले...माझी खुपच अडचण होत होती....आणी त्या बहिणीची पण...ती मला काही सांगू पण शकत नव्हती...अगोदर पासुन भावजीचा स्वभाव म्हणजे सगळया घरावर हुकुमत ठेवण्याचा..घरातले सगळेच त्यांना प्रचंड घाबरत असत...ते दिवस दिवस भर ऑफीस बुडवून, कधी अर्ध्या वेळेतुनच परत येवून तर कधी कधी महिन् महिने ऑफीसला न जाता घरी कोणाशी न बोलता कागद घेवून आकडे जुळवत बसलेले असायचे..ते घरी असले की कोणाचाही आवाज नसायचा..मी त्यांना अगोदरच काही बोलत नव्हतो, त्यात त्यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे मी जेवढा वेळ घरा बाहेर थांबता येईल तेवढा थांबायचो.. आणी मी खुप वेळ घराबाहेर राहतो म्हणुन त्यांना माझ्या बहिणीकडे तक्रार करायला वाव भेटायचा..मला कोणाला काहीच बोलता येत नव्हतं..याची परिणीती म्हणजे मी थोडा दबून वागायला लागलो..आत्मविश्वास हरवला...आणी डोकं काम करेनासं झालं...भावजीवर काय वैयक्तिक टेन्शन होते ते त्यांनाच माहित..त्यांच्या टेन्शन मधे सगळं घर मात्र चिडीचूप रहायचं....एक दिवशी मी असाच ऊशीरा घरी पोहचलो.. अचानक बहिण व तिची मुलं रडताना दिसल्याने मी तिला रोजच्या सारखाच काही प्रकार असेल म्हणुन काय झाले म्हणून विचारले.. त्यावर तीने सांगितले की मी तिथे राहणे योग्य राहणार नाही..मी एकही शब्द न बोलता माझे कपडे व पुस्तके एका पिशवीत भरले आणी भाऊजींनी तिच्या माध्यमातून मला निरोप दिला आहे हे ओळखून रात्री गावाकडे जाण्यासाठीची शेवटची बस पकडण्यासाठी मी निघालो..नाईलाजाने बहिण म्हणाली उद्या सकाळी जा..कदाचित दारूच्या नशेत हे बोलले असतील ...पण माझ्या आत्मसन्मानाला खोलवर इजा झाली होती..मी अंतरी दुखावलो होतो...मी तिला वाईट वाटणार नाही अशा पध्दतीने अत्यंत संयमी पणाने सांगितले की टेन्शन घेऊ नको..मी घरी पोहोचेन...मी घरातुन रात्री नऊ वाजता बाहेर पडलो...बाहेर पडताना बहिण रडत होती..भाच्चा पण रडत होता तो पाचवीला असल्याने व अधुन मधुन मी त्याला अभ्यासाचे सांगत असल्याने त्याला ही माझी सवय झाली होती....मी दारा बाहेर पाउल टाकताना पाहीले ..भाऊजी दारूच्या नशेत झोपलेले होते......चार गल्ली पलिकडे गिरीश नावाचा माझा मित्र राहत होता मी त्याच्या कडे गेलो..त्याचे वडील रात्री ऑटो चालवायचे आणी दिवसा त्याची आई आणि वडील मेस चालवायचे...तो माझा क्लासमेट असल्याने मी त्याच्या कडे गेलो...तो मेस मधल्या मुलांना जेवण वाढत होता..मी अचानक गेल्याने..तो बाहेर आला...मी त्याला काहीच बोललो नसतानाही त्याने ओळखले काहीतरी बिघडले आहे..त्यांने विचारले..मी त्याला इतर काहीच न बोलता गावाकडे जात आहे म्हणून सांगितले..त्याने आग्रह केला आता जाऊ नको ..पण मी त्याला सांगितले की जावे लागेल...तिकीटासाठी पैसे घेतले..त्यांने जेवणासाठी विचारल्यास मात्र खुप दाटून आले..पण मी जेवण झाले आहे म्हणून सांगीतले आणी निघालो...
रस्त्याने मी त्या अंधारातून चालताना स्वतःला प्रश्न विचारत होतो की माझी अशी कोणती चुक झाली म्हणून मी येथे रहायला आलो होतो? आणि मी असे काय वाईट केलं होतं म्हणून माझ्यावर अशी अपमानास्पद वेळ आली? उद्या सकाळी ट्युशन , शाळा कशी करणार??? ज्या अंधारातून मी चालत निघालो होतो त्या पेक्षा जास्त अंधार आत दाटून आला होता.....भावजीच्या अशा वागणुकीचा मला किंवा माझ्या घरच्यांना बिल्कुल अंदाज व पूर्वकल्पना नसल्याने अशी गल्लत झाली होती..मी तिरमिरीत आणी विचारात चालत शिवाजी चौकात पोहचलो...बस ची वाट पाहीली...मन था-यावर नव्हते..असंख्य समस्या एका दिवसात समोर आल्या होत्या...बसलेली घडी विस्कटली होती..खचाखच भरलेली बस आली..कसाबसा गाडीत शिरलो...गाडी निघाल्यास मात्र एकदम काळजात धस्स झालं ..'आता घरी काय सांगायचं?'....
गावात गाडी पोहचली..अत्यंत दबावाखाली असल्याने धड रस्ता ही सुचत नव्हता...घरी गेल्यावर रामायणंच झालं...आईवडिलांना धक्का बसला...वडील म्हणाले तु काहीतरी चुक केली असेल...खुप रागवले..ओरडले माझ्यावर.. अगोदरच मी खुप दिवसा पासून दबावात होतो आता एकदम रसातळाला गेलो....लोक काय म्हणतील, पाहुणे काय म्हणतील...त्यांना पडलेले प्रश्न वेगळेच होते..आणी मला मात्र शाळा दिसत होती...पुन्हा पहिल्या पासून सुरूवात करावी लागणार होती....आणी सगळं विखुरलं होतं...दोन दिवस सारं स्थिरावायला लागले...आईची मध्यस्थी झाली..मी पुन्हा शाळेत जायला लागलो पण कसेतरी करून लावलेली ट्युशन मात्र करू शकत नव्हतो...मुलं खुप अभ्यास करायची ...मी मात्र या नैराश्यामुळे आक्रमक होवु लागलो होतो...आणी आपोआप माझी संगत शाळेतल्या टुकार मुलां सोबत जुळून गेली...मग मी शाळा ही बुडवली ...खुप भांडण, मारामारी करू लागलो...त्या भांडणा-या मुलांना माझ्या हुशारीचं कौतुक वाटायचं..आणी मला त्यांची बेडर जीवनशैली माझ्या अवस्थेवर उतारा वाटायची...बेभान होण्याची अवस्था आली...टुकार पध्दतीने जगणं हे ही जगणंच असतं असं वाटायला लागलं...घटक चाचणी वेळीच्या जुजबी ओळखी...दिर्घ ओळखीत रुपांतरीत झाल्या...मला परिणामांची भिती वाटेनासी झाली.....मी अक्षरशः वाया चाललो होतो....
मात्र हा बदल माझे क्लास टिचर यांच्या लक्षात आला...त्यांनी एके दिवशी शाळा सुटल्यावर मी, संदिप आणी मयुर या तिघांना शिपाया करवी निरोप देऊन शाळेच्या गच्चीवर बोलावले...(कितीही टुकारपणा केला तरी गुरुजनांचा आणी सामाजिक सभ्यचाराचा अवमान व्हावा असे कदापिही वर्तन मी केलेले नव्हते) आम्ही तिघेही गेलो...वर आप्पाराव सर व होनराव सर दोघेच होते...त्यांनी आम्हाला बसवलं आणि अत्यंत गांभीर्याने आमच्या चुका सांगून त्या करू नका, लहानपणी केलेल्या चुका आयुष्य बिघडवतात हे अत्यंत संयमाने व मित्रत्वाने समजवून सांगीतले....दोन्ही सर जवळपास दिड तास बोलंत होते....आणी दर सेकंदाला माझी टुकारपणाची नशा ऊतरत चालली होती....माझ्या व्यक्तीमत्वावर चढलेली पुटं गळुन पडली आणी मलूल झालेला निश्चय प्रज्जवलीत व्हायला लागला.. दरम्यानच्या काळात घेतलेले निर्णय आयुष्यभरासाठी सोबत घेऊन चालण्यासाठी ठाम निश्चय झाला.चुक समजली... पण ती दुरूस्त करण्यासाठी वेळ असायला हवी....!! अंतिम बोर्ड परीक्षेला फक्त दोन महिने राहिले होते..मी घरी पोहचल्यावर वडिलांशी आईशी बोललो..फक्त दोन महिने लातूरला रहायचे आहे म्हणून विनवणी केली..पण ती प्रत्यक्षात येण्यासाठी विस दिवस गेले...जेमतेम काही दिवस शिल्लक राहिले होते...आता परिक्षेचं दडपण जाणवायला लागलं होतं...सरते शेवटी घरच्यांनी किमान अभ्यास तरी होईल म्हणून व मी खुपच विनंती केल्याने मला लातूर मधे ठेवण्याचा निर्णय घेतला...विक्रम नगर मधे खुप मित्र झालेले असल्याने व ते ही बहुतांशी दहावी "फ" मधिल विद्यार्थी असल्याने व वैयक्तिक कारणाने ....मी एक परवडणारी मातीचे घर असणारी रूम तेथे भाड्याने घेतली, घरच्यांनी जेवण बनवायला माझ्या आज्जीला माझ्या सोबत ठेवले...(या वर्षातल्या सगळ्या कारणाने एकतर घरचा खर्च मी खुप वाढवून टाकला होता त्यात मी पुन्हा वाढ केली) पण मी आता इमानदारीने अभ्यासाला सुरूवात केली...विनोद नावाचा मित्र सोबत अभ्यास करायचा...पण आता बराच उशीर झाला होता.....आता तो अभ्यास न राहता...स्वतःला नापास होण्यापासून वाचवणे या थराला पोहचला होता...!!!
आता खरी घाबरगुंडी सुटली होती...कमी वेळात, तो ही नविन सिलॅबस कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय पुर्ण करणे म्हणजे दिव्यच!!! पण करत होतो...पश्चताप जाणवत होता...गाईड अथवा ' 21 अपेक्षित ' हे ही नव्हते..निव्वळ क्रमिक पुस्तकाधारे अभ्यास सुरू होता....
परिक्षा फी भरण्याची वेळ संपत आली होती...वडिल गावाकडून अजून पैसे घेऊन आले नव्हते..ते म्हणाले होते..सध्या आहे त्या पुस्तकातुन अभ्यास कर..आपण लवकरच फी भरू आणी गाईड घेऊ..पण मी रोज वाट पहायचो.. शेवटी परिक्षा फी भरण्याची वेळ निघून गेली..लेट फी ची वेळ सुरू झाली..मला खुप तणाव यायला लागला...मी दररोज शाळेत जावून त्यांची वाट पहायचो.. मला समजत असायचं ते तिकडे फी च्या पैशाची जुळवाजुळव करत असतील ..पण मग राग ही यायचा...सरते शेवटी लेट फी भरायला दोन दिवस राहिले...मी शाळेत जाऊन थांबायचो त्यांची वाट पहायचो..... लेट फी भरण्याचा शेवटचा दिवस...सायंकाळ 4:30 वाजले..मी वडील ज्या रस्त्याने येवू शकतात त्या रस्त्यावर जाऊन थांबलो..जिवाची नुसती घालमेल सुरू होती...कोणाला सांगायला जावं किंवा कोणाकडून उसने पैसे घ्यायला जावं आणी नेमके वडिल येवून गेले तर...या भितीपोटी मला तेथुन जाता ही येत नव्हतं..अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली होती..जर फी भरली नाही गेली तर अख्खं वर्ष वाया जाण्याची भिती निर्माण झाली होती..एक एक रूपयांची किंमत काय असते हे तेथेच समजले...मनात भिती दाटून येत होती की अशा फी न भरू न शकल्याच्या कारणाने जर वर्ष वाया गेले तर मी काय करेन वर्ष भर??? की मला पण गावातल्या मुलासारखे शाळा सोडावी लागेल? सगळे मुलं काॅलेजला जातील ...मी काय करेन??? आपणच काहीतरी करून पैसे शिल्लक ठेवायला पाहिजे होते वगैरे विचार डोक्यात येत होते...मला काहीच सुचत नव्हते...पण नियती थांबू देत नाही...डोळे पाण्याने भरून येत होते...मी अत्यंत असहाय्य होवून या परिस्थितीला अद्दल घडवायचीच हा निर्धार करत होतो..पण या निर्धारासाठी मला वर्ष वाया जाण्याची घोर किंमत देणे परवडणार नव्हते...वेळ जात होती..आणी मी अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या मानसिकतेत आलो होतो...आणी त्याच वेळी.....अचानक खांद्यावर हात पडला आणी" काय झालं...? " हा प्रश्न कानावर पडला...मी एकदम रडवेला झालो होतो....कसा कोण जाणे तो योगायोगाचा क्षण माझ्या आयुष्यात आला...मनात तळमळ असेल तर नियती निराश करत नाही याचा प्रत्यय येण्याचा तो क्षण..... माझ्या पुण्याला राहणा-या मोठ्या मामाचा मुलगा पुण्यावरून गावाकडे जाण्यासाठी लातूर हून जात होता. त्याला माझी शाळा माहित असल्याने तो शाळेकडे मला घ्यायला आला होता..त्याला वाटले की माझी शाळा सुटली असेल तर तो मला सोबत घेऊन गावाकडे जाईल...या योगायोगाचा धक्का मला आजपर्यंत जाणवतो...!!!! त्याला माझी स्थिती पाहून खुप वाईट वाटले... त्यांच्याशी माझी लहान पणा पासूनच मैत्री असल्याने व लहानपणी त्यांनेच पोहायला शिकवले असल्याने ...आमच्यात मित्रत्वाचे संबंध होते.. मला त्याने धिर दिला आणी सांगितलं की " एवढे टेन्शन कशाला घेतो? चल आपण फी भरू...मामा ( माझे वडील) कदाचित गाडी न मिळाल्यामुळे किंवा ईतर कारणाने ऊशीरा आले तर ऑफिस बंद होवून जाईल!!" त्याने मला त्याही परिस्थितीत माझी किंवा माझ्या कुटुंबाची मर्यादा जाणवू दिली नाही..व एकदाही मी त्याला फी भर न म्हणता किंबहुना मी तसे म्हणणारही नाही हे ओळखून स्वतःच फी भरण्याची तत्परता दाखवून माझा नियती वरचा विश्वास त्याने दृढ केला..त्या मदतीच्या हाताची किंमत आणी जाणीव आज ही अमुल्य आहे...अशा अनाहूत पुढे आलेल्या मदतीच्या हातांनीच माझ्या आयुष्याला आकार व आधार दिला आहे...
फी भरली, शाळा सिलॅबस संपल्यामुळे बंद होती...आता फक्त एकच ...अभ्यास...इकडून तिकडून मदत घेत..अभ्यास करताना मात्र खुप अडचणी येत होत्या..वाटायचं तिकडे वसतिगृहात राहिलो असतो तर बरं झालं असतं..पण एकदा चुकायला सुरूवात झाली की चुकतंच जाते...परिक्षा आली...दडपणात परिक्षा दिली...गणित भुमीतीचा पेपर अवघड गेला होता..पुन्हा सगळं सामान बांधून गावाकडे निघालो...जे काही बरे वाईट अनुभव या वर्षाने दिले होते..ते संचित सोबत होतं..आयुष्याची शिदोरी अशीच बनत जाते..मला आत्मचिंतन करण्याची गरज होती...पण आता आत्मचिंतन करून भागणार नव्हतं...कृती हवी होती..पण मी ठरवलं होतं...आता शिक्षणासाठी कमी पडायचं नाही...नापास होणार नाही आपण पण टक्केवारी घसरणार होती..ऐन मोक्याच्या वेळी समस्या आल्या होत्या...आता रडायचं नाही लढायचं ठरवलं होतं...परिस्थितीला शरण जायचं नाही तर तिच्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करायचा हा निर्धार केला होता...त्यासाठी ज्या दिवशी गावात पोहचलो त्याच्या दुस-या दिवशी जिल्हा परिषद शाळेतील काही मित्र गावापासून 3 किलोमिटर अंतरावर असणा-या ज्या प्रिंटीगप्रेस आणी ऑफसेट कंपनीत कामाला जात होते तेथे जायचे ठरवले. सुट्ट्या असे पर्यंत काम करायचे आणी मग शिक्षण घ्यायचे असे ठरवल्याने मोठा भाऊ पण सुट्ट्या असल्याने कामास तयार झाला. घरी परिस्थिती बिकट असल्याने पण फक्त सुट्ट्यातच काम करायचे असल्याने व काम पुस्तकांचे असल्याने घरच्यांनी जायला परवानगी दिली...
मी आणी माझा मोठा भाऊ कंपनीत गेलो..कंपनी मालकांना भेटलो..परिस्थितीची जाण असलेला हा भला माणूस..पण त्यांना रेग्युलर काम करणारे मुलं पाहिजे होते..त्यांना आम्ही कामाबद्दल बोललो..त्यांनी दरमहा सहाशे रूपये मिळतील म्हणून सांगीतले. आठ तासा पेक्षा जास्त काम केल्यास दिडपट ओव्हरटाईम बद्दल ही सांगीतले. आम्ही काम मिळाले म्हणूनच उपकृत झालो होतो कारण त्या वयात करण्या सारखे तेवढेच एक काम गावालगत उपलब्ध होते...दररोज सकाळी आम्ही दोघे भाऊ 6:30 वाजता निघायचो आणी 7.00 वाजता कंपनीत पोहचून कामाला लागायचो, पुस्तकाच्या फाॅर्मची जुळवाजुळव करणे, मशिनला ते पुरवणे, तयार झालेल्या पुस्तकाचे गठ्ठे बांधणे, बालभारतीच्या गोदामात पुस्तके पोहचवण्यासाठी गाडी भरणे..गाडीतुन पुस्तके काढून थप्पी लावणे, वेगवेगळ्या कंपनीच्या प्रॉडक्ट साठी लागणारे कव्हर तेथे बनत असत,त्यासाठी मशिनला लागणारा माल पुरवणे अशी कामे करायचो... काम एवढे अचूक व गतीने करायला लागलो की..कंपनी मालकांनी न सांगता न मागता परस्पर पगार वाढवला, सकाळी 7.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत आम्ही काम करायचो...काम करताना डोक्यात विचार असायचा की इमानदारीने काम केले तर कंपनी मालक सुट्ट्या संपल्यास अडवणुक करणार नाहीत...कामात एवढी गती आली की, सकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत केलेल्या कामावर तिन शिफ्ट मशीन चालायची...कशाचा राग त्या कामावर निघत होता माहीत नव्हतं...डोक्यात सतत विचार असायचा की हे काम आपल्याला फक्त सुट्ट्यात करायचे आहे..तेथे अगोदर पासून काम करणारे मित्र मात्र तिथे स्थिरावले होते. युनिट फार मोठं होतं साधारणतः 300 लोक काम करायचे . सगळे जण कामाचे कौतुक करायचे. आणी लहानपणा पासून ओळखणारे गावचे इतर सहकारी कामगार शिक्षण सोडू नका म्हणायचे... काम करताना डोक्यात सतत शाळा असायची....
निकाल जवळ आला..धाकधूक वाढली ...काय होते माहिती नव्हतं..तो लागला...पास झालो..फक्त 52% मिळाले होते पण या 52% ने दुनिया दाखवली होती..रसातळाला न जाता तरंगायची धमक दिली होती, साधनांची कमतरता लांघायचा कानमंत्र दिला होता..आणी भावी आयुष्यातील प्रवासाची जाणीवगर्भ सुरूवात करून दिली होती...घरी 52% वरून चांगलीच खरडपट्टी मिळाली..गावात काही लोकांना कुत्सिक हसण्यासाठी विषय मिळाला...आणी मला प्रज्जवलीत होण्यासाठी ठिणगी...अंतरीचा दिवा पेटला होता तो वादळात तेवण्यासाठी सज्ज होत होता..
52% वर कोठे अॅडमिशन मिळेल माहित नव्हते. कला शाखेशिवाय पर्याय नव्हता. प्रवेशासाठी फार्म भरले होते. पास झालो ही भावना उमेद निर्माण करून गेली..आता चुकायचे नाही हे भान आले...आता धावण्यासाठी तयार होतो पण रस्ता मिळत नव्हता....लहानपणी मोठ्या भावाचा झालेला सत्कार आठवत रहायचा...तेंव्हा पासुनच वाटायचं आपण काहीतरी मोठ्ठं झालं पाहिजे.. आता ठरवत होतो...जेंव्हा जेंव्हा बस स्टॅंड वर जायचो तेंव्हा तेंव्हा "स्पर्धा परीक्षा" मासीक पहायला मिळायचं... त्यावर मुला मुलीचे फोटो दिसायचे व त्या खाली अधिकारी पदाचा ऊल्लेख असायचा...त्या पुस्तकाच्या आत काय असतं ते माहिती नव्हतं...चुलत काका असेच संघर्षातुन शासकीय नोकरीत लागुन तहसीलदार म्हणून काम करत होते..त्यांची मुलं अर्थात मिलींद भाऊ (PSI) व सुनिल भाऊ (STI) परभणी कृषी विद्यापीठात शिकून सिलेक्शन झाल्याचे माहित होतं. एकदम लहान असताना मिलींद भाऊ कधी तरी घरी आल्याचं व त्यांच्या लग्नाला बिदरला गेल्याचं आठवत रहायचं...काका कधितरी घरी यायचे त्यांनी आणलेला बिस्किटचा पुडा आठवायचा पण..नंतर कधी नियमीत संपर्क राहिला नव्हता...पण वडील अधून मधून त्यांच्या बद्दल खुप अभिमानाने बोलायचे..आई पण कौतुक करायची..पण सोबतच "असे काहीतरी करायला पाहिजे " असे नक्की म्हणायची..ती सहज बोलून जायची..पण अंतःकरणात पक्षांचा अख्खा थवा चिवचिवायला लागायचा आणि मी नकळत उड्डाणाच्या आवेशात यायचो...वडील कौतुकाने पुतण्या बद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यांतील चमक मनात ठिणगी निर्माण करायची पण पडलेले 52% वास्तवाची जाणीव करून देत असत मी रिअॅक्ट होवूच शकत नव्हतो...
निकाल लागल्यावर कंपनी मालकांना भेटलो ...त्यांना खरे काय ते सांगितले..कायम काम करू शकत नाही शिक्षण आहे जावे लागेल..त्यांनी थोडेसे पाहिले आणि सांगितले ठिक आहे..पगार घेऊन जा...आम्ही त्यांचे आभार मानले..पगाराच्या पाकिटात जास्तीचे पैसे आहेत म्हणून सुपरवायझर ला सांगीतले तर त्यांनी सांगितले की, तुम्हा दोघांना पगार वाढवून मिळाला आहे..( तो पगार प्रत्येक सुट्टयात वाढतच राहीला आणी इतरांनी काम सोडून गेल्यास जर पुन्हा ते परत आले तर त्यांना पहिल्या पगार दरा पासून काम करावे लागायचे...तो नियम आम्हाला कधीच लागु झाला नाही.... पेठे साहेब त्यांचे नाव , काॅलेजला असताना त्यांची पुतणी वर्गात होती, तिला माहित होते आम्ही तिच्या काकाच्या कंपनीत सुट्ट्यात काम करतो पण तिने ते कधी जाणवू दिले नाही आणी त्यामुळे माझी मान ही कधि झुकली नाही...)
अॅडमिशन साठी प्रयत्न चालले होते..अनपेक्षित पणे महाराष्ट्रातील नामांकित काॅलेज, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे प्रवेश मिळाला . मी स्वतःला भाग्यवान समजत होतो...आता मागे हटायचे नव्हते..ही पाच वर्षे आयुष्य घडवणार होती..शाळेतले काही मित्र, घटक चाचणीत जुजबी ओळखी झालेल्या विशेष विद्यार्थीसह ब-याच जणांचे प्रवेश झाले होते...आयुष्य घडवणा-या या महाविद्यालयाने जे दिले ते क्वचितच मिळत असेल इतरत्र....मिळालेल्या पगारातून काॅलेजचा युनिफॉर्म, इतर शैक्षणिक साहित्य घेतलं, शैक्षणिक विद्यार्थ्यासाठी असणारा एसटीचा पास काढला....काॅलेज सुरू व्हायला अवकाश होता...सुट्टयात माळरानावर एकट्याने जायला क्वचित भेटले होते कामामुळे....मी आठवणीने त्याला काॅलेज सुरू होण्या अगोदर भेटायला गेलो... आणी तेथे जाऊन त्याला सांगीतले..माझे मनोरथ...!! पेरून टाकली माझी स्वप्न त्याच्या खडकाळ जमिनीवर आणी त्या स्वप्नांच्या बिया वाहणा-या वा-यावर स्वार होवून माझ्या अंतःकरणात रूजण्यासाठी परत आल्या ...मी बिया रूजवून घराकडे परत येत होतो...गाव शांत होत होतं आणी माझ्या आत खळबळ माजली होती... गावच्या मंदिरात वाजणारा अभंग वा-या सोबत वाहत कानावर पोहचत होता आणी मी नेमका शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निरखून पाहून पुढे येवून बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ऊभा होतो........ संघर्षाची ज्वाला आता वणवा होवू पाहत होती....(क्रमशः)
(प्रताप)
संघर्षाची व्याख्या काळात आहे सर....
ReplyDelete