'अटल' कवी
वडील कृष्ण बिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा वारसा असणारा मात्र स्वतःची स्वतंत्र शैली,प्रतिमासृष्टी व शब्दसौंदर्याची पेरण करत आशयघन कविता लिहून भारतीय समाजकारण , राजकारण प्रगल्भ करणा-या कवि मनाच्या अटलजी यांच्या निधनाने कविता काही क्षण नक्कीच स्तब्ध झाली आहे....
मौत की उमर क्या है? दो पल भी नही,
जिंदगी सिलसिला , आज कल की नही।
असे म्हणत आयुष्य तोलामोलाने जगणारा हा एक श्रेष्ठतम कवी. आयुष्याच्या प्रत्येक चढऊतारास कवितेच्या माध्यमातून जनमानसात अत्यंत मार्दवाने, प्रखरतेने व जाज्वल्याने पेरणारा हा खरा 'स्टेट्समन' !
आयुष्याच्या प्रवासात व दुनियादारीत निराशेचे क्षण आल्यास अत्यंत प्रामाणिक पणे त्यांची कविता म्हणते...
बेनकाब चेहरे है, दाग बडे गहरे है।
टूटता तिलिस्म,आज सच से भय खाता हूँ ।
.. ..........................गित नही गाता हूँ ।
पण झुंजारू वृत्तीचा त्यांचा 'अटल' स्वभाव पुन्हा त्याच जिगरने लढण्यास सज्ज होतो आणि ते लिहितात...
हार नही मानूंगा। रार नही ठानूंगा।
काल के कपाल पर, लिखता मिटाता हूँ । गीत नया गाता हूँ ।
स्वतःचा 'मै हिन्दू हूँ ।' असा 'अटल' परिचय देणारे धर्मनिरपेक्ष अटलजी 'अग्नीपंख' असणा-या अब्दुल कलाम सोबत पोखरणात 'बुध्दास पुन्हा हसवतात' व आपल्या कविता आयुष्य गित आहेत हेच अधोरेखीत करत म्हणतात .....
कदम मिलाकर चलना है।
आणी त्या मुळे ते पुन्हा पुन्हा 'अटल' होतात. 'माझी कविता योध्याची ललकार आहे ' असे नमुद करणारा हा योध्दा कवी आज आपल्यात नाही. त्याची मृत्युशी चाललेली झुंज काल संपली पण ते मनात झुंज पेरून जातात......
मौत से ठन गई,
झुजने का मेरा ईरादा ना था।
मोड पर मिलेंगे इसका वादा न था।
रास्ता रोककर वह खडी हो गई,
यो लगा जिंदगी से बडी हो गई।
देशाच्या या महान सुपुत्राने काळाच्या भाळावर आपली अमिट युगमुद्रा उमटवली आहे.
या श्रेष्ठास नमन....आपल्या कविता व कर्तृत्व आम्हाला प्रेरणा देत राहील.
' पहरा कोई काम ना आया, रसघट रित चला... जिवन बित चला ।
(प्रताप )
वडील कृष्ण बिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा वारसा असणारा मात्र स्वतःची स्वतंत्र शैली,प्रतिमासृष्टी व शब्दसौंदर्याची पेरण करत आशयघन कविता लिहून भारतीय समाजकारण , राजकारण प्रगल्भ करणा-या कवि मनाच्या अटलजी यांच्या निधनाने कविता काही क्षण नक्कीच स्तब्ध झाली आहे....
मौत की उमर क्या है? दो पल भी नही,
जिंदगी सिलसिला , आज कल की नही।
असे म्हणत आयुष्य तोलामोलाने जगणारा हा एक श्रेष्ठतम कवी. आयुष्याच्या प्रत्येक चढऊतारास कवितेच्या माध्यमातून जनमानसात अत्यंत मार्दवाने, प्रखरतेने व जाज्वल्याने पेरणारा हा खरा 'स्टेट्समन' !
आयुष्याच्या प्रवासात व दुनियादारीत निराशेचे क्षण आल्यास अत्यंत प्रामाणिक पणे त्यांची कविता म्हणते...
बेनकाब चेहरे है, दाग बडे गहरे है।
टूटता तिलिस्म,आज सच से भय खाता हूँ ।
.. ..........................गित नही गाता हूँ ।
पण झुंजारू वृत्तीचा त्यांचा 'अटल' स्वभाव पुन्हा त्याच जिगरने लढण्यास सज्ज होतो आणि ते लिहितात...
हार नही मानूंगा। रार नही ठानूंगा।
काल के कपाल पर, लिखता मिटाता हूँ । गीत नया गाता हूँ ।
स्वतःचा 'मै हिन्दू हूँ ।' असा 'अटल' परिचय देणारे धर्मनिरपेक्ष अटलजी 'अग्नीपंख' असणा-या अब्दुल कलाम सोबत पोखरणात 'बुध्दास पुन्हा हसवतात' व आपल्या कविता आयुष्य गित आहेत हेच अधोरेखीत करत म्हणतात .....
कदम मिलाकर चलना है।
आणी त्या मुळे ते पुन्हा पुन्हा 'अटल' होतात. 'माझी कविता योध्याची ललकार आहे ' असे नमुद करणारा हा योध्दा कवी आज आपल्यात नाही. त्याची मृत्युशी चाललेली झुंज काल संपली पण ते मनात झुंज पेरून जातात......
मौत से ठन गई,
झुजने का मेरा ईरादा ना था।
मोड पर मिलेंगे इसका वादा न था।
रास्ता रोककर वह खडी हो गई,
यो लगा जिंदगी से बडी हो गई।
देशाच्या या महान सुपुत्राने काळाच्या भाळावर आपली अमिट युगमुद्रा उमटवली आहे.
या श्रेष्ठास नमन....आपल्या कविता व कर्तृत्व आम्हाला प्रेरणा देत राहील.
' पहरा कोई काम ना आया, रसघट रित चला... जिवन बित चला ।
(प्रताप )
No comments:
Post a Comment