स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 5: .....भूकंपाच्या लहरी....
भुकंपाने जमिन आणी माणसे दोघेही हादरली होती... सर्वसाधारण माणसाला सर्वाधिक सुरक्षित वाटणारे घरच अंगावर कोसळून झोपेतली माणसे माती दगडा आड गेली होती....सारा परिसरच दहशतीखाली होता....हाहाकार माजला होता...माणसं आणी घरं दोन्ही कोसळले होते........!!
गाड्या, शाळा,बंद होत्या...कसेतरी धावत पळत वडील दुस-या दिवशी वसतीगृहावर आले.....हळहळ व भिती व्यक्त करत त्यांनी वाॅर्डनची परवानगी घेतली आणि मला गावाकडे घेवून जायला निघाले...सगळे शहर किल्लारीकडे धाव घेत होते....गावाकडे जायला गाडी नाही..कोणी थांबायला तयार नाही...आम्ही गाडी भेटेल म्हणत चालत गावाकडे निघालो...ते पुढे मी मागे......दोन गाव आम्ही चालत ओलांडले...कसेबसे गावात पोहोचलो...सगळा गाव दहशतीत होता..अधुन मधुन हादरे बसतच होते..दुरवर मोठ्ठा आवाज व्हायचा आणी ...मग कुठल्या तरी एका दिशेने जमीन हादरत यायची आणी आम्हाला हादरऊन लहर पुढे निघून जायची...अशा क्षणभर आलेल्या त्या लहरींची कंपने मात्र आमच्या कित्यक पिढ्यात जाणवतात आजही.........!!
मी घरी रहायला लागलो......पर्याय नव्हता....भूकंपाचा हादरा बसला की सगळे लोक घराबाहेर धावत यायचे...आम्हीही...पण लहर निघून गेल्यास भान यायचे..अरे आपण तर ऊगीचच धावत होतो...जीर्ण झालेलं झोपडं कोसळण्यानं आपण थोडंच मरू.. !! मोठ्या स्वरूपात मदत कार्य सुरू होतं..लोक जमेल तसं मदत करत होते..गावात विशीष्ठ वेळी एखादी गाडी यायची..सारा गाव भाकरी,भाजी आणी जे जे जमेल तो द्यायचा..गाडी जायची ..कोसळलेल्या लोकांना यथाशक्ती मदत करण्यासाठी तळमळणा-या या फाटक्या लोकाकडून मला त्या काळात परोपकार,संवेदना, माणुसकी शिकायला मिळाली...
शाळा बंद होती पण ही माणुसकीची शाळा मला शिकवत होती...मन दुःखी व्हायचं..किल्लारीला जावून मदत करून आलेले लोक तेथील हाल सांगायचे...सगळ्या क्षेत्रातुन मदतीचा ओघ सुरू होता...हळुहळु लोक सावरायला लागले..जिवन आपला मार्ग शोधतेच...लोक आपले दैनंदिन व्यवहार करायला लागले...पण त्यात एक कंपन आले होते.....मला ही शाळेत परत यावं लागलं...वसतिगृहात आल्यावर आम्ही सगळे मित्र भेटलो..कोणाचे काही नुकसान झाले का? कोणाच्या घरी काही जिवीतहानी झाली का? विचारून घेतलं..सुदैवाने तसे काही झाले नव्हते...पण भूकंपाची एवढी दहशत होती की आम्ही रोज रात्री वसतिगृहाच्या इमारती बाहेर झोपायचो... रोडवर..
अशा परिस्थितीत दोन मुलं मात्र इमारतीतच थांबायचे..अभ्यास करत..पांडुरंग राऊत आणी बालाजी हंबीरे..अभ्यासाने पेटून उठलेले हे दोघे..वाटायचे सगळ्या जगाचा अभ्यास हे दोघंच करताहेत...जणू अभ्यासासाठी यांना कशाचीच पर्वा नाही..मला वाटायचं यांना भिती कशी वाटत नसेल??? पण आता जाणवतं..आलेला भुकंप निघून जातो..पण यांच्या आयुष्यात जे हादरे बसले असतील ते बहुधा भुकंपापेक्षा जास्त तीव्रतेचे असतील....अशाच स्वरूपात अभ्यास करणारा अविनाश कुंभार, शिवाजी ही दोघं...त्यांनी पुढे काय केलं याची माहिती मात्र मिळाली नाही....
मी हाॅस्टेलवर येताना घरीच ठरलं होतं... एवढं वर्ष कसंतरी काढून ये त्यानंतर गावाकडे राहूनच शाळेत जायचं...भूकंपाने सगळं गणीतच बिघडवलं होतं...मी कसेबसे दिवस काढत होतो..अर्धपोटी राहूनही अभ्यास करायचा असतो ही जाणीव व्हायचं वय अजून झालेलं नव्हतं...ती जाणीव पण ठायी निर्माण झालेली नव्हती...माझी वेळ यायची होती....पण त्या येणा-या वेळेला बहुधा जाणवत होतं....की तीला तोंड देण्यासाठी मी तयार होत होतो...
मधेच एकदा बांधकाम भवन वरून चालत येताना एका गॅरेजवर मला माझ्या गावातील घरा शेजारीच राहणारा संजय काम करताना दिसला...त्याला भेटलो ..त्याने सांगितले की त्याने शाळा सोडली आता तो गॅरेजवर काम करून मेकॅनिक बनणार आहे....माझ्याकडे या विषयावर बोलायला काही नव्हते..मी त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणी वसतिगृहात परत आलो..येताना एकच विषय डोक्यात घोळत होता...मला ही माझ्या घरचे असेच कोठे कामासाठी पाठवू शकत होते..पण एवढ्या हालअपेष्टा सहन करून ते शिकायला संधी देत आहेत...नाहीतर खेड्यात एक साधा नियम आहे..खाणारी तोंडं वाढली की त्या प्रमाणात काम करणारे हात वाढायला पाहीजेत ...जबाबदारीची जाणीव व्हायला लागली...अधुन मधुन गावाकडून आई संजय जवळ डबा पाठवायची ..कधिकधी तो डबा मी वसतिगृहात घेवून यायचो.. कधी जास्त भुक लागली असेल तर तिथेच त्याच्या सोबत गॅरेजवर बसून गप्पा करत जेवण करायचो..
खुप प्रयत्न करून पाहिले...वसतिगृहाच्या दैनंदिनीत काही फरक पडतो का..पण नाही...उलट दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं....शाळेचा अभ्यासक्रम संपत आला होता...कसा तरी अभ्यास करून मी आठवीची परीक्षा दिली....माहिती होतं पुन्हा वसतिगृहात पुन्हा परत यायचे नाही...सगळ्या मित्रांना भेटलो..काही सिनियर म्हणाले येवून जा पुढच्या वर्षी पण...पण या भूकंपामुळे जवळपास माझ्या सोबत आलेले सगळेच मुलं पुन्हा परत येणार नव्हते..मी त्या वसतिगृहाच्या इमारतीत सगळ्यांना भेटून घेतलं आणि शाळेतल्या वर्गमित्रांना भेटून घेतलं.. सुट्ट्या लागल्याने निकालाची भिती घेवून गावाकडे परत आलो....
साधारणतः पाचवी पासुनच..घरी कामात मदत करायची सवय होती( अपरीहार्यता पण)...आईने घराला मदत व्हावी म्हणून कपडे शिवण्यासाठी टेलरींगचे काम सुरू केलेले होते. आम्ही तिन्ही भाऊ तिला मदत करायचो. सणासुदीला थोडे जास्त कपडे यायचे. त्यावेळी आम्ही दिवस दिवसभर बसून तीच्या कामात हातभार लावायचो.. या आठविच्या सुट्टयात पण भरपूर वाचन आणि घरी कामात मदत करत होतो..डोक्यात सतत एक विषय घोळत रहायचा कधी आपल्याला या सगळ्या वंचने पासून मुक्तता मिळेल...कठोर वास्तवावर हातातली पुस्तकं रामबाण उपाय ठरायची... त्यातील विषय..त्यातील प्रसंग भुरळ घालायचे...
भुकंपग्रस्तांसाठी आलेल्या मदतीतून आलेल्या कपडयातुन मावशीने काही कपडे आमच्यासाठी पाठवले होते.. खुप दिवसानंतर घरी काही नविन , कोरे करकरीत आले होते...सुट्ट्यात मोठा भाऊ आला होता...त्याच्या चित्रकलेने वेग घेतला होता तर..मी कविता आणी काहीबाही स्फुट लिहीत होतो...वास्तवाच्या ओंजळीतून ओघळलेले काही थेंब कवितेच्या व लिखाणाच्या रूपात ओलावा देत होते......
आम्ही सगळेच जणू आपापल्या परीने आल्या परिस्थितीला तोंड देत होतो...फरक एवढाच की ते देत असताना इतरांना कळू नये याचा अयशस्वी प्रयत्न करत होतो..दररोज सायंकाळी माळरान माझ्याशी बोलत होतं....दिवस कसेतरी सरत होते...बुडता सुर्य नव्या दिवसाची प्रकाशवात मनात पेरून धरणीआड होत होता...आणी मी अशा अगणित प्रकाशवाती सांभाळून ठेवत होतो...येणा-या अंधाराला संपवण्यासाठी... किती तरी संध्याकाळी मी मला घेवून भरकटत असायचो माळरानावर...स्वतःशी बोलत..शब्द फुटत नसत पण मनात कसला तरी पक्का निर्धार होत असायचा....टक्कर देण्यासाठी (क्रमशः)
(प्रताप)
भाग 5: .....भूकंपाच्या लहरी....
भुकंपाने जमिन आणी माणसे दोघेही हादरली होती... सर्वसाधारण माणसाला सर्वाधिक सुरक्षित वाटणारे घरच अंगावर कोसळून झोपेतली माणसे माती दगडा आड गेली होती....सारा परिसरच दहशतीखाली होता....हाहाकार माजला होता...माणसं आणी घरं दोन्ही कोसळले होते........!!
गाड्या, शाळा,बंद होत्या...कसेतरी धावत पळत वडील दुस-या दिवशी वसतीगृहावर आले.....हळहळ व भिती व्यक्त करत त्यांनी वाॅर्डनची परवानगी घेतली आणि मला गावाकडे घेवून जायला निघाले...सगळे शहर किल्लारीकडे धाव घेत होते....गावाकडे जायला गाडी नाही..कोणी थांबायला तयार नाही...आम्ही गाडी भेटेल म्हणत चालत गावाकडे निघालो...ते पुढे मी मागे......दोन गाव आम्ही चालत ओलांडले...कसेबसे गावात पोहोचलो...सगळा गाव दहशतीत होता..अधुन मधुन हादरे बसतच होते..दुरवर मोठ्ठा आवाज व्हायचा आणी ...मग कुठल्या तरी एका दिशेने जमीन हादरत यायची आणी आम्हाला हादरऊन लहर पुढे निघून जायची...अशा क्षणभर आलेल्या त्या लहरींची कंपने मात्र आमच्या कित्यक पिढ्यात जाणवतात आजही.........!!
मी घरी रहायला लागलो......पर्याय नव्हता....भूकंपाचा हादरा बसला की सगळे लोक घराबाहेर धावत यायचे...आम्हीही...पण लहर निघून गेल्यास भान यायचे..अरे आपण तर ऊगीचच धावत होतो...जीर्ण झालेलं झोपडं कोसळण्यानं आपण थोडंच मरू.. !! मोठ्या स्वरूपात मदत कार्य सुरू होतं..लोक जमेल तसं मदत करत होते..गावात विशीष्ठ वेळी एखादी गाडी यायची..सारा गाव भाकरी,भाजी आणी जे जे जमेल तो द्यायचा..गाडी जायची ..कोसळलेल्या लोकांना यथाशक्ती मदत करण्यासाठी तळमळणा-या या फाटक्या लोकाकडून मला त्या काळात परोपकार,संवेदना, माणुसकी शिकायला मिळाली...
शाळा बंद होती पण ही माणुसकीची शाळा मला शिकवत होती...मन दुःखी व्हायचं..किल्लारीला जावून मदत करून आलेले लोक तेथील हाल सांगायचे...सगळ्या क्षेत्रातुन मदतीचा ओघ सुरू होता...हळुहळु लोक सावरायला लागले..जिवन आपला मार्ग शोधतेच...लोक आपले दैनंदिन व्यवहार करायला लागले...पण त्यात एक कंपन आले होते.....मला ही शाळेत परत यावं लागलं...वसतिगृहात आल्यावर आम्ही सगळे मित्र भेटलो..कोणाचे काही नुकसान झाले का? कोणाच्या घरी काही जिवीतहानी झाली का? विचारून घेतलं..सुदैवाने तसे काही झाले नव्हते...पण भूकंपाची एवढी दहशत होती की आम्ही रोज रात्री वसतिगृहाच्या इमारती बाहेर झोपायचो... रोडवर..
अशा परिस्थितीत दोन मुलं मात्र इमारतीतच थांबायचे..अभ्यास करत..पांडुरंग राऊत आणी बालाजी हंबीरे..अभ्यासाने पेटून उठलेले हे दोघे..वाटायचे सगळ्या जगाचा अभ्यास हे दोघंच करताहेत...जणू अभ्यासासाठी यांना कशाचीच पर्वा नाही..मला वाटायचं यांना भिती कशी वाटत नसेल??? पण आता जाणवतं..आलेला भुकंप निघून जातो..पण यांच्या आयुष्यात जे हादरे बसले असतील ते बहुधा भुकंपापेक्षा जास्त तीव्रतेचे असतील....अशाच स्वरूपात अभ्यास करणारा अविनाश कुंभार, शिवाजी ही दोघं...त्यांनी पुढे काय केलं याची माहिती मात्र मिळाली नाही....
मी हाॅस्टेलवर येताना घरीच ठरलं होतं... एवढं वर्ष कसंतरी काढून ये त्यानंतर गावाकडे राहूनच शाळेत जायचं...भूकंपाने सगळं गणीतच बिघडवलं होतं...मी कसेबसे दिवस काढत होतो..अर्धपोटी राहूनही अभ्यास करायचा असतो ही जाणीव व्हायचं वय अजून झालेलं नव्हतं...ती जाणीव पण ठायी निर्माण झालेली नव्हती...माझी वेळ यायची होती....पण त्या येणा-या वेळेला बहुधा जाणवत होतं....की तीला तोंड देण्यासाठी मी तयार होत होतो...
मधेच एकदा बांधकाम भवन वरून चालत येताना एका गॅरेजवर मला माझ्या गावातील घरा शेजारीच राहणारा संजय काम करताना दिसला...त्याला भेटलो ..त्याने सांगितले की त्याने शाळा सोडली आता तो गॅरेजवर काम करून मेकॅनिक बनणार आहे....माझ्याकडे या विषयावर बोलायला काही नव्हते..मी त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणी वसतिगृहात परत आलो..येताना एकच विषय डोक्यात घोळत होता...मला ही माझ्या घरचे असेच कोठे कामासाठी पाठवू शकत होते..पण एवढ्या हालअपेष्टा सहन करून ते शिकायला संधी देत आहेत...नाहीतर खेड्यात एक साधा नियम आहे..खाणारी तोंडं वाढली की त्या प्रमाणात काम करणारे हात वाढायला पाहीजेत ...जबाबदारीची जाणीव व्हायला लागली...अधुन मधुन गावाकडून आई संजय जवळ डबा पाठवायची ..कधिकधी तो डबा मी वसतिगृहात घेवून यायचो.. कधी जास्त भुक लागली असेल तर तिथेच त्याच्या सोबत गॅरेजवर बसून गप्पा करत जेवण करायचो..
खुप प्रयत्न करून पाहिले...वसतिगृहाच्या दैनंदिनीत काही फरक पडतो का..पण नाही...उलट दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं....शाळेचा अभ्यासक्रम संपत आला होता...कसा तरी अभ्यास करून मी आठवीची परीक्षा दिली....माहिती होतं पुन्हा वसतिगृहात पुन्हा परत यायचे नाही...सगळ्या मित्रांना भेटलो..काही सिनियर म्हणाले येवून जा पुढच्या वर्षी पण...पण या भूकंपामुळे जवळपास माझ्या सोबत आलेले सगळेच मुलं पुन्हा परत येणार नव्हते..मी त्या वसतिगृहाच्या इमारतीत सगळ्यांना भेटून घेतलं आणि शाळेतल्या वर्गमित्रांना भेटून घेतलं.. सुट्ट्या लागल्याने निकालाची भिती घेवून गावाकडे परत आलो....
साधारणतः पाचवी पासुनच..घरी कामात मदत करायची सवय होती( अपरीहार्यता पण)...आईने घराला मदत व्हावी म्हणून कपडे शिवण्यासाठी टेलरींगचे काम सुरू केलेले होते. आम्ही तिन्ही भाऊ तिला मदत करायचो. सणासुदीला थोडे जास्त कपडे यायचे. त्यावेळी आम्ही दिवस दिवसभर बसून तीच्या कामात हातभार लावायचो.. या आठविच्या सुट्टयात पण भरपूर वाचन आणि घरी कामात मदत करत होतो..डोक्यात सतत एक विषय घोळत रहायचा कधी आपल्याला या सगळ्या वंचने पासून मुक्तता मिळेल...कठोर वास्तवावर हातातली पुस्तकं रामबाण उपाय ठरायची... त्यातील विषय..त्यातील प्रसंग भुरळ घालायचे...
भुकंपग्रस्तांसाठी आलेल्या मदतीतून आलेल्या कपडयातुन मावशीने काही कपडे आमच्यासाठी पाठवले होते.. खुप दिवसानंतर घरी काही नविन , कोरे करकरीत आले होते...सुट्ट्यात मोठा भाऊ आला होता...त्याच्या चित्रकलेने वेग घेतला होता तर..मी कविता आणी काहीबाही स्फुट लिहीत होतो...वास्तवाच्या ओंजळीतून ओघळलेले काही थेंब कवितेच्या व लिखाणाच्या रूपात ओलावा देत होते......
आम्ही सगळेच जणू आपापल्या परीने आल्या परिस्थितीला तोंड देत होतो...फरक एवढाच की ते देत असताना इतरांना कळू नये याचा अयशस्वी प्रयत्न करत होतो..दररोज सायंकाळी माळरान माझ्याशी बोलत होतं....दिवस कसेतरी सरत होते...बुडता सुर्य नव्या दिवसाची प्रकाशवात मनात पेरून धरणीआड होत होता...आणी मी अशा अगणित प्रकाशवाती सांभाळून ठेवत होतो...येणा-या अंधाराला संपवण्यासाठी... किती तरी संध्याकाळी मी मला घेवून भरकटत असायचो माळरानावर...स्वतःशी बोलत..शब्द फुटत नसत पण मनात कसला तरी पक्का निर्धार होत असायचा....टक्कर देण्यासाठी (क्रमशः)
(प्रताप)
No comments:
Post a Comment