स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 4: गाव ते वसतिगृह..वंचनेची गाथा.....
सातवीच्या सुट्ट्या महत्वाच्या होत्या. कारण गावात जिल्हा परिषदेची शाळा फक्त सातवी पर्यंत होती. पुढे शिकायचे तर गावातल्या सगळ्यांना सेलू, आलमला, औसा किंवा लातुरला शिकायला जावे लागायचे. जवळपास ची शाळा असली तर दररोज जाणे येणे करणे ठिक होते. एकतर गावातून जास्त पोरं सातवीच्या पुढे शिकत नसत. सातवी पर्यंत येता येता काहीजण शाळा सोडत. ज्यांच्याकडे शेतीवाडी आहे ते शेतीच्या कामाकडे वळत. माझ्या घरी तर सतत शिक्षणाचीच चर्चा! रोज पुढे काय करायचे याची चर्चा चालायची...कधी सातारा सैनिक स्कूल तर कधी लातूर...
मी सुट्टयात सडकून पुस्तके वाचून काढली ,जनशिक्षण निलामय केंद्र संपून गावातील एकमेव पण अत्यंत चांगले वाचनालय वाचून संपत आले होते. डोक्यात विचार गर्दी करत होते. पुस्तके बोलत होती, नविन गोष्टी कळत होत्या. वेळ मिळेल तेंव्हा गावातले मित्र पिरपाशा , दिलीप, प्रल्हाद, विनोद , दिपक, विजय यांना भेटून त्यांचा पुढल्या शिक्षणाचा काय प्लॅन आहे तेही अंदाज घेत होतो...दिवस सरत होते......आणी एकदाच्या सुट्ट्या संपल्या. त्या दरम्यान मला लातुरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून शिवाजी शाळेत आठवीला प्रवेश घ्यायचे ठरले.
सातवीचा निकाल लागला मी पास झालो होतो. आणी मिडल स्कुल स्काॅलरशिप परिक्षा पण...! पण याची दखल घेण्यासाठी ना माझी शाळा राहीली होती ना बनसोडे गुरूजी.....कारण त्यांचे अपघातात निधन झाले होते....
शेवटी लातुरच्या वसतिगृहात जाण्याची तयारी सुरू झाली..माझ्यासाठी वडीलांनी एक नवीन लोखंडी पेटी, दोन ड्रेस, काही आवश्यक किरकोळ सामान तालुक्याहून विकत घेतले आणि वडीला सोबत एसटी बसने मी लातूरला निघालो....... गावाकडून लातुरला येताना मन दाटून येत होते,मोठा भाऊ जसा नवोदयला गेला होता तसाच मीही घरा बाहेर पडत होतो ..गावातील सगळे दोस्त, शाळा, वाचनालय आणी माझ्या एकटेपणाला ज्याने सतत साथ दिली ते माळरान आता सगळे दुरावत होते......पण आता पाऊल टाकले होते.... माहीत नव्हतं वसतिगृह ,शाळा कोठे आहे ,कसे आहे ...मनात भितीपण वाटत होती..आपला निभाव लागेल का? आपण तिथे टिकू का? शाळा कशी असेल? आपल्याला काही जमेल का नाही..तेथील मुले कशी असतील...प्रश्नच प्रश्न!!!
विचाराच्या तंद्रीत असतानाच... एस टी लातुरला पोहचली. मी आणी वडील बांधकाम भवन जवळ उतरलो. बांधकाम भवन म्हणजे शहराच्या बाहेरचा पहिला थांबा. गाडीतुन उतरलो ..वडील खांद्यावर पेटी घेवून पुढे चालत होते आणि एक पिशवी घेवून मी त्यांच्या मागोमाग चालत होतो... वाटलं होतं मेन रोड पासुन वसतिगृह जवळ असेल पण ते निघाले एकदम शेवटी..त्याला लागुन शेतीच होती.वसतिगृह एकुण नऊ छोट्या छोट्या ब्लॉक मधे होतं..वडीलांनी कार्यालयात जाउन प्रवेशाचं नक्की केलं.. मला रहायला इथेही सगळ्यात शेवटचा पण उगवती कडला ब्लॉक मिळाला. तिथल्या नियमानुसार ज्युनिअर मुलांनी ब्लाॅकच्या काॅमन रूम मधे रहायचे तर सिनीअर्सनी रुम मध्ये. मला मिळालेल्या ब्लाॅक मधे असणा-या काॅमन रूम मधे माझे सामान वडीलांनी एका कोप-यात निट लाऊन ठेवले..निट रहायचे, शाळा बुडवायची नाही, अभ्यास करायचा , जे मिळेल ते वेळेवर जेवायचे, मी येत राहीन भेटायला हे सगळं सांगीतलं आणी सिनियर मुलांना काळजी घेण्याबद्दल सांगुन त्यांनी निरोप घेतला..ते जाताना मी शांत होतो पण ते निघून गेल्यावर मात्र रडायला आलं...
कोणीच ओळखीचं नाही...शाळा तेथुन साधारणतः साडेतिन किलोमिटर अंतरावर..तीही सकाळी साडेसात वाजता ... ना सायकल, ना जायची व्यवस्था..ऐपत नसताना सिटी बसचा पास काढायचा तर..ती पकडायला दिड किलोमिटर जा ..आणी ती जिथे थांबते तेथुन शाळा आतमध्ये एक किलोमिटर...!!! अपवाद वगळता हाॅस्टेलचे सगळे मुलं जवळच्या लालबहाद्दूर शाळेत प्रवेश घेतलेले आणी आम्ही तिघंच शिवाजी शाळेत. सगळंच अवघड..........होऊन बसलं होतं.......
हळु हळु ओळखी व्हायला लागल्या, वसतिगृह म्हणजे शिस्त असेलच असे नाही. हेही वसतिगृह एक साधारण वसतिगृहा प्रमाणेच! जेवणाचे हाल, साधनाची कमतरता,शाळा बुडवून ती सुटायच्या वेळेपर्यंत रूम मधे लपून राहणारे मुलं! किंवा शाळेच्या वेळेला निघून शाळेत न जाता जेवणाच्या ओढीने लवकर वसतिगृहात परत येणारी मुलं! वसतिगृह अधिक्षकाच्या विरूध्द मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत आम्हा सगळ्यांना घेवून जावून निवेदन देणारी मुलं! गणेश ऊत्सवाच्या काळात भारी ऑर्केस्ट्रा येतात म्हणून रात्री उशिरा पर्यंत लातुरभर चालत फिरणारी व मिळेल तो कार्यक्रम पाहत बसणारी मुलं! व तु एकटा कशाला बसून राहतो म्हणुन प्रत्येक ज्युनिअर ला सोबत यायला भाग पाडणारी मुलं!तर दुस-या बाजुला छान छान कविता लिहिणारे, झपाटून अभ्यास करणारे, गणिताच्या व भुमितीच्या सरावाला कागद पुरत नाहीत म्हणुन काचेच्या तुकड्यावर शाई पेनने सराव करून कसलाही गोंधळ न करता अर्धपोटी राहून निष्ठेने अभ्यास करून दहावीची परिक्षा मेरिट मधे येवून उत्तिर्ण करणारी मुलं( या पैकी मला ज्या ब्लॉक मधे रहायला मिळाले त्याच ब्लाॅक मधिल एक सिनियर पांडुरंग राऊत हा मित्र हालाखीच्या परिस्थितीतुन डाॅक्टर तर झालाच पण तशीच वंचनेची परिस्थिती असुनही UPSC मधुन IRS झाला व आज सीनियर पदावर कार्यरत आहे. तर दुसरा त्याचा साथी बालाजी हंबिरे मेरिट येवून, ईंजिनीयर बनून आज UAE मधे वरिष्ठ हुद्दयावर कार्यरत आहे.) सगळ्याच प्रकारचे मुलं तिथे होती. आता मला ठरवायचे होते काय करायचे...
मी खुप प्रयत्न करत होतो वाईट संगत लागु नये, शाळा बुडवू नये. पण सकाळी सकाळी थंड पाण्याने अंघोळ करून ,काहीच न खाता( तशी सोयच नव्हती) दप्तर सांभाळत , शेतीच्या बाजु बाजुने धावत पळत शाळेत वेळेवर पोहोचण्याची धडपड करायचो. कधी पोहचायचो कधी नाही!! ज्या दिवशी नाही पोहचलो त्या दिवशी एक तर छडीने मार खावा लागायचा, नाहीतर एक तास वर्गाबाहेर ऊभं रहावं लागे. दुस-या तासाला येणा-या शिक्षकांना वाटे की याने काहीतरी केले असेल म्हणुन याला थांबवले असेल वर्गाबाहेर...आणी मग त्या तासात बोलणी खावी लागायची. वर्गात काही नविन मित्र झाले. पडवळ, तांडुरे , चित्रकलेत पारंगत असणारा राऊत ..ते राहिलेला अभ्यास सांगायचे..मदत करण्यासाठी प्रयत्न करायचे..साडेदहा वाजता इंटरव्हल व्हायचा. सगळे मुलं आपापले टिफीन खायला घ्यायचे. काहीजण शाळेच्या समोरील गाड्यावर चाॅकलेट्स , भेळ घेण्यासाठी झुंबड करायचे. मी मात्र जवळ नसलेला टिफीन, खिशात नसलेले पैसे, आणी लागलेली भुक विसरून शाळेतल्या नळाला पाणी पिऊन घ्यायचो. तो काळ खुप अवघड असायचा वर्गात थांबावं तर मुलं टिफीन खात असंत, बाहेर जावं तर पोरांची गाड्यावर चाललेली खरेदी....भुकेनं कासावीस व्हायचं....मग तेथुन सगळं लक्ष वसतिगृहाच्या रस्त्यावर लागायचं!!! भुक आणी शिक्षण नुसतं द्वंद्व!!!! हे पिढीजात वैर आहे..पण भुक या शत्रुवर प्रेम करणा-या विद्यार्थ्यांना या भुकेनंच माणसांत आणलं आहे..
शाळा सुटली की तडक वसतिगृहाकडे चालायला लागायचं...चालणं कसलं ..धावणंच ते....तेथे स्वयंपाकी भंडारी मामा ने अत्यंत काटेकोर व काटकसरीने आणी वय लक्षात घेवुन सकाळी दहा वाजता भरलेला टिफीन उचलायचा. पटपट जेवण करायचं ...आणी वाट पहायची रात्रीच्या जेवणाची.....तसं... पाणी .. मधुन मधुन मदत करायचं...
कसातरी शिकत होतो, शहरातले काही मित्र झाले. ते घरी बोलवायचे. गेलो तर बाहेर रस्त्यावरच बोलायचो...घरात कधी गेलोच त्यांच्या तर अदबीने बसायचो...आणी त्यांची नीटनेटकी घरे पाहून स्वप्न पडल्या सारखं वाटायला लागायचं म्हणुन लवकर निघायचो... फक्त राऊतचं घर बरं वाटायचं...तिथं दडपण यायचं नाही कारण त्याचं घर दिड रूमचं होतं...आमच्या झोपडी सारखंच....
या वसतिगृहाने भुकेची किंमत कळवली...सगळं चुकत चाललं होतं ..हाल होत होते...घरापासुन लांब असताना परिस्थिती लचके तोडण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला जमेल तसं तोंड देण्याचा प्रयत्न करत होतो...जमेल तसं शिकत होतो.. शाळा बुडण्याचं प्रमाण वाढायला लागलं..अधुन मधुन वडील यायचे, काही खायला घेवून यायचे, थोडेफार पैसे द्यायचे...जपून जपून वापरायचो...डिपार्टमेंटल स्टोअर्स आणी जनरल स्टोअर्स अशा दुकानाच्या पाट्या बघितल्या की नेमकं तिथं काय मिळतं हे माहित नसल्यानंही पैसे जास्त दिवस पुरायचे......घरची आठवण यायची..वाटायचं उगीच आलो आपण...पण दुस-या बाजुला शहर..त्याचे रीतिरिवाज कळायला लागले होते...थोडा धाडसीपणा पण आला होता...
सुट्ट्या होत्या म्हणून एकदा घरची जास्त आठववण आल्याने व घरी जावून खुप दिवस झाल्याने गावाकडे जाण्यासाठी निघालो..हाफ तिकीट निघून ऊरतील एवढे पैसे होते. एसटी आली गाडीत बसलो..गावचेच कंडक्टर होते...तिकीट काढण्यासाठी पैसे दिले..गावाचे नाव सांगितले..त्यांनी कोणाकडे चालला म्हणून विचारले ...मी त्यांना मी तुमच्या गावचाच आहे म्हणून सांगीतले...तर त्यांनी मला नाव विचारले..वाटलं सहज विचारत आहेत...पण नाव सांगीतल्यावर माहित नाही त्यांनी एकदम मला सांगीतले फुल तिकीट लागेल म्हणून..मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकले नाहीत...त्यांनी फुल तिकीटाचे पैसे नाहीत दोन रूपये कमी आहेत म्हणून मला वासनगाव या गावच्या पाटीवर उतरून दिले...गाडी निघून गेली ..त्यानंतर चार बस निघून गेल्या पण मला बसायचे धाडस झाले नाही...पाचव्या बस मधून मात्र गावातल्या ओळखीच्या माणसाने आवाज दिला म्हणून मी गाडीत बसलो..सुदैवाने या कंडक्टरने मात्र हाफ तिकीटावरच मला गावात सोडले....मला आज पर्यंत समजले नाही की त्या गावच्या कंडक्टरला नेमके काय रुचले नव्हते...
(पण वडील सांगतात की माझे सिलेक्शन झाल्यावर त्याच कंडक्टर साहेबांनी माझ्या वडीलांना बाहेर चौकात विचारले होते की, 'वाघमारे तुमचा कुठला मुलगा साहेब झाला?' त्यावेळी माझ्या वडीलांनी त्यांना गावातील इतर प्रतिष्ठा सोबत सन्मानाने चहा पाजून सांगितले की, " साहेब ज्या मुलाला तुम्ही फुल तिकीटाचे पैसे नाहीत म्हणून अर्ध्या रस्त्यात उतरवले होते ना तो मुलगा तुमच्या सारख्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आशीर्वादाने साहेब झाला आहे!!!!' आजही ते निवृत्त कंडक्टर साहेब कधी गावाकडे गेल्यास भेटतात ..मी त्यांना ओळख न देता आदरपुर्वक नमस्कार करतो...मी माझे संस्कार सोडत नाही!)
आठवीचे वर्ष जेमतेम एक सत्र झालं होतं....आणी अचानक गावापासून फक्त तिस किलोमिटर अंतरावर असणा-या किल्लारीचा भुकंप झाला ..तो हादरवून गेला....मी जमीन हादरताना...पाहीली आहे.... (क्रमशः)
(प्रताप)
भाग 4: गाव ते वसतिगृह..वंचनेची गाथा.....
सातवीच्या सुट्ट्या महत्वाच्या होत्या. कारण गावात जिल्हा परिषदेची शाळा फक्त सातवी पर्यंत होती. पुढे शिकायचे तर गावातल्या सगळ्यांना सेलू, आलमला, औसा किंवा लातुरला शिकायला जावे लागायचे. जवळपास ची शाळा असली तर दररोज जाणे येणे करणे ठिक होते. एकतर गावातून जास्त पोरं सातवीच्या पुढे शिकत नसत. सातवी पर्यंत येता येता काहीजण शाळा सोडत. ज्यांच्याकडे शेतीवाडी आहे ते शेतीच्या कामाकडे वळत. माझ्या घरी तर सतत शिक्षणाचीच चर्चा! रोज पुढे काय करायचे याची चर्चा चालायची...कधी सातारा सैनिक स्कूल तर कधी लातूर...
मी सुट्टयात सडकून पुस्तके वाचून काढली ,जनशिक्षण निलामय केंद्र संपून गावातील एकमेव पण अत्यंत चांगले वाचनालय वाचून संपत आले होते. डोक्यात विचार गर्दी करत होते. पुस्तके बोलत होती, नविन गोष्टी कळत होत्या. वेळ मिळेल तेंव्हा गावातले मित्र पिरपाशा , दिलीप, प्रल्हाद, विनोद , दिपक, विजय यांना भेटून त्यांचा पुढल्या शिक्षणाचा काय प्लॅन आहे तेही अंदाज घेत होतो...दिवस सरत होते......आणी एकदाच्या सुट्ट्या संपल्या. त्या दरम्यान मला लातुरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून शिवाजी शाळेत आठवीला प्रवेश घ्यायचे ठरले.
सातवीचा निकाल लागला मी पास झालो होतो. आणी मिडल स्कुल स्काॅलरशिप परिक्षा पण...! पण याची दखल घेण्यासाठी ना माझी शाळा राहीली होती ना बनसोडे गुरूजी.....कारण त्यांचे अपघातात निधन झाले होते....
शेवटी लातुरच्या वसतिगृहात जाण्याची तयारी सुरू झाली..माझ्यासाठी वडीलांनी एक नवीन लोखंडी पेटी, दोन ड्रेस, काही आवश्यक किरकोळ सामान तालुक्याहून विकत घेतले आणि वडीला सोबत एसटी बसने मी लातूरला निघालो....... गावाकडून लातुरला येताना मन दाटून येत होते,मोठा भाऊ जसा नवोदयला गेला होता तसाच मीही घरा बाहेर पडत होतो ..गावातील सगळे दोस्त, शाळा, वाचनालय आणी माझ्या एकटेपणाला ज्याने सतत साथ दिली ते माळरान आता सगळे दुरावत होते......पण आता पाऊल टाकले होते.... माहीत नव्हतं वसतिगृह ,शाळा कोठे आहे ,कसे आहे ...मनात भितीपण वाटत होती..आपला निभाव लागेल का? आपण तिथे टिकू का? शाळा कशी असेल? आपल्याला काही जमेल का नाही..तेथील मुले कशी असतील...प्रश्नच प्रश्न!!!
विचाराच्या तंद्रीत असतानाच... एस टी लातुरला पोहचली. मी आणी वडील बांधकाम भवन जवळ उतरलो. बांधकाम भवन म्हणजे शहराच्या बाहेरचा पहिला थांबा. गाडीतुन उतरलो ..वडील खांद्यावर पेटी घेवून पुढे चालत होते आणि एक पिशवी घेवून मी त्यांच्या मागोमाग चालत होतो... वाटलं होतं मेन रोड पासुन वसतिगृह जवळ असेल पण ते निघाले एकदम शेवटी..त्याला लागुन शेतीच होती.वसतिगृह एकुण नऊ छोट्या छोट्या ब्लॉक मधे होतं..वडीलांनी कार्यालयात जाउन प्रवेशाचं नक्की केलं.. मला रहायला इथेही सगळ्यात शेवटचा पण उगवती कडला ब्लॉक मिळाला. तिथल्या नियमानुसार ज्युनिअर मुलांनी ब्लाॅकच्या काॅमन रूम मधे रहायचे तर सिनीअर्सनी रुम मध्ये. मला मिळालेल्या ब्लाॅक मधे असणा-या काॅमन रूम मधे माझे सामान वडीलांनी एका कोप-यात निट लाऊन ठेवले..निट रहायचे, शाळा बुडवायची नाही, अभ्यास करायचा , जे मिळेल ते वेळेवर जेवायचे, मी येत राहीन भेटायला हे सगळं सांगीतलं आणी सिनियर मुलांना काळजी घेण्याबद्दल सांगुन त्यांनी निरोप घेतला..ते जाताना मी शांत होतो पण ते निघून गेल्यावर मात्र रडायला आलं...
कोणीच ओळखीचं नाही...शाळा तेथुन साधारणतः साडेतिन किलोमिटर अंतरावर..तीही सकाळी साडेसात वाजता ... ना सायकल, ना जायची व्यवस्था..ऐपत नसताना सिटी बसचा पास काढायचा तर..ती पकडायला दिड किलोमिटर जा ..आणी ती जिथे थांबते तेथुन शाळा आतमध्ये एक किलोमिटर...!!! अपवाद वगळता हाॅस्टेलचे सगळे मुलं जवळच्या लालबहाद्दूर शाळेत प्रवेश घेतलेले आणी आम्ही तिघंच शिवाजी शाळेत. सगळंच अवघड..........होऊन बसलं होतं.......
हळु हळु ओळखी व्हायला लागल्या, वसतिगृह म्हणजे शिस्त असेलच असे नाही. हेही वसतिगृह एक साधारण वसतिगृहा प्रमाणेच! जेवणाचे हाल, साधनाची कमतरता,शाळा बुडवून ती सुटायच्या वेळेपर्यंत रूम मधे लपून राहणारे मुलं! किंवा शाळेच्या वेळेला निघून शाळेत न जाता जेवणाच्या ओढीने लवकर वसतिगृहात परत येणारी मुलं! वसतिगृह अधिक्षकाच्या विरूध्द मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत आम्हा सगळ्यांना घेवून जावून निवेदन देणारी मुलं! गणेश ऊत्सवाच्या काळात भारी ऑर्केस्ट्रा येतात म्हणून रात्री उशिरा पर्यंत लातुरभर चालत फिरणारी व मिळेल तो कार्यक्रम पाहत बसणारी मुलं! व तु एकटा कशाला बसून राहतो म्हणुन प्रत्येक ज्युनिअर ला सोबत यायला भाग पाडणारी मुलं!तर दुस-या बाजुला छान छान कविता लिहिणारे, झपाटून अभ्यास करणारे, गणिताच्या व भुमितीच्या सरावाला कागद पुरत नाहीत म्हणुन काचेच्या तुकड्यावर शाई पेनने सराव करून कसलाही गोंधळ न करता अर्धपोटी राहून निष्ठेने अभ्यास करून दहावीची परिक्षा मेरिट मधे येवून उत्तिर्ण करणारी मुलं( या पैकी मला ज्या ब्लॉक मधे रहायला मिळाले त्याच ब्लाॅक मधिल एक सिनियर पांडुरंग राऊत हा मित्र हालाखीच्या परिस्थितीतुन डाॅक्टर तर झालाच पण तशीच वंचनेची परिस्थिती असुनही UPSC मधुन IRS झाला व आज सीनियर पदावर कार्यरत आहे. तर दुसरा त्याचा साथी बालाजी हंबिरे मेरिट येवून, ईंजिनीयर बनून आज UAE मधे वरिष्ठ हुद्दयावर कार्यरत आहे.) सगळ्याच प्रकारचे मुलं तिथे होती. आता मला ठरवायचे होते काय करायचे...
मी खुप प्रयत्न करत होतो वाईट संगत लागु नये, शाळा बुडवू नये. पण सकाळी सकाळी थंड पाण्याने अंघोळ करून ,काहीच न खाता( तशी सोयच नव्हती) दप्तर सांभाळत , शेतीच्या बाजु बाजुने धावत पळत शाळेत वेळेवर पोहोचण्याची धडपड करायचो. कधी पोहचायचो कधी नाही!! ज्या दिवशी नाही पोहचलो त्या दिवशी एक तर छडीने मार खावा लागायचा, नाहीतर एक तास वर्गाबाहेर ऊभं रहावं लागे. दुस-या तासाला येणा-या शिक्षकांना वाटे की याने काहीतरी केले असेल म्हणुन याला थांबवले असेल वर्गाबाहेर...आणी मग त्या तासात बोलणी खावी लागायची. वर्गात काही नविन मित्र झाले. पडवळ, तांडुरे , चित्रकलेत पारंगत असणारा राऊत ..ते राहिलेला अभ्यास सांगायचे..मदत करण्यासाठी प्रयत्न करायचे..साडेदहा वाजता इंटरव्हल व्हायचा. सगळे मुलं आपापले टिफीन खायला घ्यायचे. काहीजण शाळेच्या समोरील गाड्यावर चाॅकलेट्स , भेळ घेण्यासाठी झुंबड करायचे. मी मात्र जवळ नसलेला टिफीन, खिशात नसलेले पैसे, आणी लागलेली भुक विसरून शाळेतल्या नळाला पाणी पिऊन घ्यायचो. तो काळ खुप अवघड असायचा वर्गात थांबावं तर मुलं टिफीन खात असंत, बाहेर जावं तर पोरांची गाड्यावर चाललेली खरेदी....भुकेनं कासावीस व्हायचं....मग तेथुन सगळं लक्ष वसतिगृहाच्या रस्त्यावर लागायचं!!! भुक आणी शिक्षण नुसतं द्वंद्व!!!! हे पिढीजात वैर आहे..पण भुक या शत्रुवर प्रेम करणा-या विद्यार्थ्यांना या भुकेनंच माणसांत आणलं आहे..
शाळा सुटली की तडक वसतिगृहाकडे चालायला लागायचं...चालणं कसलं ..धावणंच ते....तेथे स्वयंपाकी भंडारी मामा ने अत्यंत काटेकोर व काटकसरीने आणी वय लक्षात घेवुन सकाळी दहा वाजता भरलेला टिफीन उचलायचा. पटपट जेवण करायचं ...आणी वाट पहायची रात्रीच्या जेवणाची.....तसं... पाणी .. मधुन मधुन मदत करायचं...
कसातरी शिकत होतो, शहरातले काही मित्र झाले. ते घरी बोलवायचे. गेलो तर बाहेर रस्त्यावरच बोलायचो...घरात कधी गेलोच त्यांच्या तर अदबीने बसायचो...आणी त्यांची नीटनेटकी घरे पाहून स्वप्न पडल्या सारखं वाटायला लागायचं म्हणुन लवकर निघायचो... फक्त राऊतचं घर बरं वाटायचं...तिथं दडपण यायचं नाही कारण त्याचं घर दिड रूमचं होतं...आमच्या झोपडी सारखंच....
या वसतिगृहाने भुकेची किंमत कळवली...सगळं चुकत चाललं होतं ..हाल होत होते...घरापासुन लांब असताना परिस्थिती लचके तोडण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला जमेल तसं तोंड देण्याचा प्रयत्न करत होतो...जमेल तसं शिकत होतो.. शाळा बुडण्याचं प्रमाण वाढायला लागलं..अधुन मधुन वडील यायचे, काही खायला घेवून यायचे, थोडेफार पैसे द्यायचे...जपून जपून वापरायचो...डिपार्टमेंटल स्टोअर्स आणी जनरल स्टोअर्स अशा दुकानाच्या पाट्या बघितल्या की नेमकं तिथं काय मिळतं हे माहित नसल्यानंही पैसे जास्त दिवस पुरायचे......घरची आठवण यायची..वाटायचं उगीच आलो आपण...पण दुस-या बाजुला शहर..त्याचे रीतिरिवाज कळायला लागले होते...थोडा धाडसीपणा पण आला होता...
सुट्ट्या होत्या म्हणून एकदा घरची जास्त आठववण आल्याने व घरी जावून खुप दिवस झाल्याने गावाकडे जाण्यासाठी निघालो..हाफ तिकीट निघून ऊरतील एवढे पैसे होते. एसटी आली गाडीत बसलो..गावचेच कंडक्टर होते...तिकीट काढण्यासाठी पैसे दिले..गावाचे नाव सांगितले..त्यांनी कोणाकडे चालला म्हणून विचारले ...मी त्यांना मी तुमच्या गावचाच आहे म्हणून सांगीतले...तर त्यांनी मला नाव विचारले..वाटलं सहज विचारत आहेत...पण नाव सांगीतल्यावर माहित नाही त्यांनी एकदम मला सांगीतले फुल तिकीट लागेल म्हणून..मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकले नाहीत...त्यांनी फुल तिकीटाचे पैसे नाहीत दोन रूपये कमी आहेत म्हणून मला वासनगाव या गावच्या पाटीवर उतरून दिले...गाडी निघून गेली ..त्यानंतर चार बस निघून गेल्या पण मला बसायचे धाडस झाले नाही...पाचव्या बस मधून मात्र गावातल्या ओळखीच्या माणसाने आवाज दिला म्हणून मी गाडीत बसलो..सुदैवाने या कंडक्टरने मात्र हाफ तिकीटावरच मला गावात सोडले....मला आज पर्यंत समजले नाही की त्या गावच्या कंडक्टरला नेमके काय रुचले नव्हते...
(पण वडील सांगतात की माझे सिलेक्शन झाल्यावर त्याच कंडक्टर साहेबांनी माझ्या वडीलांना बाहेर चौकात विचारले होते की, 'वाघमारे तुमचा कुठला मुलगा साहेब झाला?' त्यावेळी माझ्या वडीलांनी त्यांना गावातील इतर प्रतिष्ठा सोबत सन्मानाने चहा पाजून सांगितले की, " साहेब ज्या मुलाला तुम्ही फुल तिकीटाचे पैसे नाहीत म्हणून अर्ध्या रस्त्यात उतरवले होते ना तो मुलगा तुमच्या सारख्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आशीर्वादाने साहेब झाला आहे!!!!' आजही ते निवृत्त कंडक्टर साहेब कधी गावाकडे गेल्यास भेटतात ..मी त्यांना ओळख न देता आदरपुर्वक नमस्कार करतो...मी माझे संस्कार सोडत नाही!)
आठवीचे वर्ष जेमतेम एक सत्र झालं होतं....आणी अचानक गावापासून फक्त तिस किलोमिटर अंतरावर असणा-या किल्लारीचा भुकंप झाला ..तो हादरवून गेला....मी जमीन हादरताना...पाहीली आहे.... (क्रमशः)
(प्रताप)

अप्रतिम लेखनशैली.....जिवंत अनुभव....आठवणींच्यात जगलयासारख वाटलं....
ReplyDeleteधन्यवाद मॅडम!
Deleteआभारी आहे!
सर तुमच्या जिद्दी ला सलाम, खूप अप्रतिम लिखाण
ReplyDeleteधन्यवाद
Deleteआजच्या विद्यार्थ्यांसाठी व आमच्या साठी एक चांगल व्यक्तिमत्व प्रेरीत करणाऱ्या आठवणी ...��
ReplyDeleteप्रेरणादायी ... तुमच्या जिद्दीला सलाम सर 🙏
ReplyDelete