आता सुगंध फितवत नाही
फुलांचे कोडे सुटले
बहर असे विश्वासाचे
काट्यांनी अलगद लुटले...
दिनवाण्या पाकळ्याचे
अस्तर कसले भुलवे!
सोसावे गंध महकती
की काट्यांचे जलवे??
लावून बागा नेटक्या
रान फितूर झाले
भुंग्याचे काळीज हळवे
उगाच आतुर ओले
मी घेवून आपली वही
त्यात ठेवून देतो फुल
माफ ही करून देतो
फुलाची.. चुक..भुल...
हवे तुला जर अत्तर
घे वहीचे पाने!
हृदयात भरून येईल
कवितेचे सुगंधगाणे....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
10/4/2021

No comments:
Post a Comment