Saturday, April 10, 2021

कवितेचे सुगंधगाणे...

आता सुगंध फितवत नाही 
फुलांचे कोडे सुटले
बहर असे विश्वासाचे
काट्यांनी अलगद लुटले...

दिनवाण्या पाकळ्याचे 
अस्तर कसले भुलवे!
सोसावे गंध महकती
की काट्यांचे जलवे??

लावून बागा नेटक्या
रान फितूर झाले
भुंग्याचे काळीज हळवे
उगाच आतुर ओले

मी घेवून आपली वही
त्यात ठेवून देतो फुल
माफ ही करून देतो
फुलाची.. चुक..भुल...

हवे तुला जर अत्तर
घे वहीचे पाने!
हृदयात भरून येईल
कवितेचे सुगंधगाणे....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
10/4/2021

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...