शब्दांचा दुष्काळ दिर्घ
दुराव्याचा वैशाख पेटे
ते रस्तेही निघाले ओढीने
न जाणो कोण भेटे?
सावल्यांचे आत्मे टांगून
हा वारा दिशाहीन चाले
पारव्यांच्या उदास पंखाना
लगडत नाहीत फुले
फुलांचे शोषूण गंध
देठ सोडले मागे
फुलपाखरांच्या पंखाचे
तरीही उगाच त्रागे
रेगीस्तानाच्या आत्म्यात
मृगजळाचा साठा
तहानलेल्या जिवा...
शोधत ये तु वाटा
हे मुसाफिरांचे तांडे
ते फकिरंचे पाक दुवे
रेतीच्या ढिगावर उतरती
कवितेचे मुक थवे
चांदबुडीची रात
अंधार दाटलेला
गझलेच्या वहीचा हा
कोनाही फाटलेला
वा-यातुन गझल वाहे
तुझ्या विराण दिशेला
मी शब्द सजवून देतो
चुंबण्या मृगजळी आशेला
शब्दांच्या जोडीला
पाखरे देती पंख
मी उचलून घेतो वैराण
विंचवाचे जहरी डंख
उमटत नाहीत पावले
रेती बेईमान वाहते
तरीही वाळवंट मुक्याने
वाट कुणाची पाहते?
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
25/4/2021
No comments:
Post a Comment