मी अलवार सावरे सारे
तरीही सुटून जाते
बहराच्या फांदीवरुनी
साळुंकी उठुन जाते
हाक पाठलाग करते
आभाळ भरुन येते
सर अनामिक सयेची
मातीत झरुन जाते
प्रतिक्षा मुळ धरते
चिरकाल वन होते
एकट व्याकुळ बावरे
जंगल बन होते
गोसावी निळा मग कोणी
झाडाखाली निजतो
बाण जराचा जहरी
तळपायी मुक थिजतो....
"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
९ .८.२०२३
No comments:
Post a Comment