झाल्याच कधी माझ्या
वाटा निस्तेज न् धुसर
आणी जर अंधाराला
पडलाच चंद्राचा विसर.....
तर ....
तु द्यावेस मला
प्रकाशाचे ओंजळभर दान
आणि भांबावल्याच दिशा
तर तु द्यावेस मला भान...
मी ..
प्रकाशीत होण्यासाठी
कधी पेटवलेच शब्द
तर लिहावेस तु व्याकुळ होवून
माझ्या कवितेचे प्रारब्ध...
कधी...
ऊठलेच हाकारे विस्मरणाचे
तु ओळखावे माझे गीत
ऊमलून यावे वा-यामधूनी
अमिट सुरेल संगीत...
कधी...
निखळलाच तारा
तु आभाळ घ्यावे पेलून
फांदिवरून कोसळणारा
बहर घ्यावा झेलून.......!!!
(प्रताप)
"रचनापर्व"
28/3/2019

No comments:
Post a Comment