नसतो कधी प्रकाश!
संधिप्रकाशावर भागते
अंधाराच्या काळजावर
मग एक पणती लागते.
फाटलेच कधी आभाळ तर
हिमतीचा द्यावा टाका
अपार सा-या कष्टाने
लांघावा हरण्याचा धोका
घडत नसेल नशिब
तर द्यावेत घणांचे घाव
जिद्दीने कोरावे मग आपण
त्याच्याच कपाळी नाव
येतात अनंत अडचणी
तरीही द्यावी पावलांना दिशा
मरू न द्यावे कधी मनातील
झुंजण्याची नशा
कर्तृत्वाचा कैफ न येवो
जमीनीवर सदैव रहावे
जिंकण्याच्या जल्लोषातही
हरणा-याचे दुःख पहावे
नाही पोहचत आवाज तरी
देत रहावी साद
उधळून द्यावे समर्पण
अन् रहावे निर्विवाद
होते तरीही कधी टिका
त्यास टाकाचे घाव मानावे
गाळून स्वतःतील दगडपण
स्वतः सुबक बनावे.
निर्भय होवून मानवतेचे
गित सदैव गावे
फुलून येण्या सारे
स्वतः पाऊस बनून जावे
(प्रताप)
7/8/2019
"रचनापर्व "
No comments:
Post a Comment