Thursday, September 26, 2019

?



तु भ्रम की वास्तव?
धुक्याला माझा प्रश्न
पावसाच्या ओलाव्याने
का होते मन तृष्ण

तु सुगंध की सुगंधी स्वप्न?
का लहरते हवेत ही दरवळ
डोंगर माळावर पसरून
का व्याकुळते ही हिरवळ

तु संगीत की गीत ओले?
की कृष्णाची बासरी
का दाटून येते मनात
एक आर्त कळ हसरी

तु एकांतातील स्वप्न की
स्वप्न पाहण्याचा एकांत?
मौन संधेच्या बोलक्यावेळी
का मनात दाटे आकांत

तु पडलेला विसरक्षण?
की येणारी आठवण
जणू पावसाळ्याच्या शेवटी
होते त्याची अपरिहार्य  पाठवण

तु आलेला दुरावा
की मनी दाटली जवळीक?
तु सरळसाधे जगणे की
आयुष्याची आगळीक
(प्रताप)
27/9/2019
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...