शब्द कशाला लिहू?
काळीज असता बोलके
घे वेचून भाव मनाचे
पिकले,फुलले, शेलके...
भाव कशाला वाहू?
मन ओथंब चिंब ओले
घे मोहर सारे ओंजळीत
कवितेस बहरती फुले
धिर शब्दांना देई
मनात रूजले ढग
खिडकीच्या अंतरंगी
मेघ दाटले बघ!
हलकेच येईल धुके
आसमंत होईल धुसर
या ढगाच्या माथ्यावर
काळीजछाया पसर...
रान एकले उभे
झाड रोज झुरते
फांदिवर आठवणींची
पाखरशाळा भरते
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment