आठवणीच्या प्रहरी
साळुंक्याचे थवे
वाटत नाही तुला?
भेटायला हवे...
मनाचे मामलेच असे
निःशब्द...सारे मुके
पहाटेस झपाटे जसे
गर्द सावळे धुके
आस रानी फिरते
दुरचे जंगल खिन्न
झाडाच्या फांदीवर
बहर रिकामे सुन्न
आसवांच्या मोहल्ल्यात
पावलांचे येणे जाणे
मुरलीला भारत राही
राधेचे ओले गाणे
कशास नजर शोधे
हर ठिकाणी भिरभिर
का अनामिक उठते
मनात एक शिरशिर?
असुनही रीते
नसुनही भरलेले
ओंजळीतील फुले
आठवगंधाने भारलेले
अवचित झुळुक जणू
तुझ्या आठवणीचा स्पर्श हलका
माळरानी पडला दगडही
हो एकांती सजीव बोलका
तु दुरचे एकांत बेट
पाण्याचा त्याला वेढा
जिव वल्हवे स्वप्न
कसला अतिव ओढा?
दिस भारला होतो
नजर होते रिक्त
शब्द घेवून हळवे
मी रचतो तुझे सुक्त
शब्दांचे अलिंगन माझ्या
तुझ्या नजरेस पडे
मी शिकवत असतो
नजरेस व्याकुळतेचे धडे...
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com
16/1/2021
No comments:
Post a Comment