मी....
कविता लिहीण्यासाठी
शब्दांकडे गेलो...
शब्दांनी होकार भरुन
विचारलं...
"भाव कुठुन आणशील?"
मी तडक पोहचलो
तुजकडे..आणी
तुझ्या दाराशी थांबुन
पसरली झोळी......
पण तु......
पसाभर दाण्यासाठी
"हंगाम नाही" म्हणतेय.....
मी शोधतो आहे हल्ली
एकलव्याचं जंगल
मलाही साधावंसं वाटतंय
आता कवितेचं कसब......
तुझ्या मातीच्या पुतळ्याच्या साक्षीने
कधी तु मागशीलही
त्या बदल्यात भावदक्षिणा
मी मात्र......
सा-या कविताच तुला
अर्पून टाकेन तत्क्षणी....
यत्किंचितही न कचरता......
मी अव्वल असेन का
बिनकवितेचा?
असा कुठलाच किंतू परंतू
न बाळगता......
やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१.५.२०२३
No comments:
Post a Comment