तु उदक सोड गं बाई!
या भयाण दुराव्या वरती
हे थवे हुरहुरीचे का
उगा नभी भिरभिरती?
कसले देवू अर्ध्य
वाहू कसले फुल?
माझ्या भावतळाला
तुझ्या आशेची हुल
तु दुर दिशेवर टाक
तुझी आभास छाया
मी धारुन घेईन मजवर
ती गर्द शामली माया
तु सजवून घे पंचारती
घे ओवाळून तुजला
पहा निरखून तो पदरही
कोणाच्या अश्रूत भिजला....?
नको उसासे घेऊ
फुटेल इकडे बांध
अंतरात जे तुटते
त्यास अलवार..सांध...
やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
४.५.२०२३
No comments:
Post a Comment