सारखेच ना सा-यांच्या
नयनात दाटते पाणी?
का कुणी फिरावे मग
त्यासाठी दिनवाणी?
पाण्यासारखेच आपण
निरंगी सारे वाटते
रंग लागता धर्माचा
माणुसपण बाटते.
पुन्हा न व्हावे समर
होण्या 'चवदार' तळे
जतन करुया सारे
फुलत्या माणुसकीचे मळे
तुझ्या मनाचे पाणी
माझ्यातला व्हावा सागर
महाड गाईल युगायुगातुन
समतेचा भिम जागर....
"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
२०.३.२०२३
%20(10).jpeg)
No comments:
Post a Comment