मी अंथरतो फुलबगीच्या
घेण्या जगाचे काटे
कोणी हसत नाही
जतल्या फुलावाटे
बहराचे देवुन रंग
मी रुजवता हाका
किरणांत तम उतरुन
करतो त्यास फिका
किती जपावी बाग
देवुन जिवाचे पाणी
विस्कटतो वादळवारा
ताटवा दिनवाणी
येईल कधी का कोणी
कवटाळण्या सृजन हात?
वसंत किती दारावर
उभे........भ्रमात....
"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१७.३.२०२३

No comments:
Post a Comment