Thursday, April 10, 2025

भाव काजळी









काळीज मुक्याने बुडते 
रवी सोडतो अंबर
सांज दिलासा देते
तमास फुटते हंबर

मी गर्द राईवनातून
शोधून आणतो गाई
अंधार घन बघ झाला
दिवा लाव ना बाई!

ही कसली आर्त भूल
पदराला तुझ्या चिनते?
कबीराची भक्ती घेऊन
गहिवर शेला विणते

धूळ झटक ना बाई!
वासरा गाई मिळल्या
वात दिव्याच्या झाल्या
कविता माझ्या जळल्या!

धरून ओंजळ आडवी
दिवा आत कोण नेईल?
बेवारस निरंजनातून
भाव काजळी होईल!


("やaraτa ₱)                           
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...