Friday, November 11, 2022

काही वाटत नाही..??


मी टिंब टिंब जोडत
येतो रेखत रेषा
तु धुसरत पायखुणा
खोडत निघते भाषा

मी एक एक शब्दांचे
कसे बांधू सेतु?
सांधू कसे तुझ्या मनाचे
अरण्यकी गर्त हेतू?

सारून सारी मृदा
वृक्ष कसा उगवावा?
बहर मनातील एकट
असा कसा तगवावा?

नकोस बोलू काही
सारे मजला कळते
अंधार दाटला असता
दुःख एकले जळते

तु नकोस घालू बांध
धारेस मुक्त वाहू दे
घे सामावून माझे असणे
सागरा स्थिर राहू दे

सागर निघत नाही
तो सोसत एकला उभा
नदीस विलीन होण्याची
देत मुक मुभा

नकोस मोडू दिशा
रस्ता भेटत नाही
या भांबावल्या रातघडिचे
तुला काही वाटत नाही...??

प्रताप ࿐
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१०.११. २०२२












No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...