पहिल्यांदा दरवर्षी
असतील आले वारस
जिर्ण नंतर हळूहळू
कबरी होतात बेवारस
वाहिली असतील कुणी
फुले आरंभी ताजी
फिरकण्या आता इकडे
नसतात आप्त राजी
विरतात अशीच माणसे
काळा आड जाती
आप्त एक सखा
असते फक्त माती!
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com
एकांताची निरव पोकळी , मनाची सृजन घालमेल...निर्मिती आसक्त मी ...आणी हृदयात भावनांचे बहर....अभिव्यक्त होण्याच्या तळमळीचे हे पर्व.... माझ्या भावअस्तित्वाचा हा दर्पण.... आणी ढवळून निघणारी आपली...प्रतिबिंबे....
माझ्या कवितेचा सखे तू नको तोडू तंतू आणी नको तुझ्या मनी किंतू परंतू ही भावनेची मंत्रधून मी रोज करे धावा ही लेप संजिवनी शांतावतो गर्त घावा स...
No comments:
Post a Comment