पहिल्यांदा दरवर्षी
असतील आले वारस
जिर्ण नंतर हळूहळू
कबरी होतात बेवारस
वाहिली असतील कुणी
फुले आरंभी ताजी
फिरकण्या आता इकडे
नसतात आप्त राजी
विरतात अशीच माणसे
काळा आड जाती
आप्त एक सखा
असते फक्त माती!
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com
एकांताची निरव पोकळी , मनाची सृजन घालमेल...निर्मिती आसक्त मी ...आणी हृदयात भावनांचे बहर....अभिव्यक्त होण्याच्या तळमळीचे हे पर्व.... माझ्या भावअस्तित्वाचा हा दर्पण.... एक रम्यगूढ हाक आणी वास्तव याच्या धूसर सिमारेषेवरील ही शब्दनक्षी...त्या नक्षीदार शब्दांचे हे रूप..साजिरे...गोजिरे..... लिहावे ऐसे अक्षर, जणू मनाची रेघ सांधून जावी ज्याने, काळजातली भेग.... काळीजभेग सांधणारी ही शब्दकळा...आणी काळीजकोरी ही कविता..... आणी ढवळून निघणारी आपली...प्रतिबिंबे....
शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...
No comments:
Post a Comment