गेल्या किती दिवसांचे
हिशोब जूळत नाहीत
पाय जडावून हंबरी
माघारा वळत नाहीत
तू सोडल्या गायांचे
रस्ते नकोस मिटवू
सांग या पान्हयाला
कसे वासरू भेटवू?
विसरून कसे सुखी
कुणी द्यायचे हाळी?
अवरूद्ध साचून हंबर
या भारावल्या गळी......
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment